मुख्य सामग्रीवर वगळा

लोहगड किल्ला माहीती

 लोहगड किल्ल्याची माहिती:

        ऐतिहासिक व निसर्ग संपन्न अशा पवन मावळात पवना धरणाच्या जलाशयाच्या सानिध्यात लोहगड किल्ला असून  पुणे मुंबई महामार्गा लगत.मळवली रेल्वे स्टेशन पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. लोहगड किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात आहे

 

       लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे पवन मावळातील महत्त्वाचे किल्ले.यातील लोहगड किल्ला प्रशस्थ, मजबूत आणि भक्कम आहे. लोखंडा सारखा कणखर असल्या मुळे लोहगड हे नाव शोभते .बोरघाट या प्राचीन व्यापारी मार्गाचे रक्षण करण्याची जबाबदारी लोहगडावर होती.हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून सुस्थितीत असलेल्या पायऱ्यांमुळे यांची चढन सोपी आहे.समुद्र सपाटी पासून गडाची साधारण उंची ३००० फुट आहे.पुणे आणि मुंबई पासून जवळ असल्यामुळे या किल्ल्यावर दुर्गप्रेमी आणि पर्यटकांचा राबता वर्षभर पहायला मिळतो.


किल्ल्यावर काय पहावे:

      गडावर जाण्यासाठी वाहन तळा पासून उत्तम पायऱ्या आहेत.सत्तर ऐंशी पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा पहीला दरवाजा लागतो याला गणेशदरवाजा असे म्हणतात. या दरवाजाच्या दोन्ही बाजूला गणपती च्या दगडात कोरलेल्या मुर्ती आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस दगडात कोरलेला शिलालेख आहे.येथेच उजव्या बाजूला बुरजा खाली सावळे कुटुंबाचा नरबळी दिला होता.त्या बदल्यात त्यांचा कुटुंबाला लोहगड वाडी ची पाटीलकी देण्यात आली होती. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच चार पाच तोफा दिसतात तसेच साठवणूक करण्याची बांधीव जागा दिसते व  बांधीव टेहळणी बुरूज आहे. बाजूचा दिंडी दरवाजातून टेहळणी बुरुजावर जाता येते.या बुरुजावर चोरदरवाजा व सैन्याचा वापरासाठी सौचालय आहे. तटबंदी वरुन पवनेचा जलाशय मन प्रसन्न करतो.  पाय-या तून  चालत वर गेल्यावर गडाचा दुसरा दरवाजा लागतो याला महादरवाजा असे म्हणतात. या दरवाज्यातून आपन गडाच्या दुसऱ्या तटबंदी वर जाऊ शकतो.येथून दिसनारे पहील्या तटबंदीचे आखीव रेखीव दृश्य मन प्रफुल्लित करते.पुन्हा पायरी मार्गाने चालत गेल्यावर धान्याचे कोठार दिसते. याचा वापर धान्य साठविण्यासाठी केला जात असे.


तिसरा दरवाजा

   पायऱ्यां तुन वर गेल्यावर गडाचा तिसरा दरवाजा लागतो याला नारायण दरवाजा असे म्हणतात.हा दरवाजा नाना साहेब पेशव्यांनी बांधून घेतला होता.या दरवाजाचा जवळच गडाचा मुख्य दरवाजा आहे.याला हनुमान दरवाजा असे म्हणतात हा किल्ल्याचा सर्वात जुना दरवाजा आहे. 

 

बालेकिल्ला

   दरवाज्यातून आत गेल्यावर गडाचा मुख्य भाग सुरू होतो. समोरच राजा राणी चे मंदिर (दर्गा)आहे. बाजूलाच सभागृहाचे अवशेष आहेत.किल्लावर अनेक पाणयाचे टाके आहेत.त्यातील फक्त एकाच टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे.समोर चालत जाताना लांबसर कडा दिसतो त्याला विंचू कडा असे म्हणतात.विंचवाच्या शेपटी प्रेमाने म्हनून विंचू कडा! विंचू कड्याकडे  जाणारा मार्ग निमुळता व घसरट असल्याने येथे लोखंडी कंपाऊंड मारले आहे.या कड्याची लांबी साधारण पंधराशे मीटर लांब व तिस मीटर रुंद आहे.या कड्याचा दोन्ही बाजूला बांधीव तटबंदी केली आहे विंचू काट्याच्या शेवटच्या टोकाला सौरक्षणासाठी दुहेरी तटबंदी व दिंडी दरवाजा आहे.

  किल्लावर पिरबाबांचा दर्गा आहे.तिथून पुढे शेरे बावडी (पाण्याचे टाके) आहे.पुढे जात राहिले की समोरच लेणी किंवा गुफा आहेत.त्यांना लक्ष्मी कोठी म्हणतात.ही गुफा मोठी आहे आत गेल्यावर सभामंडप व बावीस खोल्या आणि तळघर आहे.पुढे अष्टकोनी तलाव आणि महादेवाचे मंदिर लागते. मंदिरामध्ये समोरच हनुमानाचे ही मंदिर आहे.

लोहगड किल्ल्याचा इतिहास:

        लोहगड किल्ला कधी बांधला याचा काळ जरी सांगता येत नसले तरी, गडावर खोदलेली गुहा आणि बेडसे लेण्या या जा काळातील आहेत त्यांचा आधी हा गड बांधला असावा.या गडाने सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट यादव आदिलशाही,मोगल मराठा अशा अनेक राजवटी पाहिल्या.

    १४८९ मलीक अहमद ने निजामशाही ची स्थापना केली आणि सुरवातीला जे किल्ले जिंकले त्यामध्ये लोहगड किल्ला ही होता. १६३० मध्ये किल्ल्या आदिलशाही तर आला.

   १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी सरदार बाबाजी महादेव यांना कल्याण भिवंडी ची मोहीम सोपविली तेव्हा कल्याण भिवंडी पासून रायरीपर्यंतचा प्रदेश स्वराज्यात आला त्यावेळी कलावंतीण दुर्ग व विसापूर लोहगड हे किल्ले ही स्वराज्यात आले. १६६५ मध्ये मुगल सरदार राजा जयसिंग बरोबर झालेल्या पुरंदर तहात जे तेविस किल्ले मुघलांच्या स्वाधीन केले.त्यात लोहगड ही होता.पुढे १६७० मध्ये तह मोडून मराठ्यांनी लोहगड पुन्हा जिंकून घेतला.नेताजी पालकरांनी सुरत लुटेत आणलेली संपत्ती लोहगडावर ठेवली होती.


       शाहु महाराज छत्रपती झाल्यानंतर १७१३ मध्ये किल्ला कान्होजी आंग्रे यांना दिला.नंतर किल्ला पेशव्यांकडे गेला.१७७० मध्ये नानासाहेब पेशव्यांनी धोंडोपंत नित्सुरे यांच्यावर किल्ल्याची जबाबदारी टाकली.१७८९ मध्ये नानासाहेबांनी किल्ल्यावर बांधकाम करुन किल्ला आणखी मजबूत करुन घेतला.त्याच बरोबर किल्ल्यावर सोळा काणी  तलाव बांधला.   १८१८ साली जनरल प्राॅथर लोहगड जिंकण्यासाठी आला सुरवातीला लोहगड झुंजत होता परंतु  इंग्रजांनी विसापूर जिंकताच दुसऱ्या दिवशी मराठे गड उतार झाले व लोहगड ही पडला,व लोहगड ब्रिटीश अधिपत्या खाली आला.


लोहगड ला जायचे कसे:

      लोहगड ला जाण्यासाठी एसटी बस सेवा नाही परंतु तुम्ही जर सार्वजनिक वाहतूक वापरून जाणार असाल तर पुणे मुंबई लोहमार्गा वरील मळवली रेल्वेस्थानका वर उतरून एक्सप्रेस हायवे पारकरुन भाजे गावातून वाट  लोहगड वाडी दिड तास चालत गायमुख खिंडीत पोहोचतो . खिंडीतून उजवीकडे जाणारी वाट लोहगड लागले जाते तर डावीकडे जाणारी वाट विसापूर किल्ल्याकडे जाते.


       पुण्यातून जर कार किंवा दुचाकी ने येणार असाल तर पौड कोळवण तिकोना पेठ पवना धरणाच्या बाजूने लोहगड ला जाते तसेच पुणे मुंबई  जुन्या महामार्गावरुन कामशेत पवनानगर रोड ने काळे काॅलनी मार्ग लोहगड ला जाता येते. तसेच  पुणे मुंबई महामार्गावरील कार्ला फाट्या वरून डावीकडे वळून मळवली भाजे मार्गे लोहगड ला जाता येते.

      मुंबई वरून येणार असाल लोणावळ्यातून ट्रेन ने मळवली रेल्वेस्थानका उतरुन लोहगड लागले जाता येते. तसेच लोणावळ्यात खाजगी वाहन भाड्याणे मिळते. तसेच दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने येणार असाल तर कार्ला फाट्यावरून मळवली मार्गे लोहगड ला जाता येते.

काय काळजी घ्यावी:

         लोहगड ला वर्षभरात केंव्हाही जाऊ शकता. सार्वजणीक वाहतूक वापरणार असाल तर वैळापञक माहिती करून घ्यावे. गडावर जेवणाची किंवा नाष्ट्याची सोय नाही. पायथ्याशी जेवणाची किंवा नाष्टा सोय आहे. गडावर पाण्याची सोय आहे.


जवळची प्रेक्षणीय स्थळे:

  तिकोना किल्ला, विसापूर, तुंग, बेडसे लेणी, कार्ला लेणी 



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

कृपया नकारार्थी कमेंट टाळावे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण