मुख्य सामग्रीवर वगळा

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला 
उंची :- १३३७ मीटर
किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग 
डोंगररांग :- महादेव डोंगर 
चढाईची श्रेणी :- सोपी 
ठिकाण :- रायरेश्वर
तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत 
सध्याची स्थिती :- व्यवस्थीत
शिवलिंग
शिवलिंग


रायरेश्वर किल्ला माहिती

    रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो.
रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
शिडीमार्ग
शिडीमार्ग 


रायरेश्वर चे पठार कुठे आहे

      पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी लोखंडी शिडी व रेलिंग बसवले आहे  शिडीच्या वाटेने गडाच्या माथ्यावर पोहोचताच,समोरच आपल्याला रायरेश्वराचे अवाढव्य आकाराचे पठार नजरेस पडते. पठाराचा विस्तार 16 किमी इतका प्रचंड पसरला असून या पठारावर पांडवकालीन रायरेश्वराचे मंदिर पाहायला मिळते. या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची१३३७ मिटर इतकी आहे.गडावर पवित्र रायरेश्वर मंदिर, पांडव लेणी, गोमुख तळे व जिवंत झरा असून वर्षाचे १२ महिने या ठिकाणी शुध्द पाणी असते.
      मंदिराच्या बाजूला उंच टेकडी असून या टेकडीवरून भवताल चा संपूर्ण परिसर अतिशय मनमोहक दिसतो आकाश स्वच्छ निरभ्र असेल तर या टेकडीवरून प्रतापगड केंजळगड कमळगड विचित्रगड मकरंदगड तसेच तुंगतिकोना किल्ले सहज दिसतात.
      या गडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी सात ते आठ विविध रंगाची माती पाहायला मिळते त्यामध्ये निळी, हिरवी, लाल, तांबडी, पिवळी, काळी, जांभळी आणि निळसर रंगाची माती आढळते. रायरीच्या पठाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात याठिकाणी वाहणारा रिव्हर्स वाटरफाॅल, पावसा ची पाणी पठारावरून खाली न पडता हवेच्या दाबामुळे ते उलट्या दिशेने वाहते. याच बरोबर रिव्हर्स व्हाॅइस पाँइट, सनसेट पाँइट, शिवकालीन तळे अशी अनेक पाहण्यासारखे पाँइट आहेत.
सप्तरंगाची माती
सप्तरंगाची माती


छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्वर:

       छत्रपती शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे २७ एप्रिल १६४५ रोजी याच रायरेश्वर पठारावरील रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले, रयतेस परकी आक्रमकांपासून गुलामगिरीपासून मुक्तता मिळवून दिली. मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले. याठिकाणी दिलेली स्वराज्याची संकल्पना संकल्पना पुढे अटक पासून कटक पर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार होण्यापर्यंत झाली.
       रायरेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवरायां बरोबर कान्होजी जेधे बाजी पासलकर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे येसाजी कंक सूर्याजी काकडे बापूजी मुदगल नरसप्रभू गुप्ते सोनोपंत डबीर हे बारा मावळातील सवंगडी शपथ वेळी उपस्थित होते. या शपथे नंतर मूठभर मावळ्यांनी दिल्ली व विजापूर या राजसत्तांना पाणी पाजले त्याच बरोबर सिद्धी इंग्रज पोर्तुगीज त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडून त्यांचा बंदोबस्त केला. याच मुळे मराठा साम्राज्य रायरेश्वर चा किल्ला व त्यावरील रायरेश्वर मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे.
ढाल तलवार
ढाल तलवार


रायरेश्वर ला जायचे कसे:

        रायरेश्वर ला जाण्यासाठी सर्वप्रथम भोर या शहरात यावे लागते. म्हणजे भोर हे मुख्य ठिकाण आहे. त्यामुळे कोणत्याही मार्गाने आल्यास भोर मधूनच रायरेश्वर रस्ता जातो.
टीटे धरण मार्गे
       पुण्याहून भोरमार्गे आंबवडे गावातून टिटे धरण मार्गे रायरेश्वरावर जाता येते. ही वाट तशी अवघड असून घाट रस्ता आहे.

रायरी मार्गे
       भोर‌ गावातून रायरी मार्गाने सुद्धा जाता येते. या मार्गावर भोर मधून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू आहे. या मार्गावरून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित वापर करणार असाल तर वेळापत्रक पाहून घ्यावे. या वाटेने गडावर जाण्यासाठी साधारण दोन तास लागतात.
गणेशमूर्ती
गणेश मुर्ती


केंजळ गडावरून श्वानदरा मार्गे किंवा सुंणदरा मार्गे ही रायरेश्वर असा ट्रेक पुर्ण करता येतो.

काय काळजी घ्यावी:
     रायरेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या पत्रांच्या शेड मध्ये मुक्कामाची सोय होऊ शकते.
     गडावरील वाडी मध्ये घरगुती जेवणाची व्यवस्था होऊ शकते.
  गडावर पाण्याची सोय असून गोमुख तळ्यात वर्षाचे १२ महिने शुध्द पाणी असते.


    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच...

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंब...

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सि...

माथेरान माहिती | matheran hill station

 माथेरान हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळा पैकी एक असल्याने या ठिकाणाला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात मुंबई व पुण्यापासून समान अंतरावर असल्याने शनिवार रविवार तसेच सूट्टीच्या दिवशी पर्यटकांची वर्दळ जास्त जाणवते. उन्हाळ्यामध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर नंतर माथेरान हे हक्काचे ठिकाण आहे माथेरान कुठे आहे:    माथेरान महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येत असून मुंबईपासून ११० किलोमीटर तर पुण्यापासून १२० किलोमीटर अंतरावर आहे हे ठिकाण मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्ग लगत आहे. सह्याद्री पर्वतरांगेच्या उपरांगेतील डोंगरमाथ्यावर वसलेले असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची ८०३ मिटर म्हणजेच २६०० कुठे एवढी आहे. माथेरानच्या बाहेरच प्रशस्त असे वाहत तळ असून या ठिकाणी वाहन लावून प्रवेश करावा लागतो, माथेरान मध्ये सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी असून याठिकाणी वाहतुकीसाठी पायी, घोडा, व प्रवासी सायकल टांगा यांचा वापर  माथेरानमध्ये फिरण्यासाठी करावा लागते. याचे सर्व नियोजन माथेरान गिरिस्थान नगर परिषदे मार्फत केली जाते.     ब्रिटिश अधिकारी ह्य...