मुख्य सामग्रीवर वगळा

कोरीगड किल्ला माहिती | korigad fort information in Marathi in Marathi

कोरीगड किल्ला

महाराष्ट्रात असे काही थोडे किल्ले आहेत ज्यांना तटबंधी पहायला मिळते.त्यामध्ये वर्धनगड किल्ला, विसापूर किल्ला,यांना संपूर्ण तटबंदी असून तशाच प्रकारचा एक किल्ला म्हणजे कोरीगड! कोरीगड किल्ल्याला संपूर्ण ताशीव कडा व त्याच्या आकारामुळे व स्थानामुळे वेगळा ठरतो‌ त्यामुळे आज आपन कोरीगड बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
नाव          कोरीगड/कोराईगड
उंची          ३१०० फूट
प्रकार        गिरीदुर्ग
ठिकाण     पेठ शहापूर,मावळ
जिल्हा      पुणे
स्थिती       चांगली
चढाई        सोपी
कोरीगड किल्ला
गणेश दरवाजा


कोरीगड किल्ला कुठे आहे:

        कोरीगड किल्ला पुणे जिल्ह्यातील बारा मावळ प्रांता पैकी 'कोर बारस' मावळात आहे.मुळशी धरणाच्या पश्चिमेला व पवना धरणाच्या दक्षिणेकडे असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत लोणावळा डोंगररांगेत कोरीगड किल्ला आहे.लोणावळा व पाली दरम्यान असणाऱ्या सवाष्णी घाट माथ्यावर कोरीगड आहे. लोणावळ्या पासून दक्षिणेस पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे.

कोरीगड किल्ल्याचा इतिहास:

        कोरीगड किल्ल्याचा इतिहासात तसा फारच कमी उल्लेख आढळतो.किल्लाच्या पोटात असणाऱ्या लेण्यां, कोरीव गुहा व पाण्याच्यां टाक्यां वरून तो अतिप्राचीन असावा. मावळातील अन्य किल्ले व डोंगरातील लेण्या प्रमाने येथेही लेण्या असल्याने त्याचा संबंध अन्य लेण्यां बरोबर दुसऱ्या शतकात जोडला जाऊ शकतो.
        या किल्ल्यावर सुरवातीच्या काळात महादेव कोळी समाजाचे वर्चस्व होते.बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर १४व्या शतकाच्या मध्यात कोरीगड निजामशाही राजवटी खाली आला.
        १६५७ मध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीच्या आरंभीच्या काळात मावळातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर बरोबर कोरीगड ही स्वराज्यात सामील करून घेतला.शंभूराजेंच्या मृत्यू नंतर तो मोगलांच्या ताब्यात गेला होता. इ.स.१७०० मध्ये पुन्हा मराठ्यांनी त्याला पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतले.त्यानंर बराच काळ कोरीगड मराठा साम्राज्यात होता.
        मार्च १८१८ इष्ट इंडिया कंपनीचा कर्नल प्रॉथर ने कोरीगड वर आक्रमण केले, किल्लेदाराने किल्ला मोठ्या हिमतीने लढवला.प्राथर ची सेना किल्ल्यावर जोरदार हल्ला करत त्याला किल्लेदार जशास तसे उत्तर देत होता. प्रॉथर चर्या हाती किल्ला लागत नव्हता आणि अचानक एक नको ती घटना घडली. तोफेचा गोळा येऊन गडावरील दारूगोळा कोठारा वर पडला. मोठा स्फोट होऊन दारू गोळा नष्ट झाला त्याच बरोबर मोठी जिवीत हानी झाली.किल्ला लढवणे शक्य नसल्याने शेवटी मराठ्यांनी शरणागती पत्करली व किल्ला इष्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला.
कोरीगड किल्ला
गणपती मुर्ती


कोरीगड वर पाहण्यासारखी ठिकाणे:

         पेठ शहापूर गावातून गडावर जाण्यासाठी मळलेली पायवाट धरावी लागते, उजव्या बाजूला कोरीगड चा अखंड ताशीव कडा जनू एखाद्या भिंती सारखा दिसतो. जंगलातून पायवाटेने काही मिनीटांच्या अंतरावर गडावर जाणारा पायरी मार्ग सुरु होतो. पायरी मार्ग प्रशस्त असून सुरक्षेसाठी जागोजागी रेलिंग लावलेले आहेत.रस्ता दाट झाडीतून जात असल्याने दिवसा सुर्य ही दुर्लभ दुर्लभ होऊन जातो.
         पायऱ्या चढून थोडे वर गेल्यावर दोन गुहा लागतात या अतिशय आखीवरेखीव व मोठ्या आहेत.त्यांचा वरच गणेश गुहा असून गुहेमध्ये गणपती ची मुर्ती व पिण्याच्या टाकल्या आहेत.यातील पाणी अतिशय थंडगार व मधूर आहे.पुढे थोड्या चालीच्या अंतरावर गडाचा मुख्य दरवाजा 'गणेश दरवाजा' लागतो. दरवाजा ची कमान मोठी असून त्यामध्ये आत्ता नवीन लाकडी दरवाजा बसवला आहे. दरवाजाच्या बाजूची तटबंदी उंचपुरी असून नजीकच्या काळात तिची डागडुजी केलेली आढळते. दरवाजाच्या आतील बाजूस हारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत.
       दरवाजाच्या आतील पायरी मार्ग डावीकडे काटकोनात वळतो गडाच्या दुसऱ्या दरवाजातून गडावर प्रवेश होतो. गडावर प्रवेश होताच गडाचे  उत्तर-दक्षिण पसलेले विस्तृत पठार नजरेस पडते. समोरच महादेवाचे छोटेखानी मंदिर आहे मंदिरामध्ये शिवपिंड आहे. मंदिराच्या प्रांगणात चार तोफा ठेवलेला आढळतात. मंदिराच्या पाठीमागे गडावरील दोन विशाल तळी आहेत. तळयापासून पुढे गेले असता वाटेत दोन गुहा लागतात या गुहेमध्ये शंक चक्र गदा धारी विष्णूची मूर्ती आहे. 
     गडाच्या उत्तर टोकावर ध्वज खांब आहे. संपूर्ण गडाला तटबंदी असून तिची लांबी साधारण दोन किलोमीटर भरते. तटबंदीमध्ये जागोजागी बुरुज देवड्या जंग्या तसेच सोच खूप पाहायला मिळतात. तटबंदीवरून चालण्यासाठी मार्गही आहे. गडावर काही ठिकाणी वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. गडाच्या दक्षिण बाजूस गड देवता कोराई देवीचे मंदिर आहे मंदिराचा जीर्णोद्धार केला असून मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे कोराडी देवी ची मूर्ती चतुर्भुज प्रकारातील अजून शस्त्रसज्ज आहे. गडाच्या दक्षिण बुरुजावर गडावरील सर्वात मोठी तोफ लक्ष्मी तोफ ठेवली आहे. अंबवने बाजूने येणारी गडावरील वाढ चोर दरवाजातून गडावर येते, ही वाट अतिशय खडतर असून घनदाट जंगलातून आहे. वाटेत एक पाण्याचे टाके ही आहे.
  कोरीगड गडावरून कोकणातील बराचसा प्रदेश नागफणीचे टोक, तुंग किल्ला,तिकोना, माथेरान, घनगड किल्ले दिसतात. पावसात पायऱ्यातून वाहनारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत असते.
कोरीगड किल्ला
कोराई देवीचे मंदिर


कोरीगड ला जायचे कसे:

        कोरीगड ला जाण्यासाठी पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग वरील लोणावळा येथून दक्षिणेकडील कुरवंडे घुसळखांब मार्गे पेठ शहापूर ला येऊ शकतात.
        सार्वजनिक वाहतूक वापरणार असाल तर मुंबई पुण्यावरून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने किंवा रेल्वेने लोणावळ्यात उतरून लोणावळा मधून बांबुर्डी ला जाणारी बस भेटते. ही बस पेठ शहापूर मार्गे जाते पेठ शहापूर मध्ये उठून अर्ध्याएक तासांमध्ये गडावर पोहोचू शकतात.
        पुण्यावरून येणारे पर्यटक पिरंगुट पौडमार्गे ही कोरीगड ला जाऊ शकतात. हा मार्ग मुळशी धरणाच्या बाजूने ॲम्बी व्हॅली मार्ग कोरिगड ला जातो.
        लोणावळा हे जवळचे रेल्वे स्थानक आहे.
कोरीगड किल्ला
लक्ष्मी तोफ


काय काळजी घ्यावी:

  •     गडावर पाण्याची सोय नाही त्यामुळे बरोबर पाणी असावे.
  •     गडावर जेवण नाश्त्याची सोय नाही.
  •     कोराई देवीच्या मंदिरात व महादेव मंदिरात मुक्कामाची सोय होऊ शकते.
  •     सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करणार असाल तर त्याचे वेळापत्रक माहीत करून घ्यावे.
         
         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण