मुख्य सामग्रीवर वगळा

ठोसेघर धबधबा | Thoseghar waterfall information in Marathi

 ठोसेघर धबधबा माहिती.      

   पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना वर्षा सहलीचे वेध लागतात.त्यातच सातारा जिल्हा नैसर्गिक विविधतेने नटलेला असल्याने याला पर्यटनाचे नंदनवन म्हणून संबोधले जाते.पावसाळ्यात पर्यटक कास पठार, वजराई भांबवली धबधबा, नवजा ठोसेघर ,या ठिकाणी भेटी देत असतात.त्यातील कास पुष्प पठाराला युनिस्को वर्ल्ड हेरीटेज साइटचा दर्जा लाभला असल्याने हे ठिकाण जागतीक स्तरावर पोहोचले आहे.परंतु याला भेट देण्यासाठी सप्टेंबर महिन्याची वाट पहावी लागते. 


        ठोसेघर धबधबा महाराष्ट्रातील प्रमुख व परिचीत म्हणून गनला जातो.पावसाच्या पहील्या सरी बरसताच पर्यटकांचे पाय आपोआप या ठिकाणी ओढले जातात.सज्जनगड आणि ठोसेघर एकाच मार्गावर जवळ जवळ असल्याने आनंद द्विगुणित करतात.

         ठोसेघर धबधबा सातारा जिल्ह्यात असून सातारा शहरा पासून २४ किमी अंतरावर असलेल्या ठोसेघर गावानजिक उगम पावणाऱ्या तारळी नदीवर आहे.या ठिकाणी पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा अदभुत सोहळा पाहण्याचे भाग्य लाभते.पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या धारा अंगावर घेत,ऊन पावसाचा खेळ, छोटे मोठे पाण्याचे प्रवाह, रानफुले, गर्द हिरवी झाडी हे अनुभव वर्षभरा साठी नवी ऊर्जा देऊन जातात.


         पावसामुळे डोंगर दऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याचे अनेक धबधबे पहायला मिळतात.परंतु पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे छोटा व मोठा धबधबा हे पाहताना समर्थ रामदास स्वामींच्या 'धबाबा आंधळे तोया' या ओळींची अनुभूती येते या दोन धबधब्यांना राम लक्ष्मण धबधबा असे म्हणतात. छोटा धबधबा 20 मीटर उंचीचा आहे तर मोठा 210 मीटर उंच आहे.

         धबधब्याचा ठिकाणी पर्यटकांचा सोयीसाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने दर्शक गॅलरी बांधल्याने धबधबा व्यवस्थीत पाहता येतो.वन विभागाच्या वतीने या ठिकाणी सिमेंट पेवर ब्लाॅक चे पादचारी मार्ग, दिशादर्शक फलक,प्रेक्षा गॅलरी व रेलिंग ची कामे केल्याने पर्यटकांच्या सुरक्षेत भर पडली आहे. छोट्या धबधब्याच्या पायथ्यापर्यंत जाता येत असले तरी झालेले अपघात पाहता येथे जाण्यावर बंदी आहे. दरीमध्ये कोसळणारा मोठा धबधबा पाहून काळजात धडकी भरते. या ठिकाणी मुख्य धबधबा व समोरील समोरील डोंगरातून वाहणारे तीन उप धबधबे वाहतांना पाहून मन प्रसन्न होते.



         धबधबा पाहण्यासाठी प्रतिव्यक्ती पाच रुपये शुल्क आकारले जाते हे शुल्क स्थानिक वनव्यवस्थापन कमिटी मार्फत आकारले जाते. या परिसरामध्ये पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. तिकीट घराच्या बाजूलाच कोयना अभयारण्यात आढळणाऱ्या दुर्मिळ प्राणी पक्षी साप कीटक वनस्पती यांची माहिती दर्शवणारे छोटेसे संग्रहालय आहे.

 ठोसेघर ला जायचे कसे

         ठोसेघर ला येण्यासाठी सातारा बस स्थानकातून व राजवाडा येथील बस स्थानकातून  राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सोय आहे या बसेस प्रत्येक तासाला सातारा ते ठोसेघर फेरी मारतात. ट्रेन ने येणाऱ्यांसाठी माहुली हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. परंतु सज्जन गड ठोसेघर व चाळकेवाडी पवनचक्की प्रकल्प एकाच मार्गावरील जवळ जवळची ठिकाणे असल्याने एका दिवसामध्ये या तिनी ठिकाणाला भेटी देऊन आनंद द्विगुणित होऊ शकतो त्यासाठी मात्र खाजगी वाहनाने येथे येण्याचे नियोजन करावे लागेल.



काय काळजी घ्यावी

        ठोसेघर हे पावसाळी सहलीचे ठिकाण असल्याने व या परिसरामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सोबत छत्री किंवा रेनकोट असणे गरजेचे आहे. तीव्र उतारावरून वाहणारे पाणी असल्याने पाण्यात जाणे टाळावे. जेवण व नाष्टा साठी त्या परिसरामध्ये हॉटेल्स आहेत.

टिप्पण्या

  1. धन्यवाद सुंदर प्रकारे माहिती दिल्याबद्दल...

    उत्तर द्याहटवा
  2. Thoseghar waterfalls!
    One can hear the water swishing down at the rocks and getting collected into a divinity pool where children and family relax and play! 🌸

    दगडधोंड्यातून खळाळत वाहणाऱ्या आणि निसर्गनिर्मित तरण तलावात साठणाऱ्या पाण्याच्या मंजुळ ध्वनीचा मनमुराद आस्वाद घ्या!!कुटुंबासोबत निवांत क्षण व्यतीत करा!!
    #maharashtra #thoseghar #waterfall

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

कृपया नकारार्थी कमेंट टाळावे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण