मुख्य सामग्रीवर वगळा

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती 

कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते

हे ही वाचा गोदावरी नदी

     सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो. याच परिसरात कृष्णा बरोबर कोयना वेण्णा सावित्री गायत्री या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत.
कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते.
कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडण्यात आली आहे.
      कृष्णा महाबळेश्वर मधून खाली उतरून वाई मार्गे माहुली येथे येते,याच ठिकाणी तिला वेण्णा येऊन मिळते. पुढे माहुली पासून ५० किमी अंतरावर असलेल्या कराड मध्ये तिला कोयना मिळते,याला कृष्णा कोयनेचा प्रितीसंगम असेही म्हणतात.कराड पासून पुढे जात असताना तिला सांगली मध्ये पुर्वे कडुन 'येरळा' तर पश्र्चिम बाजूने वारणा येऊन मिळते,तर कुरुंदवाड मध्ये पंचगंगा येऊन मिळते.पंचगंगेच्या संगमावर नरसिंहवाडी हे दत्ताचे जागृत देवस्थान आहे.याच्या नंतर दुधगंगा नदी येऊन मिळते व अखेर महाराष्ट्रातील आपला ३०० किमी चा प्रवास करून कृष्णा कर्णाटक राज्यात प्रवेश करते.
      बेळगांव जिल्हातून कृष्णा पुर्व वाहीनी होते विजापूर मध्ये तिला घटप्रभा नदी येऊन मिळते,याच ठिकाणी गोकाक चा प्रसिद्ध धबधबा आहे.पुढे तेलंगणाच्या सिमेवर रायपूर येथे भिमा नदी येऊन मिळते.पुढचा प्रवास करत असताना तुंगभद्रा नदी चा संगम होतो.
      यानंतरच्या प्रवासात तिला दिडी, मुसी, पालेरू, मुनेरू, आदी नद्या येऊन मिळतात.विजयवाडा येथून पुढे कृष्णेचे तिनं प्रवाह होऊन त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झाली आहे.या त्रिभुज प्रदेशात कालवा जोड प्रकल्प राबवून यातून जलवाहतूक केली जाते.शेवटी आंध्रप्रदेशातील राजा महेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते.
      
कृष्णा व तिच्या उपनद्यां वरील धरणे.

धोम धरण
          वाई शहरातल्या पश्चिम बाजूला धोम गावात कृष्णा नदीवर धरण बांधले असल्याने याला धोम धरण म्हणतात.
यांची पाणी साठवण क्षमता १४ टि एम सी इतकी आहे.या धरणाचा उपयोग पिण्यासाठी व सिंचनासाठी केला जातो.वाई, सातारा,जावळी, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांना या धरणाचा फायदा झाला आहे.

कोयना धरण
          कोयना या कृष्णेच्या उपनदीवर कोयना धरण आहे हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठे असून याची १०५ टि एम सी इतकी जल साठवण क्षमता आहे.सातारा जिल्ह्यातील या धरणाच्या पाण्याला शिवसागर जलाशय असेही म्हणतात.या धरणाचा उद्देश सिंचन आणि जलविद्युत निर्मिती करणे आहे.जलाशयाच्या बाजुने कोयना अभयारण्य आहे.

अलमट्टी धरण 
          कर्नाटक मधील विजापूर जिल्ह्यात कृष्णा नदी वर २००५ साली अलमट्टी धरण बांधले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता २०० टि एम सी इतकी असली तरी साधारण पने १२४ टि एम सी इतके पाणी साठवले जाते.या धरणाचा नामफलकाने जागतीक किर्तिमान स्थापन केला आहे,कारण नामफलक जगातील सर्वात मोठा फलक आहे याची लांबी ११२.७ मीटर आहे.या धरणामुळे कर्नाटक राज्याचा पाणी प्रश्न मिटला आहे.

नागार्जुन सागर धरण
            हैद्राबाद पासून १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या नागार्जुन कोंडा येथे हे धरण आहे या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सर्वात मोठे जिनाही धरण आहेत स्वतंत्र भारतातील जलविद्युत निर्मिती प्रकल्पासाठी निर्माण केलेल्या पहिल्या धरणांपैकी हे एक धरण आहे या धरणाची लांबी सुमारे १ किलोमीटर असून उंची 124 मीटर आहे. या धरणाच्या बाजूला एक छोटा तलाव असून त्यामध्ये पर्यटकांसाठी बोटिंगची सोय केली आहे हे एक सहलीसाठी उत्तम ठिकाण मानले जाते. धरणापासून २२ किलोमीटर अंतरावर श्रीशैलम् हे आंध्र प्रदेशातील अभयारण्य आहे.

कृष्णा पाणी वाटप करार
        कृष्णा नदीच्या पाणी वाटपावरून महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये अनेक वाद आहेत हा वाद मिटविण्यासाठी पाणी वाटप करार करण्यात आला आहे त्यानुसार महाराष्ट्राला १६ घ.मी कर्नाटक ला २०घ.मी तर आंध्रप्रदेश ला २३घ.मी पाणी वापरण्याचा हक्क मिळाला आहे
        कृष्णा नदीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 27% क्षेत्र महाराष्ट्रात 43% कर्नाटकात तर 29 25% आंध्र प्रदेशात येते.
  कृष्णा नदीच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना केली आहे.
  

         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण