मुख्य सामग्रीवर वगळा

पन्हाळा किल्ला माहिती | Panhala fort information in Marathi

पन्हाळा किल्ला माहिती |Panhala fort information in Marathi

किल्ल्याचे नाव :पन्हाळगड
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: सह्याद्री
जिल्हा: कोल्हापूर
ठिकाण: पन्हाळा
किल्ल्याची उंची: ९७० मीटर
सद्यस्थिती: चांगली
       पन्हाळा किल्ला म्हटले की आपल्याला सहाजिकच आठवते ती छत्रपती शिवरायांची पन्हाळा मोहीम त्याचबरोबर सिद्धी जोहर ने दिलेला पन्हाळगडाला वेढा हा वेढा फोडून यशस्वीरित्या बाहेर पडलेले शिवराय,त्याच
 बरोबर वीर शिवा काशीद यांचे बलिदान व महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे व सरदार बांदल यांचा न भूतो न भविष्यती असा पराक्रम. पन्हाळा किल्ल्याला मराठा इतिहासामध्ये मानाचे स्थान आहे. कोल्हापूर संस्थान चा राजधानीचा किल्ला असलेल्या पन्हाळगड महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे. पन्हाळगड महाराष्ट्रातील सध्या घडीला चांगल्या स्थितीत असलेला एकमेव किल्ला आहे. आज आपण अशा या पन्हाळगड किल्ल्याची माहिती पाहणार आहोत.

       पन्हाळगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची ९७७ मीटर एवढी आहे.पन्हाळगड किल्ला सह्याद्री पर्वतरांगेच्या घाटमाथ्यावर असून भौगोलिक दृष्टया याचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. तळकोकणात नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला महत्वपूर्ण भूमिका निभावत असे. कोल्हापूरचा सभोवताली पन्हाळा विशाळगड महिपळगड कलिंदीगड ही गडांची चौकटी आहे.

पन्हाळा किल्ला माहिती
पन्हाळा किल्ला 
हेही वाचा : तोरणा किल्ला माहिती

पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे

     पन्हाळगड किल्ला महाराष्ट्र राज्यातील निसर्गसंपन्न अश्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. पन्हाळा हे एक तालुक्याचे ठिकाण आहे. पन्हाळा ही गिरिस्थान नगरपालिका आहे. कोल्हापूर पासून बावीस किलोमीटर अंतरावरील पन्हाळा हे ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे.
    

पन्हाळगड चा इतिहास

     पन्हाळगड चा इतिहास पाहताना तो आपल्याला साधारण १२०० वर्ष मागे घेऊन जातो. साधारणपणे इ.स.११७८ मध्ये शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने किल्ल्याचे बांधकाम केले.सुरवातीला किल्ल्याचे नाव पन्नग्नालय असे होते.इ.स.१२०९ पर्यंत किल्ला शिलाहार राजवंशाकडे होता परंतु देवगिरीच्या यादवांनी किल्ल्यावर आक्रमण करून किल्ला जिंकून घेतला व भोज राजाला याच किल्ल्यावर कैद करून ठेवले.
बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर स्थापन झालेल्या आदिलशाही राजसत्तेकडे इ.स.१४८९ मध्ये पन्हाळा किल्ला आला. तळकोकणा वर नियंत्रण ठेवण्यासाठी पन्हाळगड विजापूर करांसाठी महत्त्वाचा किल्ला होता. आदिलशहाची बडी बेगमने दिलेला विडा घेऊन आलेल्या अफजलखानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी वध करून पहिला धक्का दिला तर १८ दिवसांच्या आत विजापूरकरांचे मुख्य ठाणे असलेला पन्हाळगड किल्ला जिंकून दुसरा धक्का दिला. आदिलशहाने सिद्धी जोहर याला फौज फाटा देऊन पन्हाळा गड किल्याच्या मोहिमेवर पाठवले त्यांने किल्ल्याला वेढा दिला त्यावेळी शिवराय पन्हाळगड केल्यावर होते. शिवराय पन्हाळा किल्ल्यावर असल्याचे कळल्याने त्याने वेडा अधिक तिखट केला हा वेडा सतत चार महिने घातला होता. त्याच दरम्यान औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान पुण्यावर येऊन धडकला होता त्याने चाकणचा संग्रामगड ताब्यात घेतला होता. 

शिवराय पन्हाळगडावर अडकून पडल्याने त्यांना कोणतीच हालचाल करता येत नव्हती तर शाहिस्तेखान राजधानीच्या वेशीपर्यंत आल्याने राजगड ला धोका निर्माण झाला होता. सिद्दीजोहरला खेळवत ठेवण्यापेक्षा किल्ल्या वरून बाहेर पडण्याचा बेत आखला.इ.स.१२जुलै १६६० आषाढ पौर्णिमा भर पावसात रात्रीच्यावेळी ६००हत्यार बंद मावळ्यांसह हेरांनी योजलेल्या गडाच्या दिंडी दरवाजाने  वेढा फोडून विशाळ गडाकडे जाण्यास निघाले.  सिद्धी जोहर ला सुगावा लागताच, दोन पालख्या करून एका मध्ये स्वता बसले व वीर शिवा काशीद शिवरायांचा वेश धारण करून दुसऱ्या पालखीत बसला व दोन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागल्या सिद्दी जोहरने सिध्दी मसुद ला मागावर पाठवले  असता एक पालखी सापडली आपण पकडलेले शिवराय नसून हा तर शिवा काशीत आहे हे कळल्यावर त्याच्यावर तलवार चालली त्यांनी आपल्या राजासाठी प्राणांची आहुती दिली. बराच वेळ गनिमांना गुंतवून ठेवले त्यामुळे शिवरायांना विजापुरी सैन्य पासून दूर जाण्यास वेळ मिळाला. 
     सिद्धी मसुद  शिवरायांचा पाठलाग करत असताना घोड खिंडी जवळ गनिमांची आरोळी ऐकून बाजीप्रभूंनी प्रसंग मोठा बाका' गनिमा अफाट आहे, गनिम दावा साधेल तुम्ही विशाल गड जवळ करा तोपर्यंत खिंडीत आम्ही गनिमांना थोपवून धरतो असे सांगितले. राजे या गोष्टीला तयार होत नाहीत हे पाहून लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे अशी आर्त विनवणी केली. तुम्ही विशाळ गडी जाऊन तोफेचा आवाज करा तोपर्यंत एका ही गनिमाला खिंडीतून पुढे जाऊ देणार नाही.
     खिंडी मध्ये बाजीप्रभू देशपांडे व सरदार बांदलांच्या सैन्याने शौर्याची परिसीमा केली. हाशम खिंडीत येताच दगडांचा वर्षाव होत होता.दोन्ही हातात दानपट्टा घेऊन बाजीप्रभूं आवेशाने लढत होते एक ही गनीम समोर यायला तयार होत नव्हता. अनेक मावळे मृत्युमुखी पडले. अनेक घाव बसले शरीर रक्तबंबाळ होऊनही असे लढत होते जणू मृत्यूलाही सांगत होते तोफेचा आवाज येई पर्यंत मला वेळ नाही! 
१३ जुलै १६६० रोजी सायंकाळी सहा वाजता  शिवराय  विशाळगडावर पोहोचले व त्यांनी तोफेचा आवाज केला, त्याचवेळी वर्मी घाव लागून पावनखिंड मध्ये एक वादळ शांत झाल. स्वामीनिष्ठेपायी,स्वराज्यापायी  बाजीप्रभूं व तीनशे बांदलांनी बलीदान दिले.विर मावळ्यांच्या बलिदानाने घोडखिंड पावनखिंड झाली. पन्हाळगड किल्ला सिद्धी जोहरच्या ताब्यात गेला.
 
पन्हाळा किल्ला माहिती

पन्हाळा किल्ला 



पन्हाळा किल्ला कोणी जिंकला

     ६ मार्च १६७३ मध्ये शिवरायांच्या आज्ञेप्रमाणे कोंडाजी फर्जंद व त्यांच्या निवडक ६० मावळ्यांच्या साथीने पन्हाळा किल्ला पुन्हा शिवरायांना मिळवून दिला.
     मराठा साम्राज्याच्या दोन गाद्या झाल्यानंतर कोल्हापूर संस्थाना कडे पन्हाळा किल्ला होता.१७८२ ते १८२७ पर्यंत हा किल्ला कोल्हापूर संस्थान च्या राजधानी चा किल्ला राहिला.

पन्हाळगडावर पाहण्यासारखी ठिकाणे

      पन्हाळगड महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. किल्ल्याला सात फूट उंचीची संपूर्ण तटबंदी असल्याने किल्ला अधिक मजबूत आहे. पन्हाळा गडावरील अनेक वास्तू आजही सुस्थितीत असून पर्यटनाच्या दृष्टीने व या किल्ल्याचा इतिहास समजून घेण्यासाठी पर्यटक या किल्ल्याला भेट देत असतात. किल्ल्यावरील तीन दरवाजा धान्यकोठार अंबरखाना राजवाडा सज्जा कोटी पाण्याचे तलाव टाके पर्यटकांना आकर्षित करतात. त्या वस्तू आपण खालील प्रमाणे पाहू या.

तीन दरवाजा

    गडावरील तीन दरवाजा हा पश्चिम दिशेला असून अतिशय भव्य दिव्य आहे. त्यावर केलेले बारीक नक्षीकाम, मोठमोठाले खांब, दगडी बांधकामातील चौथरा, उर्दू मधील शिल्प, कमळ फुले, गणेशाची मूर्ती हे सर्व या किल्ल्यावर अनेक राजसत्तांच्या अस्तित्वाची साक्ष देतात. दरवाज्याच्या आतील बाजूस कमानीदार खांबा मध्ये असलेला प्रशस्त व्हरांडा सुंदर आहे. कोंडाजी फर्जंद यांनी आपल्या साठ मावळ्यांसह या दरवाज्यातून प्रवेश करून किल्ला घेतला होता.

अंबरखाना

    अंबरखाना म्हणजे पूर्वीचा बालेकिल्ला आहे या किल्ल्याच्या भोवती खंडात पाहायला मिळते. अंबरखाना ही तीन वस्तूंचा समूह असून त्यांना गंगा यमुना व सरस्वती अशी नावे होती त्यामध्ये धान्य साठवले जात आहे. पूर्वीच्या काळी ज्वारी नाचणी तांदूळ हे गडावर मुबलक प्रमाणात ठेवण्यासाठी यांचा वापर केला जात असे. धान्य कोठारांमध्ये ३० हजार खंडी एवढे धान्य साठवले जात असे. परंतु वास्तूची एकंदरीत रचना पाहता धान्य कोठारे नसावीत असे वाटते.

अंधार बावडी

    अंधार बावडी ही गडावरील तीन मजली इमारत असून तिच्या तळमजल्यावर पाण्याची विहीर आहे. त्याची रचना एकंदरीत राज महालासारखी पाहायला मिळतील. विहिरीमध्ये उतरण्यासाठी प्रशस्त अशा पायऱ्या नक्षीदार दरवाजे पाहताना ही विहीर असावी असे क्षणभरी ही वाटत नाही. मधला मजला प्रशस्त असून त्यामध्ये खिडकी वजा चोर दरवाजा आहे तो गडाच्या ताटामध्ये निघतो. आज ही विहीर गडावरील मुख्य प्रेक्षणीय स्थळ बनले आहे.

सज्जा कोटी

     सज्जा कोटी ही भव्य अशी दुमजली इमारत तीन दरवाजाच्या आत मध्ये थोड्या अंतरावर पाहायला मिळते. दगडी कढडा व अंगण वास्तूच्या सौंदर्यामध्ये भर पाडतात. इमारतीच्या तळमजल्यावर भिंतीवर कोरलेला शिलालेख पहायला मिळतो. इब्राहीम आदिलशहा याने इसवी सन १५०० मध्ये बांधले असून याचे बांधकाम विजापुरी शैली मधील आहे. छोट्या खिडक्या, दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी जिना आहे. इमारतीच्या छतावरील नक्षीकाम, आकर्षक खांब, कमानी खिडक्या व या खिडकीतून येणाऱ्या थंड हवा मनाला गारवा देऊन जाते. छत्रपती शिवराय पन्हाळा गडावर असताना या कोटी चा उपयोग प्रशासकीय कामकाज व गुप्त खलबते करण्यासाठी करत असत. शंभूराजांना पन्हाळा गडावरील कारभार पाण्यासाठी काही काळ या कोटी मध्ये ठेवले होते.

राजदिंडी दरवाजा

        राजदिंडी दरवाजा गडावरील ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून सिद्धी जौहरने गडावर दिलेल्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवराय या दरवाजातून गड उतार झाले होते. या दरवाजातून जाणारी वाट पुढे विशाळ गडाकडे जाते.

राजवाडा

    राजवाडा ही गडावरील सुंदर वास्तू असून महाराणी ताराबाईंनी वास्तव्यात असताना इ.स.१७०८-१७०९ मध्ये आपल्यासाठी खास एक राजवाडा बांधून घेतला होता. हा राजवाडा अतिशय भव्यदिव्य असून या वाड्यातील देवघर आकर्षक व सुंदर आहे. आज घडीला या वाड्यामध्ये नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व बॉईज हॉस्टेल आहे.

पिछाडी बुरुज किंवा पुसाटी बुरुज

   हा बुरुज किल्ल्याच्या पश्चिम बाजूला आहे. किल्ल्यावरून सभोवतालच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असे.

दुतोंडी बुरुज

      पन्हाळगडावरील दुतोंडी बुरुज न्यायालया जवळ असून यावर ये जा करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रशस्त अश्या पायऱ्या आहेत. याच्या जवळच आणखी एक बुरुज आहे त्याला दौलत बुरुज असे म्हणतात.

धर्म कोटी

     संभाजी मंदिराच्या जवळ असणाऱ्या इमारतीला धर्मकोठी असे म्हणतात. सरकारातील जमा झालेले धान्य वस्तू यांचा गरजूंना दानधर्म करण्यासाठी या वास्तूचा वापर होत असे म्हणून याला धर्म कोटी असे म्हणतात.

रेडे महाल

    गडावरील दगडी बांधकामातील वास्तूचा उपयोग पूर्वीच्या काळी गुरेढोरे मुख्यत्वेकरून रेडे बांधण्यासाठी केला जात असेल.

कलावंती महाल

       किल्ल्याच्या एका बाजूला नायकिणीचा सज्जा म्हणून ओळखले जाणारऱ्या इमारतीला कलावंतीण असे म्हणतात. बादशहाच्या करमणुकीसाठी राहणाऱ्या नायकिणींचे वास्तव्य असणारी नायकिणीच्या सज्जाची इमारत सुंदर असून तिच्या खिडकीतून थंडगार वारे घेत निवांत बसून राहावे असे वाटते.

पराशर गुहा

      पन्हाळगडावर पराशर ऋषींचे वास्तव्य होते हे ऋषी ज्या गुहेत राहत होते त्याला पराशर गुहा असे म्हणतात. गुहेचे तोंड छोटे असले तरी आत मध्ये गुहा प्रशस्त आहे. आज मितीला या गुहेला दरवाजा बसवून बंद करण्यात आले आहे.

नागझरी

    नागझरी हा एक बारमाही पाण्याचा झरा असून या ठिकाणी कुंड पाहायला मिळतो. या कुंडातील पाणी अतिशय थंडगार व चवदार आहे.

संभाजी मंदिर

     गडावर संभाजीचे मंदिर आहे. मंदिरामध्ये उंचपुर्‍या दोन दिपमाळा, हत्ती शिल्प, दगडी बांधकामातील खांब. चारही बाजूने संरक्षक भिंत असून मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. मंदिराच्या आवारामध्ये पाच ते सहा तोफा ठेवलेल्या पाहायला मिळतात.

सोमाळे तलाव

     पन्हाळगडावर मोठा तलाव असून त्या सोमा तलाव असे म्हणतात. हा तलाव अतिशय विस्तृत असून त्याच्या चहुबाजूने बसण्यासाठी मस्त कट्टा व झाडे लावलेली आहेत या तलावाच्या काठावर सोमेश्वराचे मंदिर आहे. हा तलाव गडावरील मुख्य प्रेक्षणीय स्थळ आहे.

सोमेश्वर मंदिर

     सोमाळे तलावाच्या शेजारी सोमेश्वराचे एक छोटेखानी सुंदर मंदिर आहे. या मंदिरात छत्रपती शिवराय पन्हाळगडावर असताना नित्य पूजेसाठी येत असत.

बाजी प्रभू देशपांडे पुतळा

      बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडी तील पराक्रमाची आठवण म्हणून पन्हाळगडावर सुरूवातीलाच शूर वीर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा बसलेला आहे. बाजीप्रभूंच्या दोन्ही हातात तलवारी असून लढण्याच्या पवित्र्यात रचना पाहायला मिळते.

    पन्हाळा गड किल्ल्यावर तबक उद्यान, वाघ दरवाजा, किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ वीर शिवा काशीद यांचा पुतळा हेही पाहण्यासारखे आहेत. त्याचबरोबर किल्ल्यावरून कोल्हापूरची हिरवीगार ऊस शेती, वाडी रत्नागिरी ज्योतिबा व कोल्हापूरचे दर्शन होते.
    पन्हाळा किल्ला पासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर मसाई पठारावर मसाई देवीचे मंदिर आहे मंदिर दगडी बांधकामातील असून अतिशय सुंदर आहे. या मंदिरापासून पन्हाळ गडाचे पूर्ण दर्शन होते.

पन्हाळगड ला जायचे कसे

    पन्हाळगड ला जाण्यासाठी रस्ते मार्गे सुलभ असून तो गडाच्या दरवाजा पर्यंत जातो. पन्हाळगड ला जाण्यासाठी सर्वप्रथम कोल्हापूरला यावे लागते. कोल्हापूर हे शहर रस्ते, रेल्वे व हवाई मार्गे पूर्ण देशाशी जोडले गेले आहे.
   मुंबई पुणे वरून येणारे पर्यटक पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूर ला येऊ शकतात.  राज्यातील प्रत्येक शहरातून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कोल्हापूरला येतात. कोल्हापूर मधून एसटी महामंडळाची बस सेवा पन्हाळा साठी चालू आहे, त्याच बरोबर शटल सेवा ही सुरू आहे. कोल्हापूर मध्ये खाजगी ह ही पन्हाळ गडला जाण्यासाठी भेटतात.

काही खास

  पन्हाळ्या मध्ये जेवणासाठी उत्तम हॉटेल्स असून त्या ठिकाणी पिठलं भाकरी तसेच कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, झणझणीत मिसळ यांचा आस्वाद घेऊ शकता.
   कोल्हापूर एक पर्यटन केंद्र सून पन्हाळा गड बरोबरच रंकाळा तलाव महालक्ष्मी मंदिर राजवाडा संग्रहालय हे पाहू शकता.
   गडावर मुबलक पाण्याची सोय आहे.

पन्हाळगड कसा आहे आणि त्याचे इतिहासातील महत्त्वाच्या बरोबर किल्ल्यावरील वास्तू यांची माहिती  Panhala fort information in Marathi या लेखामध्ये पाहीली. सदर लेखामध्ये काही बदल सुचवू इच्छित असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता त्याच बरोबर लेख आवडल्यास शेअर करायला विसरू नका.पन्हाळगड किल्ला माहिती मराठी कशी वाटली ते जरूर कळवा. आमचे इतर लेख पाहण्यासाठी आमच्या पेज ला नक्की भेट द्या धन्यवाद
         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण