मुख्य सामग्रीवर वगळा

जिरेनियम शेती माहिती | geranium farming information in Marathi

 जिरेनियम शेती माहिती | geranium farming information in Marathi

भारत विविध योजना व कृषी क्षेत्रात विविध प्रयोग करून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. शेतीतील उत्पादन वाढले परंतु उत्पन्नाची शाश्वती कमी झाले, पर्यायाने शेतकऱ्यांना पारंपरिक शेती करणे परवडेनासे झाले. बाजारपेठेची मागणी व शेतीमालाचा पुरवठा याचा समन्वय केल्यास शेती अधिक फायद्याची होऊ शकते. पर्यायाने आधुनिक शेती करून फळबाग, ड्रॅगन फ्रुट, चंदन शेती, औषधी वनस्पती, व जिरेनियम अशा पिकांची लागवड आपल्या शेतीमध्ये करणे गरजेचे आहे. जेणेकरून शेती मधून भरघोस उत्पन्न मिळू शकते. आज आपण अशाच जिरेनियम लागवड बद्दल माहिती पाहणार आहोत.

Geranium plant
 Geranium

हे ही वाचा : ड्रॅगन फ्रुट शेती
                चंदन लागवड माहिती


जिरेनियम तेलाचा उपयोग |Geranium oil

          सुगंधित जिरेनियम तेल उच्च दर्जाचे परफ्यूम आणि कॉस्मेटिक उद्योगांमध्ये वापरण्यात येणारा महत्त्वाचा घटक असल्याने या उद्योगांमध्ये जिरेनियम तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो थोडक्यात तेलापासून अनेक सुगंधित पदार्थ जसे की टॅल्कम पावडर शाम्पू अगरबत्ती साबण फेस वॉश क्रीम अशा वस्तू बनवले जातात

          जेरेनियम अनेक खाद्यपदार्थ अल्कोहोलिक आणि सॉफ्ट ड्रिंक मध्ये नॅचरल फ्लेवर म्हणून ही वापरतात.

          जिरेनियमचा पारंपरिक आयुर्वेदामध्ये वापर केला जातो. जसे की रक्तस्त्राव जखमा अल्सर आणि त्वचा विकार यांच्या उपचारासाठी वापर केला जातो.


जिरेनियम शेतीची पार्श्वभूमी

      जिरेनियम चे उगमस्थान दक्षिण आफ्रिका मादागास्कर इजिप्त मोरोक्को हे सांगितले जाते. सतराव्या शतकात ही वनस्पती इटली स्पेन व फ्रान्स मध्ये पोहोचली व तिथून पुढे तिचा इतरत्र प्रसार आला

      एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला फ्रेंच नागरिकांनी जिरेनियम भारतात आणले. जिरेनियम दक्षिण भारतीय हवामानाशी मिळतेजुळते असल्याने त्याची लागवड करण्यात आली. जिरेनियम च्या विविध ७०० प्रतीक असून त्यातील फक्त १० तांबडी व पांढरी फुले येणाऱ्या प्रजाती तेल उत्पादनासाठी वापरल्या जातात


जिरेनियम शेतीची गरज

    भारतामध्ये कॉस्मेटिक व सौंदर्यप्रसाधनांची  खूप मोठी बाजारपेठ आहे. या उद्योगांसाठी जिरेनियम तेलाची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे भारत दरवर्षी १५० टन जिरेनियम तेल आयात करतो त्यामानाने भारतामध्ये केवळ सहा टन तेलाचे उत्पादन होते. जागतिक बाजारपेठेत जिरेनियम केला ची गरज सहाशे टन एवढी आहे ती चीन दक्षिण आफ्रिका मोरॉक्को हे देश पूर्ण करतात. भारतामध्ये गरज आयात व उत्पादन यांचा विचार केला असता भारतीय शेतकऱ्यांना यामध्ये खूप मोठ्या संधी आहेत.


जिरेनियम शेतीसाठी हवामान व मृदा 

    जिरेनियम शेती साठी दक्षिण भारतीय हवामान उत्तम असून या हवामानात मिळणाऱ्या तेलाची गुणवत्ता सर्वोत्तम आहे.

    भारतातील महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात व उत्तर प्रदेशचा मैदानी भाग या राज्यांमध्ये जिरेनियम शेती केली जाते.

    जिरेनियम पिकासाठी निचरा होणारी काळी चिकन माती जमीन लागते. महाराष्ट्रातील हवामान व मृदा जिरेनियम शेती साठी उत्तम असून महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये जिरेनियम लागवड करता येते. जास्त पावसाच्या प्रदेशात मध्ये पिकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात रोपाच्या खालच्या फांद्या जमिनीला लागून कुजण्याची याची दाट शक्यता असते.


जिरेनियम लागवडीचे तंत्र | geranium farming in Maharashtra

     जिरेनियम पिक बहुवार्षिक असल्याने शेतीची चांगल्या प्रकारे मशागत करावी लागते. शेतामध्ये योग्य प्रमाणात शेणखत मिसळून द्यावे. नांगरट करून पाळ्या द्याव्यात, त्यानंतर चार फुटांवर सरी सोडून किंवा वापा करून चार बाय दीड फुटावर रोपांची लागवड करावी. मल्चिंग पेपर टाकल्यास शेतामध्ये अतिरिक्त तन वाढणार नाही. रोपांची लागवड करताना डीएपी सारखी फर्स्ट स्टेज खते वापरली तरी चालतात. एका एकरामध्ये जिरेनियम ची सात ते आठ हजार रोपे लागतात. साधारणपणे पाच ते सहा रुपये प्रमाणे जिरेनियम ची रोपे भेटतात मागणी व पुरवठा नुसार त्यांचे दर कमी अधिक होऊ शकतात. लागवडीसाठी सरासरी एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो.

     एकदा लागवड केल्यानंतर हे पीक तीन ते चार वर्षे उत्पन्न देते. लागवडीनंतर तीन ते चार महिन्यात तीन फुटापर्यंत रोपांची वाढ होऊन त्याला फुले येऊ लागली की ते छाटणीसाठी तयार होतात. चटणी करत असताना विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून रोप फुटवा लगेच धरेल. पहिला तोडा चार महिन्यानंतर निघतो त्यानंतर चे तोडे अडीच ते तीन महिन्यांमध्ये तयार होतात. वर्षाला सर्वसाधारणपणे चार तोडे भेटतात. एकरी 10 ते 12 टन जिरेनियम भेटते त्यापासून एका टनाला एक लिटर याप्रमाणे बारा लिटर तेल भेटते. तेलाचा सरासरी बाजार भाव १२५०० प्रति लिटर एवढा आहे. 

  

 जिरेनियम शेतीचे फायदे

     जिरेनियम शेती ला सुगंधी शेती असे ही म्हणतात.

  जिरेनियम च्या रोपावर कोणत्याही प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे या पिकावर कीटकनाशके व औषध फवारणीचा खर्च 80 टक्‍क्‍यांपर्यंत कमी होतो.त्या पिकाला कोणते जनावर खात नसल्याने अतिरिक्त संरक्षणाची गरज भासत नाही. या पिकातून पारंपरिक पिकांपेक्षा दुप्पट नफा मिळतो. या पिकामध्ये आंतरपीक घेता येते. हे एक नगदी पीक असून पैसा खेळता राहतो. याच्या तेलाला बाजारांमध्ये भरपूर मागणी असल्याने दरही चांगला भेटतो. जिरेनियम पासून तेल निर्मिती, रोपांची निर्मिती व शिल्लक राहिलेल्या पाल्यापासून खत तयार करू शकतो. दुष्काळी भागात जिथे पाण्याची कमतरता आहे तिथेही शेतकरी जिरेनियम शेती करू करतात.


       

Geranium farming information in Marathi
Geranium farming


जिरेनियम शेतीसाठी सरकारी योजना

      जिरेनियम पिकासाठी कोणतीही सरकारी योजना नसली तरी जिरेनियम प्रक्रिया उद्योगासाठी सरकारी अनुदान योजना आहे.प्रक्रिया उद्योग उभा करण्यासाठी 25 ते 30 टक्के अनुदान दिले जाते. महिलांना या योजनेमार्फत तीस टक्के तर पुरुषांना 25 टक्के अनुदान दिले जाते. याबाबतची संपूर्ण माहिती जवळच्या जिल्हा कृषी विभागात मिळते.


जिरेनियम पिकाचे विक्री व्यवस्थापन

      भारतातील शेतकरी कोणतेही पीक आपल्या शेतामध्ये पीक करण्यासाठी सक्षम आहेत परंतु त्यांचे विक्री व्यवस्थापन करण्यास कुठेतरी कमी पडत असतात. बहुतांश शेतकरी जिरेनियम शेती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये करतात. असा पिकवलेला मल ते डायरेक्ट कंपनीला विकतात. कंपनी शेतकऱ्यालाह रोपांच्या उपलब्ध ते पासून तेल काढणी पर्यंत मदत करतात. ज्या शेतकऱ्यांकडे तीन डिस्टिलेशन ची सोय नाही असे शेतकरी जिरेनियम चा काढलेला माल पाच ते सहा हजार प्रति टन या दराने विकतात.


जिरेनियम शेती बद्दल थोडक्यात

  •      जिरेनियम शेती करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी दोन ते तीन दिवसाचे लागवडीपूर्वी प्रशिक्षण घ्यावे. जेणेकरून त्यांना बाजारपेठ व तत्सम कंपन्यांचा पत्ता मिळू शकतो. 
  •  जिरेनियम शेती साठी सेंद्रिय खतांचा वापर करावा जेणेकरून तेलाची गुणवत्ता वाढेल.


  • आपल्या विभागातील कृषी विद्यापीठातील औषधी आणि सुगंधी वनस्पती विभाग कृषी विज्ञान केंद्र या मध्ये जिरेनियम शेती बद्दल सविस्तर माहिती मिळते.
  • शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाकडून जिरेनियम तेल काढण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाते.



सदर लेखामध्येप्रशिक्षण संस्था बद्दल माहिती पुरवण्याचा नक्की प्रयत्न करू ज्यांना प्रशिक्षण संस्थेबद्दल माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवावे


                           धन्यवाद 

                जय जवान जय किसान


     

     

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

कृपया नकारार्थी कमेंट टाळावे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण