मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजगड किल्ला माहिती | स्वराज्या ची पहीली राजधानी

राजगड किल्ला माहिती        राजगड म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी ते स्वराज्याची सर्वाधिक काळ राजधानी राहिला किल्ला यामुळे राजगड दुर्गराज म्हणून शोभतो. हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत राजकारणाचे केंद्रबिंदू राहिलेला किल्ला शिवाजी महाराजांच्या दुर्गबांधणी कलेचा उत्तम उदाहरण म्हणजे राजगड.गडांचा राजा राजांचा गड म्हणून शोभतो,म्हणून राजगड किल्ला माहिती पाहू राजगड किल्ला      राजगड किल्ला शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने व राजकीय केंद्रबिंदू असल्याने अनेक घटनांचा साक्षीदार राहिला आहे जसे की सर्वाधिक काळ म्हणजे 26 वर्ष राजगडावर स्वराज्याची राजधानी होती या कालखंडामध्ये आखले गेलेले अनेक राजकीय डावपेच असतील मोहिमा किंवा नरवीर तानाजी मालुसरे यांनी सिंहगड मिळवण्यासाठी आखलेली मोहिम असो अशा अनेक घटना राजगडावर घडल्या      शिवाजी महाराजांच्या पत्नी व शंभूराजे यांच्या मातोश्री सईबाई यांचे निधन याच किल्ल्यावर ५ सप्टेंबर १६५६ रोजी झाले.     शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराजांचा जन्म किल्ल्यावर २४ फेब्रुवारी १६ ७० रोजी झाला.  राजगड किल्ला कुठे आहे:         पुणे जिल्ह्यातील भोर वेल्हे तालुक्याच्या

चंदन लागवडी ची माहिती

चंदन लागवड माहिती:      पारंपरिक शेती मध्ये आज अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे.बियाणे खते मजूर व उत्पादीत मालाला मिळणारा बाजार भावा यामध्ये ताळमेळ बसत नाही अशा वेळी शेतीमध्ये नव नवीन प्रयोग करून शेती मधून कसा फायदा माळवता येईल हे पाहणे गरजेचे आहे. अशा वेळी फळ पिके, सागवान, बांबू ,चंदन यांची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवता येईल. त्यामुळे आज चंदन लागवड माहिती करून घेणे गरजेचे आहे. चंदन पावडर व तेल सौंदर्य प्रसादन उद्योगा मध्ये वापरत असल्याने चंदनाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  चंदनाचे प्रकार:       श्वेत चंदन व रक्त चंदन असे चंदनाचे दोन प्रकार असून  दोन्ही प्रकार भारतात कमी जास्त प्रमाणात आढळून येतात.  त्यांचे वेगवेगळे उपयोग आहेत त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेता येईल. श्वेत चंदन झाडाची माहिती:      श्वेत चंदन लागवड जास्त फायदेशीर ठरते कारण त्यांचा अनेक प्रकारे उपयोग होतो.चंदन उष्ण कटिबंधीय वातावरणात जिथे ४५ अंश तापमान आहे अशा प्रदेशात चांगल्या प्रकारे वाढते. चंदनाला थंडी सोसवत नाही.         चंदन हे सदाहरित वृक्ष असून त्याची पाने वर्षभर हिरवीगार राहतात व पानगळ होत नाही.

२६ जानेवारी रोजी महाराष्ट्राचा भक्तीशक्ती संगमावर आधारित चित्ररथा

 २६ जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथावर "वारकरी संतपरंपरा" दिसणार.  महाराष्ट्राच्या वतीने 'वारकरी संतपरंपरा' व भक्तीशक्ती संगम यावर  आधारित चित्ररथ यावर्षी ७२व्या प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी २०२१) रोजी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलना मध्ये पहायला मिळेल. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी,याच संतपरंपरेने समाज सुधारणेची अनेक कामे केली या मध्ये संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज, संत नामदेव, बहीणाबाई, चोखामेळा गाडगेबाबा, यांनी आपल्या लेखनी आणि कृतीतून जाती व्यवस्था, अंधश्रद्धा, सामाजिक विषमता या बद्दल आवाज उठवला,  पुरोगामी महाराष्ट्र जो आज आपण पाहतो तो याच संतांच्या समाज सुधारणेच्या कायद्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे समाजाला गुलामगिरी तून मुक्त केले व रयतेचे राज्य निर्माण केले.कष्टकरी व शेतकरी सुखी व्हावा यासाठी जे स्वराज्य निर्माण केले. याच धर्तीवर या वर्षी राजपथावर संतपरंपरेचे भक्ती  शक्तीचे  दर्शन घडवणारा चित्ररथ सहभागी केला जाणार आहे.  ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस हीच संतपरंपरा दर्शवणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

शिंदे छत्री वानवडी पुणे | महादजी शिंदे समाधी

शिंदे छत्री:         पुणे शहरामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. ज्या पुण्याच्या ऐतिहासिक व संस्कृती श्रीमंतीचे दर्शन घडवतात. त्यातीलच एक म्हणजे शिंदे छत्री.पुण्या जवळील वानवडी येथे १८ वरच्या शतकातील मराठा साम्राज्या तील मुसद्दी सरदार महादजी शिंदे यांचे समाधी स्थळ आहे, या लाच शिंदे छत्री म्हणतात. शिंदे छत्री काही महत्व्त्वाचे  थिबा पॅलेस रत्नागिरी महादजी शिंदे:       पानिपत चर्या लढाई नंतर मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी देऊन गतवैभव प्राप्त करून देण्यात महादजी शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता.पानिपता नंतर अवघ्या दहा वर्षांत म्हणजेच १७७१ मध्ये दिल्लीवर पुन्हा भगवा फडकवून उत्तरेत मराठ्यांचा दबदबा निर्माण करण्यात महादजी शिंदे यांचे मोठे योगदान होते.इंग्रज मराठा प्रथम युध्दात ब्रिटिशांना तह करण्यास त्यांनीच भाग पाडले.       १३ फेब्रुवारी १७९४ रोजी महादजी शिंदे यांचा मृत्यू पुण्याजवळील वानवडी येथे झाला.वानवडी येथे बहिरोबा नाल्याच्या काठावर शिंदे यांनी शंकराचे मंदिर बांधले होते.याच मंदीराच्या परिसरा मध्ये महादजी शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.त्याच ठिकाणी त्यांच्या स्मृती प्रित्यर्

चंदन वंदन किल्ला माहिती

  चंदन वंदन गड किल्ला माहिती:    चंदन-वंदन हे किल्ले सातारा जिल्ह्यातील वाई व कोरेगाव सीमेवर आहेत हे दोन्ही किल्ले गिरिदुर्ग प्रकारातील असून किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ३८०० फूट एवढी आहे.या किल्लांची चढाई मध्यम स्वरूपाचे असून ट्रेकिंगच्या दृष्टीने दोन्ही किल्ले सोपे समजतात. वंदन गड किल्ला प्रवेशद्वार       वंदन गड हा चंदनगड पेक्षा उंच असून याचे पाच टप्प्यांमध्ये विभाजन होते तर वंदन गडचे तीन टप्प्यांमध्ये. महाराष्ट्रा मध्ये जे शेजारी शेजारी किल्ले आहेत त्यांच्यामध्ये या दोन्ही किल्ल्यांचा समावेश होतो.       गिरिदुर्ग बांधत असताना शेजारी कोणती ही टेकडी किंवा पर्वत नसावा असा प्रघात आहे, कारण यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जर शेजारी पर्वत असेल तर त्याला फोडून नष्ट करावे किंवा टेकडीवर बांधकाम करून ती जागा सुरक्षित करून घ्यावी जेणेकरून मुळ किल्ल्याला यापासून कोणताही धोका उद्भवणार नाही. पर्वतावरील दुर्ग जोड्या महाराष्ट्रात पुरंदर-वज्रगड लोहगड विसापूर राजमाची श्रीवर्धन आदी ठिकाणी आपल्याला दिसून येतात. चंदन वंदन गड  कुठे आहे:        चंदन वंदन किल्ले सातारा पासुन २४

धर्मवीर गड | बहाद्दुर गड | धर्मवीर गड कुठे आहे

धर्मवीर गड बहाद्दुर गड: भीमा नदीच्या उत्तर तीरावर असलेला बहाद्दुर गड किल्ला हा भुईकोट प्रकारातील आहे या किल्ल्याला बहाद्दुर असे म्हणत असले तरी याचे कागदपत्रे नाव पांडे पेडगावचा किल्ला आहे बहाद्दूर गड /धर्मवीरगड हे या किल्ल्यावर धर्मवीर छत्रपती  शंभूराजांच्या बलिदानामुळे या किल्ल्याचे २००८ मध्ये नामकरण धर्मवीरगड असे करण्यात आले   हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव या गावांमध्ये भीमा नदीच्या उत्तर तीरावर आहे. धर्मवीर गड धर्मवीर गड किल्ला माहिती धर्मवीरगड किल्ल्याचा आकार आयताकृती असून भीमा न बहाद्दूर गड /धर्मवीरगड नदीला समांतर असून११० एकर विस्तार असलेल्या किल्ल्यात सध्या गाव वसलेले आहे किल्ल्याच्या आसपासचा परिसर भीमा नदीच्या प्रवाहामुळे अतिशय सुंदर दिसत असून पाहातच राहावे असे वाटते      स्थलदुर्ग प्रकारातील या किल्ल्याला तिन प्रवेशद्वार आहेत परंतु महामार्गाच्या बाजूकडील दरवाजा त्याच्या भव्यतेमुळे मुख्य प्रवेश द्वार असावा असे वाटते या गावात प्रवेश करताना वेशीवरील स्वागत कमान आपल्या स्वागताला उभे असल्याचा भास होतो किल्ल्यामध्ये अनेक मंदिरे व वास्तू असून त्यातील काह

वर्धनगड किल्ला | vardhangad fort

वर्धनगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे  :    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला वर्धनगड किल्ला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असून सातारच्या ईशान्य दिशेला ३३ किलोमीटर तर कोरेगाव पासून साधारण १४ किलोमीटर अंतरावर आहे.         किल्ल्या साधारण १६०० फूट उंच असून ट्रेकिंगच्या दृष्टीने सोपा समजला जातो.सह्याद्रीच्या पर्वत रांगेची महादेव डोंगर रांग जी माणदेशातून फिरली आहे तिच्यावर हा किल्ला बांधला आहे.वर्धनगड, महिमानगड, संतोषगड व वारुगड हे माणदेशीचे मुख्य किल्ले आहेत.यातील वर्धनगड हा घाटाचा पहारेकरी म्हणून ओळखला जातो.   वर्धनगड किल्ला सातारा         वर्धनगड किल्ल्याचा इतिहास:        वर्धनगड कोणत्या कालखंडामध्ये बांधला हे जरी सांगता येत नसले तरी मराठ्यांच्या इतिहासात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.        शिवरायांनी अफझलखानाच्या वधानंतर पन्हाळ्या पर्यंत चा सारा मुलुख स्वराज्यात आणला त्याच वेळी वर्धनगड ही स्वराज्यात आला. १६६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वर्धनगड किल्ल्यावर एक महीना मुक्कामी होते. महाराजांनी इ.स. १६७३ - १६७४ मध्ये या किल्लाची पुनर्बांधणी करून किल्ला मजबूत क

अजिंक्यतारा किल्ला | ajinkyatara fort information in Marathi

अजिंक्यतारा किल्ला कोठे आहे:           अजिंक्यतारा हा सातारा जिल्ह्यात असून स्वराज्याची चौथी राजधानीचा मान मिळाला किल्ला पहिला राजगड दुसरा रायगड तिसरा जिंजी तर चौथा अजिंक्यतारा. किल्ल्याची उंची ३०० मीटर असून किल्ला मध्यम आकाराचा आहे, त्यामुळे ट्रेकिंगच्या दृष्टीने सोपा समजला जातो.तो सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. सातारा शहराच्या कोणत्याही भागातून किल्ला सहज नजरेस पडतो विशेषतः लिंबू खिंडीतून किल्ल्यावरील नावाचा बोर्ड लक्ष वेधून घेतो. अजिंक्यतारा किल्ला माहिती:       सह्याद्रीच्या डोंगर रांगेची बामनोली ही उपरांग जी प्रतापगड पासून ती पुढे सातारा पर्यंत येते तिच्यावर तिच्यावर किल्ला बांधला आहे. या भागात बरेच किल्ले असले तरी ते एकाच डोंगररांगेत येत नसल्याने त्यांना जोडणारी कोणते डोंगरान पाहायला मिळत नाही . किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शाहू महाराजांनी १७२१ मध्ये शाहूनगर बसवले मराठ्यांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राजधानी किल्ल्यावरून खाली नेली. अजिंक्यतारा किल्ला फोटो हे ही वाचा :  बारा मोटेची विहीर सातारा                 पाटेश्वर मंदिर देगाव  अजिंक्यतारा किल्ल्याचा इतिहास