मुख्य सामग्रीवर वगळा

प्रतापगड किल्ला माहीती | pratapgarh fort information in Marathi

प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे


    प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्या पैकी एक किल्ला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाचा पश्र्चिमेस २२कि. मी. अंतरावर पार व किनेश्वर च्या मध्ये भोरप्या डोंगरावर आहे. किल्लाची निर्मीती १६५७ ला छञपती शिवाजी महाराजांनी करून घेतल
Pratapgad fort
प्रतापगड किल्ला image

 प्रतापगड किल्लाची माहिती :
       पार्किंग पासून काही पायरी चढून गेल्यावर तटबंदी मध्ये लपलेला महादरवाजा लागतो तिथून उजव्या बाजूला टेहळणी बुरुज पहायला जाता येते या बुरुजावर अफझल खानाचे मुंडके पुरले होते. बुरूजावरून समोर अफझल खानाची कबर,तसेच पार हे सुंदर व ऐतिहासिक गाव दिसते या गावांमध्ये श्री राम वरदायिनी देवी मंदिर आहे. टेहळणी बुरूज बघीतल्या नंतर बाले किल्ला कडे जाताना महादरवाजा लागतो, शिवकालीन रिती प्रमाणे दरवाजा सुर्यास्था नंतर बंद केला जातो तर सुर्यास्था बरोबर उघडला जातो. तिथे छोटी छोटी दुकाने थाटली आहेत. 

महादरवाज्यातून आत गेल्यावर भक्कम बुरुज पाहून पायरी मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते.मंदिर भव्य व आकर्षक असुन  मंदिरातील भवानी मातेची मूर्ती छञपती शिवाजी महाराजांनी नेपाळ मधील गंडकी नदीतील शिळा आणुन घडउण घेतली आहे. मंदिरामध्ये भवानी मातेच्या मुर्ती बरोबरच महाराजांच्या पुजेतील स्फटिकातील शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. मंदिर परिसरात तोफा ठेवलेल्या आहेत.मंदीराच्या दक्षिण बाजूस हस्तकला दालन पहायला मिळते. मंदिरापासून पुढे गेल्यावर हणुमानाची मुर्ती दिसते. तिथुनच पुढे बालेकिल्ला चे प्रमाण.प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर केदारेश्वराचे मंदिर दिसते मंदिरातील शिवलिंग भ्रम दिव्य आहे.मंदिराचा बाजुला प्रशस्थ राज सदर आहे. व त्यांच्या मागिल बाजूस राजमाता जिजाऊंचा वाड्याचे अवशेष आहेत. तिथेच बाजूला बागेमध्ये छञपती शिवाजी महाराजांचा अतिभव्य अश्वारूढ पुतळा आहे. तिथेच पश्र्चिमेस तटबंदी वर जाऊन जावळी खोरे विहंगम दृश्य दिसते. तसेच शासकीय विश्रामगृहात,  राजघराण्याचा दिंडी दरवाजा आहे,जवळच रेडका बुरुज यशवंत व सुर्य बुरुज आहेत.
प्रतापगड किल्ला वरील तोफ

  प्रतापगडाचा इतिहास:
       प्रतापगडाचा इतिहास पाहिला तर १६५६ मध्ये चंद्रराव मोरे चा पराभव करून शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेतली. रडतुंडी घाट पार घाट यांचा तोंडावर भोरप्या डोंगर दिमाखात उभा पाहुन शिवाजी महाराजांनी या ठिकाणी किल्ला बाधण्याची आज्ञा पिंगळे यांना केली . पिंगळे यांनी आपले कौशल्य  पणाला लावून १६५८ साली किल्ला बांधुन पुर्ण केला,या किल्ल्याचा उद्देश जावळी खोरे व कोकणावर लक्ष ठेवणे हा होता
प्रतापगड किल्ला

अफजल खानाचा वध:
      विजापूर च्या बेगम ने शिवाजीचा बंदोबस्त करावा असे फर्मान सोडले याचा विडा उचलून (मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा) अफजल खान स्वराज्यावर चालून आला तो पंढरपूर शंभु महादेव मलवडी रहीमतपूर मार्ग वाईला दाखल झाला.  अफजल खान स्वराज्यत ज्या ज्या मार्गाने आला तिथे त्याने  मंदिर पाडने शेतीचे नुकसान करने असा उपद्रव करायला सुरुवात केली त्याचा असा अंदाज होता की या कारवायांना वैतागून शिवाजी महाराज आपल्याला समोरासमोर येतील व आपन त्यांचा सहज पराभव करु परंतु शिवाजी महाराजांच्या मनात अफजल खानाला रोखण्याची वेगळीच योजना आखली होती.शिवाजी महाराजांनी अफझल खानाला गोड बोलून प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यासाठी बोलावले. शिवाजी महाराजांना अफझल खानने मिठीत दाबून मारण्याचा प्रयत्न केला परंतु महाराजांनी आपल्या जवळील वाघ नख्यांनी खानाचा कोथळा बाहेर काढला.
 किंल्ला १६५८ ते १८१८ पर्यंत मराठी साम्राज्यात होता नंतर तो ईष्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला व भारतीय स्वातंत्र्य नंतर तो१९४७ साली भारताच्या ताब्यात आला . प्रतापगड किल्ला खाजगी असुन तो छञपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा मालकीचा आहे. 
 प्रतापगड ला जायचे कसे:
       प्रतापगड ला दोन मार्गांनी जाता येते वाई महाबळेश्वर मार्गे व महाड पोलादपूर महाबळेश्वर मार्गे . महाबळेश्वर मधून टॅक्सी ने प्रतापगड ला जाता येते. तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून महाबळेश्वर लागले  ST BUS सुविधा आहे.
प्रतापगड पाहायला जाताना काय काळजी घ्यावी:
      प्रतापगड किल्ला तुम्ही वर्षा तिला कोणत्याही ऋतूत महिन्यात पाहु शकता तसेच जेवण नाष्टा करण्यासाठी हॉटेल आहेत जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करनार असाल तर त्याबद्दल माहिती आधीच घ्यावी, किंवा महाबळेश्वर मधून टॅक्सी ने प्रतापगड ला जावे.


जवळची प्रसिद्ध ठिकाणे:
          पार महाबळेश्वर, तापोळा, पाचगणी





      

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

कृपया नकारार्थी कमेंट टाळावे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण