मुख्य सामग्रीवर वगळा

केंजळगड किल्ला

केंजळगड किल्ला

नाव :- केंजळगड
उंची :- ४२६९
किल्याचा प्रकार :- गिरीदुर्ग 
चढाईची श्रेणी :- मध्यम
डोंगररांग :- महादेव डोंगर 
ठिकाण :- कोर्ले, रायरेश्वर
तालुका :- वाई, जिल्हा सातारा

केंजळगड कुठे आहे:

         सह्याद्री पर्वत रांगेतील वाई व भोर तालुक्यांच्या सीमेवर असणारा केंजळगड किल्ला आपल्या काळ्या पाषाणात कोरलेल्या वैशिष्ट्य पूर्ण पायऱ्यां साठी प्रसिद्ध आहे.सह्याद्री पर्वत रांगेची उपरांग असलेल्या महादेव डोंगररांगेवर किल्ला बांधलेला आहे.कृष्णा व निरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील केंजळगड किल्ला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्या मध्ये आहे. 

केंजळगड
केंजळगड किल्ला

       वाईचा हा पश्चिम भाग म्हणजे उंच डोंगर रांगा, विपुल वनसंपदा,नदी नाले त्यावर बांधलेली धरणे पर्यटकांना आकर्षित करत असतात. डोंगर माथ्यावरील वैशिष्ट्य पूर्ण कडा सहज लक्ष वेधून घेतो,त्याचा आकार साधारण गांधी टोपी प्रमाणे दिसतो. केंजळगड गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ४२६९ फूट एवढी आहे.त्याला केळंजा व मोहनगड असेही म्हणतात,खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी याला मोहनगड असे नाव दिले आहे.

केंजळगड किल्ला इतिहास:

         केंजळगडाच्या निर्मितीबद्दल बोलायचे झाल्यास किल्ल्याची मूळ बांधणी शिलाहार राजा दुसरा भोज याने बाराव्या शतकात केली. हा किल्ला बराच काळ आदिलशाही अधिपत्याखाली होता. वाई प्रांतातील सर्व किल्ले स्वराज्यात आले होते मात्र केंजळगड येणे बाकी होते. छत्रपती शिवराय तळकोकणातील चिपळूण या ठिकाणी मुक्कामी असताना त्यांनी मराठी फौजा केंजळगड घेण्यासाठी पाठवल्या त्यावेळी आदिलशाही सरदार गंगाजी विश्वासराव किरदत हा या किल्ल्याचा किल्लेदार होता. 
केंजळगड
चुण्याचा घाणा


      किरदत याने मराठी फौजेला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु मराठ्यापुढे त्याचा निभाव लागला नाही, या कारवाईत तो मारला गेला व २४ एप्रिल१६७४ रोजी या गडावर स्वराज्याचे निशाण डौलाने फडकू लागले. छत्रपती शिवरायांनी या गडाला मोहनगड असे नाव दिले. केंजळगड स्वराज्यात असताना केंजळ गडाची किल्लेदारी सरदार पिलाजी गोळे यांच्या कडे होती.१६८९ मध्ये गोळे यांना पायदळ प्रमुख करण्यात आले त्याच बरोबर केंजळगड  कमळगड पांडवगड चंदन वंदन वैराटगड मंगळगड आदी किल्ल्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती, असे तत्कालीन पत्र व्यवहारा वरून समजते. एकनिष्ठ गोळे घराण्याने या किल्ल्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले.
       सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई याच भागात झाली. १७०१ मध्ये केंजळगड औरंगजेबाकडे केला परंतु एका वर्षाच्या आत मध्ये म्हणजे १७०२ कोणाला लगेच तो मराठ्यांनी घेतला. त्यानंतर तो बरीच वर्षे मराठ्यांकडे होता. इ.स.१८१८ मध्ये गव्हर्नर फ्लिटझर यांनी गड जिंकून घेतला. तो ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला.

केंजळगडावर पाहण्यासारखी ठिकाणे:

      केंजळ गडाच्या मध्यावर ८ ते १० घरांची वस्ती असणाऱ्या ओव्हरी गावापर्यंत गाडीने जाता येते. या गावातील शाळेपासून गडावर जाणारी पायवाट सुरु होते. ही पायवाट घनदाट झाडी मधून गडाच्या कड्याखाली असणाऱ्या दरवाजा पर्यंत जाते. दाट झाडी असल्याने रस्ता चुकण्याची दाट शक्यता असते. 
      वाटेत चालत असताना समोर दिसणारा ९० अंश कोणातील ताशीव कडा आपल्याला सतत खुणावत असतो. ही वाट गडाचा पहिला दरवाज्या पर्यंत येते या ठिकाणी दरवाजाचे काही अवशेष देवडी चा काही भाग व ढासळलेल्या अवस्थेतील बुरुजाची भिंत पहायला मिळते. दगडी खांबा वरून दरवाजाच्या भव्यतेची जाणीव होते. दरवाजापासून उजव्या हाताला काही अंतरावर कड्याच्या पोटामध्ये गुहा आहे. गुहे चे तोंड लहान असले तरी आत मध्ये खूप प्रशस्त आहे, बाजूलाच एक पाण्याचे टाके असून यातील पाणी अतिशय थंडगार असते.
केंजळगड
पायऱ्या


    दरवाज्याच्या डाव्या बाजूला गडाचे वैशिष्ट्य असलेला पायरी मार्ग नजरेस पडतो. सरळ उंच कडा चढून जाण्यासाठी  कडा तासून पायऱ्यांची निर्मिती केली आहे. या पायऱ्या अखंड खडकात असून बाजूची भिंत छन्नी ने तासून एकसमान केली आहे तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. हे पाहून काळा पाषाण फोडणारे हात किती दणकट असतील व त्याकाळचे स्थापत्य शास्त्र किती प्रगत असेल असा प्रश्न पडतो. एकंदरीत या ५७ पायऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्या पाण्यासाठी नक्की प्रत्येकाने भेट द्यावी असे वाटते.
    पायऱ्यां मधून वर गेल्यानंतर गडावरील दुसऱ्या दरवाज्याचे अवशेष नजरेस पडतात, या ठिकाणी जोता किंवा उंबरा असावा. गडावरील दोन्ही दरवाजा पैकी एका दरवाजाचा उल्लेख 'घळी' दरवाजा असा असून तो कोणत्या दरवाजासाठी वापरला जात असे हे सांगणे जरा कठीणच आहे. गड तसा छोटा व आटोपशीर असून त्याचा आकार लंबवर्तुळाकार आहे. गडावर संपूर्ण सपाट भूप्रदेश असून गवत जास्त वाढलेले आहे. गवतामुळे गडावरील अवशेष सहज दिसून येत नाहीत. ९०अंश कोणातील कड्याने नैसर्गिक रित्या तटबंदीचे काम पार पाडल्याने या किल्ल्याला फारशी तटबंदी दिसत नाही, गडाच्या दक्षिण बाजूला थोडी तटबंदी असून ती आजतागायत शाबूत आहे. गडाच्या दक्षिण दिशेने चालत जात असताना तटाच्या  बाजूला खोदीव पाण्याचे तळे लागते, यातील पाणी मधुर असून आत्तापर्यंत केलेल्या पायपिटी चा शिन येथील पाणी पिल्याने नक्कीच नाहीसा होतो.
केंजळगड
कोठार


       गडावर एक पडझड झालेल्या अवस्थेतील बुरुज आहे. गडावर काही इमारतींचे अवशेष व पाण्याचे टाके नजरेस पडतात. धोम धरणाच्या बाजूला चुण्याचा घाण आहे. घाण्याच्यापुढे घडीव दगड व विट बांधकामातील वास्तु आहे. याच्या भिंती मजबूत असल्या तरी इमारतीवर छप्पर मात्र नाही. एकंदरीत तिच्या रचनेवरून हे धान्य किंवा दारूगोळा कोठारात असावे! उत्तर पश्चिम दिशा रायरेश्वराचे पठार पसरलेले दिसते. कोठाराच्या बाजूने चालत गेले असता गडावरील दुसरा चुन्याचा घाणा नजरेस पडतो. गडावर दोन चुन्याचे घाणे आहेत म्हणजे पुर्वी गडावर पुष्कळ बांधकाम झाले असावे.  परंतु कालौघात त्या वस्तू नाहीशा झाल्या असाव्यात. गडाच्या मध्यभागी एक जुन्या मंदिराचे अवशेष असून ही गड देवता केंजळाई देवीचे मंदिर आहे, या ठिकाणी केंजळाई देवी ची मुर्ती व अन्य काही देवी-देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. गडाच्या उत्तर तटा नजीक शिबंदीची घरटी व एका मोठ्या वाड्याचे जोते ही नजरेस पडतात.
    केंजळगडाच्या मधोमध त्याची पूर्व-पश्चिम विभागणी करणारी एक भिंतीचे अवशेष आहेत.
    केंजळगडा वरून दूरवर नजर फिरवली असता सह्याद्री पर्वत, महादेव डोंगररांग, कमळगड, पाचगणीचे पठार रोहीडा, मकरंदगड, धोम धरणाचा जलाशय, रायरेश्वराचे पठार नजरेस पडते.

केंजळगड ला जायचे कसे:

       केंजळगड जाण्यासाठी मुख्यत्वे वाई व भोर असे दोन मार्ग आहेत.

भोर मार्गे:

       भोर वरून आंबवडे कोर्ले मार्गी गडाच्या शेजारी असणाऱ्या ओव्हरी गावातील शाळेपर्यंत गाडी जाते तिथून पुढे पायी चालत 20 ते 30 मिनिटात गडावर जाता येते.
       सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणार असाल तर भोर अंबवडे मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस दर तासाला धावतात, त्या बसने कोरले या गावी उतरून पायी चालत दोन तासांमध्ये केंजळगडावर जाता येते.

वाई मार्गे:

      वाईहून मेनवली रोडणे धोम धरणाला वळसा मारून खावली गावी यावे तिथून गडावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे त्या रस्त्याने एक ते दीड तासात चालत गडावर पोहोचतो.
      वाई मेनवली मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस धावतात,त्या बसने खावली या गावी उतरून उजव्या बाजूला जाणाऱ्या पायवाटेने चालत गेले की गडावर जाणारा रस्ता लागतो.
काय काळजी घ्यावी:
  •       गडावर पाण्याच्या टाक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
  •       गडावर मुक्कामाची सोय नाही परंतु टेंट बांधून गडावर मुक्काम करू शकता,किंवा गडाखालील वस्तीवर सणार्‍या मंदिरात किंवा शाळेत दहा ते बारा जणांच्या मुक्कामाची सोय होऊ शकते.
  •       पावसाळ्यात हा परिसर अतिशय सुंदर दिसतो मात्र गवत वाढल्याने गडावरील वास्तू दिसून येत नाही.
  •       जेवण व नाष्ट्याची व्यवस्था गडावर नाही.
  •       रायरेश्वर केंजळगड असा ट्रेक एका दिवसात पूर्ण होऊ शकतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण