मुख्य सामग्रीवर वगळा

अजिंक्यतारा किल्ला | ajinkyatara fort information in Marathi

अजिंक्यतारा किल्ला कोठे आहे:

          अजिंक्यतारा हा सातारा जिल्ह्यात असून स्वराज्याची चौथी राजधानीचा मान मिळाला किल्ला पहिला राजगड दुसरा रायगड तिसरा जिंजी तर चौथा अजिंक्यतारा. किल्ल्याची उंची ३०० मीटर असून किल्ला मध्यम आकाराचा आहे, त्यामुळे ट्रेकिंगच्या दृष्टीने सोपा समजला जातो.तो सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. सातारा शहराच्या कोणत्याही भागातून किल्ला सहज नजरेस पडतो विशेषतः लिंबू खिंडीतून किल्ल्यावरील नावाचा बोर्ड लक्ष वेधून घेतो.

अजिंक्यतारा किल्ला माहिती:

      सह्याद्रीच्या डोंगर रांगेची बामनोली ही उपरांग जी प्रतापगड पासून ती पुढे सातारा पर्यंत येते तिच्यावर तिच्यावर किल्ला बांधला आहे. या भागात बरेच किल्ले असले तरी ते एकाच डोंगररांगेत येत नसल्याने त्यांना जोडणारी कोणते डोंगरान पाहायला मिळत नाही .
किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शाहू महाराजांनी १७२१ मध्ये शाहूनगर बसवले मराठ्यांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राजधानी किल्ल्यावरून खाली नेली.
अजिंक्यतारा किल्ला फोटो
हे ही वाचा : बारा मोटेची विहीर सातारा
                पाटेश्वर मंदिर देगाव 

अजिंक्यतारा किल्ल्याचा इतिहास

       सातारा किल्ला ११९० मध्ये शिलाहार राजा पहिला भोज याने बांधला. बहामनी सत्तेच्या उदयानंतर हा किल्ला बहामनी सत्तेच्या अधिपत्याखाली आला. बाहामनी सत्तेच्या विभाजनानंतर आदिल शाही अंमल सुरु झाला. किश्वरखान या सरदारांने पहिल्या आदिलशहाची बेगम चांदबिबी हिला १५८२ मध्ये निजामशाहीशी संगणमत करत असल्याच्या संशयावरून किल्ल्यात कैद करून ठेवले परंतु किश्वर खानचा पाडाव झाल्याने त्याच वर्षी तिची सुटका झाली. दिलावरखान आदिलशाहीत कट-कारस्थान करत असल्याने त्याला १५९२ या किल्ल्यात कैद करून ठेवले होते. सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून केला जात असे.
       छत्रपती शिवाजी महाराजांनी २३ जुलै  १६७३ रोजी किल्ला स्वराज्यात आणला. त्याच दरम्यान महाराजांना अंगी ज्वर आल्याने या किल्ल्यात दोन महिने मुक्काम करावा लागला याच दरम्यान याठिकाणी रघुनाथ हणमंते त्यांच्याबरोबर कर्नाटक मोहीम व त्याचे नियोजन करण्यात आले.
       शंभूराजेंच्या मृत्यू नंतर औरंगजेबाने स्वराज्यातील आक्रमण  तिव्र केले परंतु छत्रपती राजाराम महाराज व ताराराणी यांनी  गडकोटांच्या मदतीने मोघलांना कडवी झुंज दिली.राजाराम महाराजांनी अजिंक्यतारा राजधानीचा किल्ला केला. बिथरलेल्या औरंगजेबाने गडकोट काबीज करण्याची मोहीम हाती घेतली त्याच अनुषंगाने त्याने वसंतगड जिंकून त्याचे नाव 'किली-दे- फतेह' अर्थात यशाची किल्ली असे ठेऊन फौजफाट्या सह सातारा किल्ला घेण्यासाठी चालून आला.
    ‌सातारा किल्ला राजधानी चा किल्ला असल्याने शिबंदी,रसद, दारुगोळा,व इतर साधनं सामग्री मोठ्या प्रमाणात होती. इ.स.१६९९ मध्येमोघल सरदार तबियत खान ने मोर्चे बांधणी करून किल्याला वेढा दिला. किल्लेदार प्रयागजी प्रभू नी किल्ला तब्बल साडेचार महिने झुंजत ठेवला.किल्लावर मोठ्या प्रमाणात तोफांचा मारा होत होता तरीही साडे चार महिने किल्ला तरी किल्ला हाती येत नसल्याने गडाची टेहळणी करून तोफांचा मारा तिव्र केला.
     १३एप्रिल १७०० रोजी मंगळाईच्या बुरुजा खाली सुरूंग लावून तो उडवून दिला.तटाची भिंत कोसळल्याने किल्ल्यावरील अनेक लोक कामी आले.या घटनेनंतर प्रयागजी प्रभूंनी मोगलांवर हल्ला करून बरेचसे मोगली सैन्य कापून काढले.
     परशुरापंतानी यांनी रहुल्लाखानाच्या मध्यस्तीने मोगलांशी तहाची बोलणी करून २१ एप्रिल १७०० मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. मोगलांनी किल्ल्याचे नाव 'आझमतारा' असे केले

      १७०६ मध्ये महाराणी ताराबाईंचे सरदार परशुराम त्र्यंबक यांनी किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव अजिंक्यतारा केले छत्रपती शाहूंनी मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर  अजिंक्यतारा काबीज करून त्या ठिकाणी १७०८ मध्ये राज्याभिषेक करून घेतला मराठा साम्राज्याचा विस्तार होत असताना संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार अजिंक्यतारा किल्ल्या वरून होता.१७१९ मध्ये महाराणी येसूबाई मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर या ठिकाणी वास्तव्यास होत्या तसेच महाराणी ताराबाई १७३१ अखेर पर्यंत अजिंक्यतारा किल्ल्यावरच वास्तव्यास होत्या. सालापासून  १८४९ पर्यंत  किल्ला सातारच्या राजघराण्याच्या ताब्यात होता.
अजिंक्यतारा किल्ला सातारा

अजिंक्यतारा किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:

      गाडी वाटेने गडावर आल्यानंतर पश्चिमेकडील बाजूला महादरवाजा असून त्याचा बूरूज व दार आजही मजबूत आहे.दरवाजाची उंची इतकी आहे की अंबारी सह हात्ती दरवाजातून सहज आत जाईल.आतील बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या असून त्याच्या जोत्यावर वाली सुग्रीव युध्दाचा प्रसंगाचे देखावा कोरलेला आहे, तसेच वलच्या बाजूला नागांचे शिल्प कोरलेले आहे. पायऱ्या चढून गेल्यावर अजून एक दरवाजा आहे त्यातून आत आल्या नंतर महादेवाचे छोटे मंदिर असून त्याच्याच मागच्या बाजूला भव्य मारुतीचे मंदिर ही आहे.मंदीराच्या बाजूने बूरुजावर गेल्यानंतर समोरच सज्जनगड परळीचे खोरे तसेच यवतेश्वर व घाट रस्ता नजरेस पडतो. पावसाळ्यात या ठिकाणावरून दिसणारे नयनरम्य दृश्य पाहण्या सारखे असते. 
 अजिंक्यतारा किल्ला फोटो

     किल्ल्यावर पाण्याची सात तळी आहेत, त्यामध्ये पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी असते.गडावर दुरदर्शन व आकाशवाणी ची प्रक्षेपण केंद्र असून त्यांचे मनोरे याच ठिकाणी आहेत .महाराणी ताराबाईंचा राजवाडा तसेच अन्य ऐतिहासिक वास्तूंचे चौथरे तेलातुपाचे रांजन, राजसदर पहायला मिळतात .गडाच्या पुर्वे कडील टोकाला मंगळाई देवीचे मंदिर व त्याच्या अवतीभवती अनेक शिल्पे कोरलेली आढळतात.बाजूलाच अजिंक्यतारा नावाची मोठा फलक लावण्यात आला आहे.या ठिकाणावरून चंदन वंदन किल्ले व जरंडेश्वर चा डोंगर दिसतो.बरूजाच्या कडेने दक्षिण दिशेला गेल्यानंतर तटामध्ये एक दरवाजा दिसतो,दरवाजा प्रशस्त असून मजबूत आहे.येथून चार भिंती कडे मार्ग जातो.
 छत्रपती शाहू महाराजांनी १७२१ मध्ये गडाच्या पायथ्याशी नियोज बध्द शहर वसवून पहिल्यांदा राजधानी किल्ल्यावरून खाली जमिनीवर आणली त्यासाठी शहरात मोठ मोठ्या वास्तू निर्माण केल्या.त्यामध्ये अदालत वाडा, राजवाडा, जलमंदिर,तख्ताचा वाडा,अशा वास्तूंचा समावेश होतो.
महादेव मंदिर अजिंक्यतारा सातारा

अजिंक्यतारा किल्ला पहायला जायचे कसे:

       अजिंक्यतारा किल्लावर जाण्यासाठी सातारा शहरांमध्ये यावे लागते चार चाकी गाडीने जायचे असेल तर गोडोली मार्गे पक्का रस्ता आहे रस्ता गडाच्या महादरवाजा पर्यंत जातो.
       चालत जाणार असेल तर सातारा बस स्थानकातून समर्थ मंदिर मार्गे जाणाऱ्या बस ने बोगदा या ठिकाणावर उतरून पायवाटेने २० मिनीटात महादरवाजात पोहोचतो.तसेच पोवई नाक्यावरुन चार भिंती मार्गे तसेच अदालत वाड्यापासूनही जाता येते.
      रेल्वे मार्गे येणाऱ्यां साठी माहुली हे जवळचे रेल्वेस्थानक आहे येथून राजवाडा ते रेल्वेस्टेशन बस सेवा सुरु आहे.या बस ने राजवाडा येथे उतरून समर्थ मंदिर मार्गे गडावर जाता येते.

काय काळजी घ्यावी:

  •   किल्ल्यावर पाण्याची सोय नसल्याने पाणी बरोबर घेऊन जावे.
  •    मारुती मंदिरात १५ जणांच्या रहाण्याची सोय होईल .
  •    गडावर जेवणाची नाष्टा सोय नाही त्यासाठी सातारा शहरात करावी लागेल.
  •    किल्ल्यावर जाणारा रस्ता अरुंद तिव्र उताराचा व नागमोडी वळणाचा असल्याने वाहणे सावकाश चालवावी.





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

कृपया नकारार्थी कमेंट टाळावे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण