मुख्य सामग्रीवर वगळा

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

 

गोदावरी नदीची माहिती

उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर
एकूण लांबी  :            १४५६ किमी
महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी
नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी
राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश
गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे.
गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण करते त्यामुळे तिला जीवनदायिनी असे ही संबोधतात.

हे ही वाचा

कृष्णा नदी कोठे उगम पावते

गोदावरी नदीचा उगम कोठे होतो

    गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी डोंगरावर होतो. ब्रह्मगिरी डोंगरावर एका झऱ्याच्या रूपामध्ये उगम पावते. पुढे ती दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी बनते. ज्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो तिथे गंगा मातेचे छोटेखानी मंदिर व पाण्याचे कुंड आहे. उगम स्थानापर्यंत जाण्यासाठी डोंगरांमध्ये ६९० पायर्‍या चढून जावे लागते. ज्या झऱ्यातून गोदावरी उगम पावते त्याला गंगाद्वार असेही म्हणतात.
    गोदावरी नदी पूर्ववाहिनी असून सह्याद्री पर्वतरांगेमध्ये उगम पाऊन दख्खनच्या पठारावर पूर्वेकडे वाहत जाते तर पुढे जाऊन ती दक्षिणवाहिनी होते. दख्खनच्या पठारावर तिचे पात्र अरुंद तर प्रवाह वेगवान असतो. जसजशी दख्खनच्या पठारावर पुढे सरकत जाते तसतसा तिचा वेग मंदावतो व पात्र उथळ वरून होते काही ठिकाणी नदीचे पात्र तीन ते चार किलोमीटर एवढे भरते. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील समुद्रसपाटीपासुन उंची सरासरी उंची ४०० मीटर एवढी आहे. गोदावरी महाराष्ट्रात ६६८ किलोमीटरचा प्रवास करत असताना नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, चंद्रपूर,गडचिरोली या नऊ जिल्ह्यातून वाहते.
गोदावरी नदी पश्चिम घाटा पासून पुर्व घाटापर्यंत विविधतेने नटलेली आहे.सुरवातीला कमी पावसाचा दुष्काळी भाग तर पुढे सांग बांबूची वने,शेवटी गाळाचा त्रिभुज प्रदेश असे पहायला मिळते.
आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे गोदावरीवर नदीवर बांधलेला २.५ किमी लांबीचा मोठा रेल्वेपूल आहे. जवळच धवलेश्वरम् येथे या नदीवर १८५७ मध्ये बंधारा घातला आहे. त्याला अ‍ॅनिकट म्हणतात.  तेथूनच गोदावरीचा दक्षिणेकडे प्रवास सुरू होतो व याचं ठिकाणी त्रिभुज प्रदेश सुरू होतो. गोदावरी नदीचे वेगवेगळे नदी प्रवाह तयार होतात त्यात पूर्वेस गौतमी गोदावरी आणि पश्चिमेस वसिष्ठ गोदावरी असे दोन मुख्य प्रवाह असून वैनतेय हा आणखी एक प्रवाह आहे. त्रिभुज प्रदेशात गाळाची चांगल्या प्रतीची माती असल्याने येथे भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. गोदावरीच्या विगवेगळ्या प्रवाहांना कालव्यांद्वारे जोडले असून या कालव्यातून जलवाहतूक चालते. शेवटी हे गोदावरीचे प्रवाह यनम्, राझोले आणि नरसपूर यांच्याजवळ बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.

गोदावरी नदीचे अध्यात्मिक महत्त्व

    गौतम ऋषीं ब्रह्मगिरी पर्वतावर वास्तव्यास असताना त्यांच्या हातून चुकून  घडलेल्या गोहत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी भगवान शंकराची आराधना केली. या आराधने तून त्यांनी भगवान शंकराकडून त्यांनी गंगेला ब्रह्मगिरी पर्वतावर येण्याची विनंती केली. त्यानुसार गंगा ब्रह्मगिरी पर्वतावर आल्यावर गायीचा सांभाळ करणारी म्हणून तिचे नाव गोदावरी पडले. म्हणून गोदावरीला दक्षिणगंगा असेही म्हणतात. धार्मिक विधी करण्यासाठी हिंदू लोक देशभरातून  गोदातिरी येत असतात. कालसर्पयोग नारायण नागबळी पिंडदान यासारखे अनेक धार्मिक विधी नाशिक येथे गोदावरी तीरावर केले जातात. नाशिक नेवासे पैठण राजमहेंद्री कोटापल्ली असे अनेक धार्मिक तीर्थक्षेत्रे गोदावरी नदी काठावर आहेत. नाशिक येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो या वेळी देशभरातून लाखो भाविक गोदावरी मध्ये स्नान करण्यासाठी येत असतात. वनवासात असताना प्रभू श्रीरामांचे वास्तव्य गोदावरी तीरी होते.

गोदावरी नदीच्या उपनद्या

        गोदावरी नदी आपला १४५६ किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागरास मिळे पर्यंत तिला जागोजागी डावीकडून व उजवीकडून अनेक नद्या मिळतात.
उजवीकडून मिळणाऱ्या नद्या
   धारण, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, अंजना, गिरीजा, काबरा, दुधना, तेरणा, गिरणा,

डावीकडून मिळणाऱ्या नद्या
    शिवना, काम, आडवा, खेळणा, मन्याड, पुस, अरणा, वाघाडी, खुनी, सर, चुलबंद, कोणारी या नद्या गोदावरी ला येऊन मिळतात.

गोदावरी व तिच्या उपनद्या वरील धरणे

    गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते एकूण पाण्याच्या ८० टक्के पाणी पावसात वाहून जात असल्याने उर्वरित महिने नदीचे पात्र कोरडे पडते परिणामी शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवतो अशावेळी जलव्यवस्थापन करणे हा एकच पर्याय उरतो. गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असल्याने व ती 49% क्षेत्र व्यापत असल्याने तिच्यावरील जल व्यवस्थापन प्रकल्प महत्वपूर्ण ठरतात.

गंगापूर धरण

        गंगापूर धरण नाशिकपासून जवळच गंगापूर येथे गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे. गंगापूर धरण हे भारतातील पहिले मातीचे धरण आहे. गोदावरीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असलेले नाशिक जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे.

जायकवाडी प्रकल्प

        औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जल व्यवस्थापन प्रकल्प जायकवाडी येथे उभारण्यात आला आहे. याच्या जलाशयास नाथ सागर असे म्हणतात या धरणामुळे ४५ हजार हेक्टर एवढी जमीन ओलिताखाली आली आहे. जायकवाडी प्रकल्पाचा पूर्ण क्षमतेने वापर झाल्यास१ लक्ष ३२ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते. या प्रकल्पामुळे मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीवर काही प्रमाणात मात करणे शक्‍य झाले आहे.

उपनद्यां वरील धरणे

    तेरणा प्रकल्प पूर्णा प्रकल्प अप्पर पैनगंगा प्रकल्प भंडारा सिंचन प्रकल्प मुळा प्रकल्प अप्पर प्रवरा प्रकल्प पैनगंगा प्रकल्प मनार प्रकल्प कंधार प्रकल्प दुधना प्रकल्प मंजीरा नदी वरील निजामसागर प्रकल्प अप्पर इंद्रावती प्रकल्प जलापूट बंधारा असे अनेक छोटे-मोठे प्रकल्प गोदावरी नदीच्या उपनद्या वर आहेत.

गोदावरी खोऱ्यातील शेती व्यवस्था

      गोदावरी खोरे मध्ये पावसाचे प्रमाण वेगवेगळे असल्याने याठिकाणी पिकांमध्ये विविधता पाहायला मिळते त्यामध्ये ज्वारी भात कापूस उस तूर उडिद आंबा नारळ  संत्रा मोसंबी सोयाबीन बाजरी मका केळी तंबाखू साग ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या भागामध्ये पाण्याच्या उपलब्धतेमुळे बारमाही पीक पद्धती तसेच फळ शेती ही केली जाते. गोदावरी नदीमध्ये मत्स्य उत्पादन केले जाते.

   
   
     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्