मुख्य सामग्रीवर वगळा

तुंग किल्ला माहिती | Tung fort in Marathi

तुंग किल्ला
तुंग किल्ला प्रवेशद्वार

तुंग किल्ला

 किल्ल्याचे नाव:  तुंग /कठिण गड
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा:                पुणे
जवळचे गाव:      लोणावळा
उंची:                 ३०००फूट 
   
       महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहेत.त्यातीलच एक पवन मावळ! या प्रांतात निसर्गाची मनसोक्त उधळण पहायला मिळते, उंच डोंगर,धडकी भरवणारे उभे कडे,दऱ्यांतून वाहणारे पाणी, धबधबे अशा संपूर्ण वातावरणा मुळे आपसूकच पर्यटकांची पावले या भागात वळतात. याच पवन मावळात मराठ्यांच्या इतिहासातील अनेक महत्त्वाचे किल्ले आहेत.

तुंग किल्ला माहिती:

       पवन मावळात लोहगड, विसापूर, तुंग, आणि तिकोना हे किल्ले आहेत.यातील तुंग किल्लाची माहिती पाहत असताना त्यांचे भौगोलिक स्थान खूप महत्त्वाचे मानले जाते. पूर्वीच्या काळी बोरघाट या व्यापारी मार्गावर लक्ष देण्यासाठी व पवन मावळातील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत असे.

तुंग किल्ला कुठे आहे:

      सह्याद्री पर्वत रांगा ची उपरांग लोणावळा या डोंगररांगेत तुंग किल्ला बांधला आहे. तुंग किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये असून पुण्यापासून त्याचे अंतर ६१ किलोमीटर तर मुंबईपासून १३० किलोमीटर आहे. तुंग हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची ३००० फूट एवढी आहे.याला कठीणगड असे ही म्हणतात. कठीण गड या नावावरून किल्ला चढण्यासाठी अवघड आहे असे वाटू शकेल परंतु ट्रेकिंगच्या दृष्टीने गड सोपा समजला जातो. तुंग म्हणजे उतुंग! या किल्ल्यांची नैसर्गिक रचना वैशिष्टपूर्ण असल्यामुळे याला तटबंदीची गरज भासत नाही. पवना जलाशयाचा याला तिन्ही बाजूंनी वेढा आहे, तुंग आणि तिकोना हे जवळ जवळचे किल्ले असून काही पर्यटक तुंग तिकोना असा ट्रेक करतात.

तुंग किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:

        तुंग किल्ल्याचा प्रवास तुंग वाडी गावातून सुरू होतो. वाडीतून गडाकडे जाणाऱ्या वाटेवर भैरवनाथाचे मंदिर लागते. मंदिर तसे छोटे असले तरी सभामंडप प्रशस्त असून कौलारू छप्पराचा आहे. या मंदिरामध्ये पाच सहा जणांच्या राहण्याची सोय होऊ शकते.या मंदिराच्या आवारात काही अज्ञात विरांच्या विरगळी उभ्या पहायला मिळतात.या नक्की कोणाच्या असाव्यात हे जरी सांगता येत नसले तरी गावकरी यातील एका विरगळीला तुळाजीलाव असे संबोधतात.
तुंग किल्ला
पायरी मार्ग


        पायऱ्या चढून गेल्यावर सुरवातीला गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे,याचा जिर्णोद्धार करण्याची गरज आहे.
याच्या पोटामध्ये लगेच गडाचे दुसरे प्रवेशद्वार आहे.दोन्ही दरवाजांची रचना वैशिष्टपूर्ण असून जवळ गेल्याशिवाय ते दिसत नाहीत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या बैठकीसाठी देवड्या पाहायला मिळतात.
       दरवाजाच्या उजव्या बाजूस गणपतीचे छोटेसे मंदिर आहे. त्याच्या समोरील बाजूस काही जुन्या वस्तूंच्या बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात. मंदिराच्या मागील बाजूस खडकामध्ये एक मोठे टाके असून यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या दिल्या आहेत. याच्या बाजूलाच तटामध्ये बांधलेला टेहळणी बुरुज नजरेस पडतो. ह्यासारखे अजूनही इतर ठिकाणी तीन-चार बुरुज तसेच अन्य वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात.
कठिण गड
प्रवेशद्वार


       बालेकिल्ल्याच्या वाटेवर खडकात खोदलेले खांब टाके पहायला मिळतात , त्याचे पाणी मात्र पिण्यायोग्य नाही गाळ आणि कचरा मोठ्या प्रमाणात या टाक्यांमध्ये साठला आहे.
       बालेकिल्ला खूपच आटोपशीर असून चारी बाजूने उभा ताशीव कडा आहे. बालेकिल्ल्यावर तूंगाईचे मंदिर असून मंदिराला प्रदक्षिणा घालण्या एवढीच जागा पाहायला मिळते. याठिकाणी समोरील बाजूस उभ्या खडकामध्ये खोदलेली एक खोली पाहायला मिळते. या खोलीच्या आतील बाजूस हवा व प्रकाशासाठी झरोका पाहायला मिळतो. काहींच्या मते ही पाण्याची टाकी असावी. पावसाळ्या व्यतिरिक्त या ठिकाणी दोन-तीन जणांच्या मुक्कामाची सोय होऊ शकते.
       तुंग वरून तिकोना लोहगड विसापूर मोरगिरी पवना जलाशय तसेच लोणावळा पर्यंत सारा परिसर व्यवस्थित दिसतो.

तुंग किल्ल्याचा इतिहास:

       या किल्ल्याची निर्मिती कधी केली हे जरी निश्चित सांगता येत नसले तरी या किल्ल्याचे अस्तित्व प्राचीन असावे.मराठा इतिहासामध्ये तुंग किल्ल्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या मोहीमां पासून पाहायला मिळतो. मावळ प्रांतातील इतर किल्ल्याबरोबर इ.स. १६५७ मध्ये तुंग हे शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला. नेताजी पालकर याच मावळातील चौक या गावचे असल्याने त्यांना या प्रांताच्या सुरक्षेची जबाबदारी स्वप्नात आली होती.
कठिण गड
तुंग किल्ला बूरुज


       मे १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंग व दिलेरखानाने या भागात आक्रमण केले. या आक्रमणा वेळी त्यांना कोणताही गड काबीज न करता आल्याने त्यांनी गडाखालील अनेक गावे जाळली. ११ जून १६६५ सालच्या पुरंदर तहानुसार मोगलांना जे तेविस किल्ले द्यावे लागले त्यात तुंग चा ही समावेश होता. तहानुसार कुतुब खान व हलालखान याने या परिसरातील सारे किल्ले आपल्या ताब्यात घेतले.
       परंतु थोड्या दिवसांमध्ये मराठ्यांनी तुंग सह सर्व किल्ले पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतले.
       ताराबाईंनी कान्होजी आंग्रे यांना शाहू महाराजांवर हल्ला करण्यास भाग पाडले या अनुषंगाने आंग्रे कुलाबा येथून जे निघाले ते सपाट्याने अनेक प्रदेश व किल्ले जिंकत पुढे मावळा आले. त्यांनी तुंग सहित तिकोना लोहगड विसापूर हे महत्त्वाचे किल्ले जिंकून घेतले. शाहू महाराजांनी पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना अंग्रे चा सामना करायला मावळात पाठवले. पेशव्यांनी मुत्सद्दीपणाने अंग्रेंना शाहूंच्या पक्षात वळून घेतले, व तह करून सारे किल्ले शाहू ना परत मिळवून दिले.
       इ.स.१८१८ पर्यंत तुंग किल्ला मराठा साम्राज्य राहिला. इंग्रज-मराठा लढाईनंतर तो ब्रिटिशअधिपत्याखाली आला.



तुंगला जायचे कसे:

       तुंग गडावर जाण्यासाठी जे मार्ग आहेत ते तुंगवाडीतून आहेत. पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या लगत किल्ला असल्याने मुंबईकडून येणारे लोणावळ्यातून तर पुण्याहून येणारे मळवली तुन तुंगला जाऊ शकतात.
घुसळखांब मार्गे:
      लोणावळ्यातून कुर्वंडे घुसळखांब मार्गे जाता येते. हा मार्ग मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्यापासून जातो. लोणावळा बस स्थानकातून या मार्गावर  राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा सुरू आहे. घुसळखांब येथे उतरून पुढचा पाणी प्रवास करून गडावर जावे लागते. खाजगी गाडीने येणाऱ्यांसाठी हा रोड उत्तम आहे.

तिकोना पेठ मार्गे:
     तिकोना पेठेतून कामशेत मोरबे एसटी बससेवा सुरू आहे, या गाडीने तुंग फाट्याला उतरुन चाळीस मिनिटांचा पायी प्रवास करून तुंगवाडीत पोहोचता येते. खाजगी वाहनाने येणार असेल तर मळवली लोहमार्ग तिकोना पेठेतून पवना धरणाला वळसा मारून तुंगवाडीत पोहचतो येते.
     तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ब्राह्मणोली गावातून तुंग साठी लॉन्च सेवा सुरू आहे. या मार्गाने पवनेच्या जलाशयात नौका विहाराचा आनंद घेता येऊ शकतो.

मळवली किंवा लोणावळा जवळची रेल्वे स्थानके आहेत.

काय काळजी घ्यावी:
  •       तुंगवाडीत जेवण व नाश्त्याची सोय होऊ शकते.
  •       गडावर पाणी नसल्याने आपल्याबरोबर पाणी घेऊन जावे 
  •       सार्वजनिक वाहतूक वापर करणार असाल तर एसटी किंवा ट्रेनचे वेळापत्रक पहावे.
  •       गडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात मुक्कामाची सोय होऊ शकते.
  •       तुंग आणि तिकोना या दोन्ही किल्ल्यांचा ट्रॅक एका दिवसात पूर्ण होऊ शकतो.
   
कठिण गड
मंदिर



       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण