मुख्य सामग्रीवर वगळा

चंदन लागवडी ची माहिती

चंदन लागवड माहिती: 

    पारंपरिक शेती मध्ये आज अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे.बियाणे खते मजूर व उत्पादीत मालाला मिळणारा बाजार भावा यामध्ये ताळमेळ बसत नाही अशा वेळी शेतीमध्ये नव नवीन प्रयोग करून शेती मधून कसा फायदा माळवता येईल हे पाहणे गरजेचे आहे. अशा वेळी फळ पिके, सागवान, बांबू ,चंदन यांची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवता येईल. त्यामुळे आज चंदन लागवड माहिती करून घेणे गरजेचे आहे. चंदन पावडर व तेल सौंदर्य प्रसादन उद्योगा मध्ये वापरत असल्याने चंदनाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 

चंदनाचे प्रकार:

      श्वेत चंदन व रक्त चंदन असे चंदनाचे दोन प्रकार असून  दोन्ही प्रकार भारतात कमी जास्त प्रमाणात आढळून येतात.  त्यांचे वेगवेगळे उपयोग आहेत त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेता येईल.

श्वेत चंदन झाडाची माहिती:

     श्वेत चंदन लागवड जास्त फायदेशीर ठरते कारण त्यांचा अनेक प्रकारे उपयोग होतो.चंदन उष्ण कटिबंधीय वातावरणात जिथे ४५ अंश तापमान आहे अशा प्रदेशात चांगल्या प्रकारे वाढते. चंदनाला थंडी सोसवत नाही. 
       चंदन हे सदाहरित वृक्ष असून त्याची पाने वर्षभर हिरवीगार राहतात व पानगळ होत नाही.
       कर्णाटक, आंध्र प्रदेश,केरळ, तमिळनाडू,व महाराष्ट्रातील काही भागांत चंदन नैसर्गिक रित्या आढळतो.
मुख्यत्वे करून दक्षिण भारतातील हवामान त्याच्या वाढीस अनुकूल आहे.
    चंदन तेलाचा व पावडर चा उपयोग अगरबत्ती,साबन, सुगंधी द्रव्ये, आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी केला जातो.

रक्त चंदन झाडाची माहिती: 

     रक्त चंदन ही लागवडीच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते परंतु त्याला काही मर्यादा आहेत. रक्त चंदन हा पानझडी वनामध्ये आढळणारा वृक्ष आहे. याला वार्षिक सरासरी १००० मिमी पाऊस असेल तरी याला पुरे होतो.
     उष्ण व कोरडे हवामान यांच्या वाढी साठी उपयुक्त आहे. निचरा होणा-या जमीनीत यांची चांगल्या प्रकारे वाढ होते.
     आंध्र प्रदेश, तमिळनाडू,कर्णाटक, तेलंगणा, या राज्यांमध्ये रक्त चंदनाची लागवड दिसून येते.
     यांच्या लाकडाचा उपयोग औषधे, फर्निचर,लेप,वाद्य निर्मिती मध्ये केला जातो.

चंदनाचा उपयोग आणि महत्त्व:

      चंदनाच्या लाकडाचा अनेक प्रकारे उपयोग होत असल्याने याला खूप महत्त्व आहे.
      होम हवन पूजा यासारख्या अनेक धार्मिक कार्यामध्ये चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला जातो.
      चंदनाचे इतरही आरोग्यदायी फायदे मिळतात
      त्वचा तेलकट व काळवंडत असेल तर गुलाब पाण्यामध्ये चंदन मिसळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास चेहरा  मऊ गोरा होण्यास मदत होते व व चेहऱ्याला तेली होत नाही.
      पाय मुरगळला असेल तर रक्तचंदनाचा लेप सूज आलेल्या जागी लावल्यास सूज कमी होण्यास मदत होते.
      डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार झाले असेल तर आठवड्यातून तीन वेळा चंद्रोदय लेप लावून चेहरा स्वच्छ करून पाण्याने धुतल्यास डोळ्याखालील काळे वर्तुळे कमी होतात.
      तान तनाव किंवा थकवा जाणवत असल्यास चंदनाच्या तेलाने मालिश करून आंघोळ केल्यास थकवा नाहीसा होतो.
      चंदनाचा उपयोग अगरबत्ती परफ्युम कॉस्मेटिक व साबण बनवणाऱ्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो.

चंदन लागवड कशी करावी:

      लागवडीसाठी जमिनीची निवड करत असताना दोन ते तीन फूट सहज खोदता येईल अशा जमिन निवडावी.
      ज्या ठिकाणी कडुलिंब व बाभळीचे झाडे असतील अशी जमीन चंदन लागवड साठी योग्य आहे.
      हलकी मध्यम पोटाची लाल काळी माती व पाण्याचा निचरा होणारी जमीन चंदन लागवडीसाठी उपयुक्त आहे.
      चंदन लागवड करण्यापूर्वी जमिनीच्या मशागतीचे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
      नांगरट व रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत करून घ्यावी त्यामुळे ड्रिप इरिगेशन चे पाणी जमिनीत खोलवर जाऊन मुळांना भेटेल.
      साधारण 12 बाय 12 फुटावर दीड फूट खोलीचे खड्डे लागवडीच्या एक महिना आधी करून त्यांना तापू द्यावे.
      लागवडीच्या वेळी खड्ड्यामध्ये 100 ग्रॅम निंबोळी पेंड व योग्य प्रमाणात कंपोस्ट खत टाकावे.
      ऑगस्ट ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये कोणत्याही महिन्यात चंदन लागवड केली जाऊ शकते.
      चंदन हा परोपजीवी वृक्ष असल्याने त्याच्या वाढीसाठी सहयोगी वृक्षाची आवश्यकता असते.
      लागवड केल्यानंतर चंदनाच्या रोपाभोवती तुरीची रोपे लावावी जेणेकरून चंदनाच्या वाढीस मदत होईल.
      चंदना बरोबर डाळिंब पेरू करवंद सीताफळ यासारख्या सहयोगी पिकांची दोन्ही रोपांच्या मध्ये लागवड करावी.

चंदन लागवडी संबंधी परवानगी:

  •       चंदन हे संरक्षित वन्य प्रजाती असून तिच्या तोडण्यास प्रतिबंध असून कायदेशीर गुन्हा म्हणतो.
  •       खाजगी जमिनीमध्ये व्यवसायिक चंदन लागवड केली असेल तर त्याची सातबारा नमुन्यामध्ये नोंद करावी लागते.
  •       शक्य असल्यास स्थानिक वन अधिकाऱ्याचा लागवडीबाबत चा दाखवा घ्यावा.
  •       चंदन तोडण्या संबंधी विभागीय वन अधिकाऱ्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.
  •       पुन्हा लागवड करणार असल्याचे  रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र द्यावे लागते.
      
     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण