मुख्य सामग्रीवर वगळा

वर्धनगड किल्ला | vardhangad fort

वर्धनगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे :

   छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला वर्धनगड किल्ला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असून सातारच्या ईशान्य दिशेला ३३ किलोमीटर तर कोरेगाव पासून साधारण १४ किलोमीटर अंतरावर आहे.

        किल्ल्या साधारण १६०० फूट उंच असून ट्रेकिंगच्या दृष्टीने सोपा समजला जातो.सह्याद्रीच्या पर्वत रांगेची महादेव डोंगर रांग जी माणदेशातून फिरली आहे तिच्यावर हा किल्ला बांधला आहे.वर्धनगड, महिमानगड, संतोषगडवारुगड हे माणदेशीचे मुख्य किल्ले आहेत.यातील वर्धनगड हा घाटाचा पहारेकरी म्हणून ओळखला जातो.
 

वर्धनगड किल्ला सातारा

       

वर्धनगड किल्ल्याचा इतिहास:

       वर्धनगड कोणत्या कालखंडामध्ये बांधला हे जरी सांगता येत नसले तरी मराठ्यांच्या इतिहासात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
       शिवरायांनी अफझलखानाच्या वधानंतर पन्हाळ्या पर्यंत चा सारा मुलुख स्वराज्यात आणला त्याच वेळी वर्धनगड ही स्वराज्यात आला.१६६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वर्धनगड किल्ल्यावर एक महीना मुक्कामी होते.महाराजांनी इ.स. १६७३ - १६७४ मध्ये या किल्लाची पुनर्बांधणी करून किल्ला मजबूत करून घेतला.
 
      छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदाना नंतर औरंगजेब स्वराज्यातील अनेक किल्ल्यावर आक्रमण करून काबीज करत असताना, १ मे १७०१ मध्ये पन्हाळा जिंकून आपला मोर्चा साताऱ्यातील किल्लांकडे वळवला.वर्धनगड हा मोक्याचा किल्ला असल्याने मोगलांचे लक्ष या किल्ल्याला गेले याची खबर किल्लेदालाला लागताच त्याने आपला वकील मोगल सरदार फत्तेउलखान कडे पाठवून 'प्राणाचे अभय मिळत असेल तर आम्ही किल्ला खाली करू' असा संदेश पाठवला.होणारा हल्ला पुढे ढकलून गडाखालील लोकांना गडावर घेणे तसेच दारुगोळा व सैन्याची जुळवाजुळव करून गड झुंजता करणे असा उद्देश होता.

 

    गडावरुन कोणताही संदेश येत नाही किंवा हालचाल ही दिसत नाही. हे पाहून फत्तेउल खानाने किल्ल्यावर हल्ला चढवला त्यास गडावरील मराठ्यांनी चौक उत्तर दिले यामध्ये मोगलांचे बरसने मारले गेले. मोगली सैन्याने गडाखालील वाड्या वस्त्यांना आग लावली त्यामध्ये ४० मराठी लोक पकडण्यात आले. मराठा सैन्याचे ही यावेळी नुकसान झाले होते काही मारले गेले होते तर काही जखम होते. शेवटी 19 जून रोजी मराठ्यांनी वर्धनगड खाली केला.

Vardhangad fort


       मोगलांनी गडावरील संपत्ती जप्त केली त्यामध्ये धान्य तोफा बंदुकीची दारू चाळीस मन सोरा यांचा समावेश होता. किल्ल्यावर मोगली पताका फडकवून किल्ल्याचे नाव सादिकगड असे केले.
 

      सप्टेंबर १७०४ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला व किल्ल्याचा किल्लेदार किशोर सिंग ला कैद केले परंतु मोगली सैन्याने पुन्हा ऑक्टोबरमध्ये गडावर आपला अंमल बसवला.
       इ.स. १७०७ मध्ये मराठा सैन्याने किल्ला जिंकून घेतला व पुढे इ.स.१८१८ पर्यंत किल्ला मराठा साम्राज्य मध्ये होता. ॲंग्लो मराठा तिसऱ्या युद्ध नंतर तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला.
      

वर्धनगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:

      वर्धनगड गावच्या वेशीवरच दोन तोफा ठेवलेल्या दिसतात. गडाच्या पूर्व दिशेच्या वर्धनगड गावातून गडावर जाण्यासाठी प्रशस्त अशी पायवाट आहे. गडाचे महाद्वार पूर्वाभिमुख असून त्याची अशी रचना केली गेली आहे की कोणाच्याही सहज नजरेस पडणार नाही व दरवाजावर तोफांचा मारा होणार नाही. दरवाजाच्या बाजूलाच शेंदूर फासलेल्या देवाच्या मूर्ती आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत व दरवाजाच्या वरील बाजूस मजबूत असा बुरुज आहे. 

      किल्ल्याची तटबंदी चौफेर असून आजही मजबूत आहे. महाराष्ट्रातील भक्कम व सुस्थितीत तटबंदी असणाऱ्या किल्ल्यांच्या यादीत याचाही समावेश होतो पायर्‍या वर चढून गेल्यानंतर डाव्या बाजूला तटावरून पुसेगाव पर्यंत सारा प्रदेश नजरेस पडतो. गडाच्या मधोमध टेकडीवर  असणारे वरदायिनी माते चे मंदिर लक्ष वेधून घेते. या मंदिराकडे जात असताना  हनुमानाची मूर्ती, महादेवाचे मंदीर व छोटे पाण्याचे टाके वाटेत लागते  मंदिराकडे जाणारी पायवाट चांगलीच मळलेली असून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट लागतात.
    

   वरदायिनी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याने मंदिर आकर्षक दिसते. मंदिरातील देवीची मूर्ती चतुर्भुज असून तिच्या हातामध्ये विविध आयुधे आहेत. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून दगडी बांधकामामुळे आत मध्ये गारवा जाणवतो. मंदिराच्या भोवताली चौथरा बांधलेला आहे.
 

Vardhangad fort
वर्धनगड किल्ला 

   

   किल्ल्यावरून फिरत असताना गडावर ठीक ठिकाणी बांधकामाचे अवशेष व चौथरे पाहायला मिळतात तसेच पाण्याच्या टाक्या. तटबंदीवर जागोजागी बुरुज, जंग्या, ढाल काठी बुरुज, बुरुजा मधील चोर दरवाजा, चुन्या चे घाणे, अशा सार्‍या वस्तू व ऐतिहासिक खुणा पाहायला मिळतात.
      

वर्धनगड ला कसे जावे:

        वर्धनगड किल्ला सातारा पंढरपूर राज्य महामार्गावर असून, सातारा बसस्थानकातून पंढरपूर, गोंदवले, दहिवडी, निढळ ला जाणाऱ्या बसेस वर्धनगड मार्गे जातात. 

      खाजगी वाहन जाणार असाल तर सातारमधील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून कोरेगाव ला जाणाऱ्या रस्त्याने जावे लागते. कोरेगाव पासून पुढे गेल्यानंतर घाट चढून वर गेल्यावर डावीकडेच वर्धनगड गावच्या वेशीवर दोन तोफा ठेवलेल्या दिसतात. तिथून आत मध्ये गडावर जाण्याची वाट आहे.
        फलटण किंवा दहिवडी मार्गे येणाऱ्यांसाठी पुसेगाव वरून वर्धनगड ला जाता येते. पुसेगाव फलटण नियमीत बससेवा सुरू आहे. पुसेगाव ते गड साधारण पाच किलोमीटर आंतर आहे.

काय काळजी घ्यावी:

  •       गडावरील वरदायिनी माता मंदिरात दहा ते पंधरा जणांच्या राहण्याची सोय होऊ शकते.
  •       उन्हाळ्यामध्ये गडावर पाण्याची सोय नसल्याने पाणी बरोबर घेऊन जावे.
  •       गड पाहण्यासाठी दोन तासाचा अवधी पुरा आहे.
  •       जेवण व नाश्त्याची सोय गडाच्या खाली होऊ शकते.
  •       जवळच असणारे पुसेगाव मधील सेवागिरी महाराज मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकता.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण