मुख्य सामग्रीवर वगळा

सज्जनगड किल्ला | sajjanghad fort information in Marathi

सज्जनगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे:

   
       समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड किल्ला सातारच्या नैऋत्येस १३ कि.मी. अंतरावर आहे. प्रतापगड पासून  सह्याद्री पर्वत रांगेची ऊपरांग शंभू महादेव डोंगररांगा जी पुर्वेकडे जाते त्या पैकी एका रांगेत उरमोडी नदीचा खोऱ्यात किल्ला आहे.

सज्जनगड ची माहिती:

समर्थ रामदास स्वामींच्या सहवासाने या किल्ल्याला धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.  परळी गावात किल्ला असल्या कारणाने या किल्ल्याला परळीचा किल्ला असेही म्हणतात.
ठोसेघर धबधबा व कास पुष्प पठार याच परीसरात असल्या मुळे पावसाळ्यात या ठिकाणी  जास्त असते.समुद्र सपाटी पासून सज्जनगड किल्लाची उंची ३००० फुट इतकी आहे. किल्ला परळी गावात असल्याने या किल्ल्यास परळीचा किल्ला असेही म्हणतात.
समर्थ सृष्टी:
 
   किल्ला पाहण्याची सुरुवात समर्थ सृष्टी पासून, सातार वरून सज्जनगड ला जाताना गजवडी फाटा लागतो.तिथूनच पुढे घाटामध्ये ज्ञानश्री शिक्षण समूहाच्या प्रांगणात समर्थ सृष्टी निर्माण केली आहे.तेथे सुरवातीला विशाल मारूती ची मुर्ति आहे, समर्थ सृष्टी मध्ये समर्थांचा जीवन प्रवास रेखाटला आहे.समर्थ स्थापित आकरा मारुतींची प्रतीकृती, समर्थांचा हस्ताक्षरातील पञ तसेच  समर्थांचे व कल्याण स्वामींचे तैलचित्र मन प्रसन्न करते.
किल्ल्यावर काय पाहता येईल:
      
 समर्थ सृष्टी पाहुन घाटमार्गे गडावरील वाहनतळा पर्यंत गाडीने जाता येते. वाहनतळा पासून गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. या  मार्गाने काही अंतर पुढे गेल्यावर उजवीकडे एक पायवाट जाते त्या वाटेने पुढे गेल्यावर मंडप घळ तिथे समर्थ ऊपासनेला बसत.तिथून माघारी येऊन पायवाटेने पुढे गेल्यावर महादरवाजा पाशी येऊन पोहोचतो,त्या दरवाजाला छञपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे म्हणतात.या महाद्वाराच्या आतील बाजूस द्वारपालांचा देवड्या आहेत. तिथेच बाजूला भिंतींवर लेख लिहिलेला दिसतो.
       दरवाजातून पुढे डावीकडे जाणाऱ्या वाटेने गेल्यावर घोटाळे तळे आहे या तळ्यात घोड्यांना पाणी पाजत असतं तळ्याला लागूनच एका ईमारतीचे अवशेष दिसतात व अंगलाईदेवीचे मंदिर आहे या देवीच्या मूर्ती अंगापुरच्या डोहात सापडलेल्या,तसेच गडाच्या तटावरून आजुबाजुचा परीसरात नेहाळता येतो.तिथून माघारी येऊन पुढे गेल्यावर छोटी छोटी दुकाने हॉटेल समर्थ मंडळाची इमारत, श्रीराम मंदिर आणि समर्थांचा मठ आहे.

रामदास स्वामी समाधी सज्जनगड:


      समर्थांच्या निर्वाना नंतर छञपती संभाजी महाराजांनी भूयारातील समाधी व मंदिर बांधले.मंदिर परीसरामध्ये अशोकवन ,अक्काबाईचे वृंदावन,वेणूबाईचे वृंदावन व समर्थांचा मठ आहे.मठाचा शेजघरात पितळी गुरांचा पलंग, पितळी हांडे, कुबडी, दंडा सोपा पिकदानी पानांचा डब्बा गुप्ती अशा समर्थांचा नित्य वापरातील वस्तू ठेवल्या आहेत . तिथेच एक मोठा बांधीव तलाव आहे त्या मधील पाणी पिण्यासाठी वापरतात.व दोन प्रसादग्रह आहेत. गडाचा पश्र्चिमेस धाब्याचा मारुती मंदिर आहे गडाचा तटावरून दिसणारे परळी खोरे वरळी धरणं अतिशय सुंदर दिसते.   
 सज्जनगड  किल्ल्याचा इतिहास:                                  
    सज्जनगड किल्ल्याची उभारणी अकराव्या शतकात शिलाहार राजा भोज याने केली.या किल्ल्यावरील आश्वालय ऋषींच्या वास्तव्या मुळे  आश्वालयगड असे ही म्हणतात. आदिलशाही चा ताब्यात असलेल्या या किल्लावर अफजल खानाचा मुलगा  किल्लेदार होता.ई.स.१६७२ मध्ये छञपती शिवाजी महाराजांनी  किल्ला जिंकून घेतला.महाराजांचा विनंती वरून समर्थ गडावर वास्तव्यास आले . महाराजांनी २०००होन खर्च करून येथे मठ बांधून घेतला.
      समर्थ रामदास  स्वामींच्या वास्तव्याने या गडास सज्जनगड असे नाव पडले. पुढे १६ जानेवारी १६८२ मध्ये गडावर रामाच्या मुर्ती बसवल्या व   २२ जानेवारी १६८२ ला समर्थांनी देह ठेवला.१६९९ मध्ये सातारच्या किल्ल्याला औरंगजेबाने वेढा दिला त्या वेळी सज्जनगडा वरून रसद पुरवठा केला गेला. सातारच्या किल्ला पडल्या नंतर.ई.स.१७०० मध्ये सज्जनगडास वेढा दिला किल्ला मुघलांच्या ताब्यात जान्या पुर्वी समाधी शिळेमध्ये लपवण्यात आली तर रामाच्या मुर्ती वासोटा किल्ल्यावर नेऊन ठेवण्यात आल्या, औरंगजेबाने या किल्ल्यास नौरसतारा हे नाव दिले. शाहु महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर लगेचच म्हणजे १७०९ मध्ये किल्ला पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला.व जिजाजी काटकर यांना किल्लेदार नेमले.पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.इंग्रजांनी या किल्ल्यावर आपली स्वतंञ सेना नेमली.    
 
सज्जनगड ला जायचे कसे:                                              सज्जनगड ला जाण्यासाठी साताऱ्या मधुन बस सेवा सुरु आहे ती गडावरील वाहन तळावर सोडते .तसेच राजवाडा बस थांब्यावरुन खाजगी वाहनाने सज्जनगडाच्या पायथ्या पर्यंत जाता येते,तिथून पायी चालत गडावर जावे लागते.

 सज्जनगड ला जाताना काय काळजी घ्यावी:                    

   सज्जनगड  ला जाताना अशी कोणतीही खास काळजी घेण्याची गरज भासणार नाही . 
तुम्ही वर्षा तिला कोणत्याही महीन्यात तिथे जाऊ शकता.
गडावर मठामध्ये राहण्याची उत्तम सोय होते. तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात येते त्याचप्रमाणे रोज बारा वाजता गडावर विनामोबदला उत्तम जेवण भेटते.
पावसाळ्यात जर सज्जनगड ला गेला ठोसेघर धबधबा पाहण्याचा आनंद घेता येतो.
जवळची प्रेक्षणीय स्थळे:
     ठोसेघर धबधबा,कास पुष्प पठार, अजिंक्यतारा किल्ला, पाटेश्वर शिव मंदिर

   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण