मुख्य सामग्रीवर वगळा

गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे | Goa top 10 tourist places in marathi

गोवा पर्यटकांन स्थळ | goa tourist attractions

गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून भारतातील मुख्य पर्यटन स्थळ पैकी एक आहे त्यामुळे गोव्याला देश-विदेशातून असंख्य पर्यटक भेट देत असतात. स्वच्छ समुद्रकिनारे, वैविध्यपूर्ण खानपान, सुख सुविधा, असंख्य ऍक्टिव्हिटी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. हनिमून, फॅमिली ट्रिप, मित्रपरिवार बरोबर फिरायला जाण्यासाठी गोवा हे उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे आजच्या लेखामध्ये गोव्यातील मुख्यतः पर्यटन स्थळे व त्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

       गोव्यातील समुद्र किनारे आणि तेथील नाईट लाईफ साठी गोवा पर्यटकांमध्ये खास प्रसिद्ध आहे. गोव्यातील सुंदर समुद्र किनारे, कसिनो, क्लब पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. तर आपण जाणून घेऊया लेखामध्ये गोव्यातील पर्यटन स्थळाबद्दल

गोवा पर्यटन स्थळे
गोवा पर्यटन स्थळे


गोव्यातील पर्यटन स्थळे | goa tourist places in marathi

बागा बिच 

      बागा बिच हा गोव्याला येणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती असलेला समुद्र किनारा आहे. तुम्हाला वेळेचे बंधन असेल तर सरळ तुम्ही बागा बिच ला जावे कारण या ठिकाणी सर्व सुख सुविधा उपलब्ध आहेत. प्यारा सेलिंग बनाना राईड, नाईट क्लब, हॉर्स रायडिंग, यासारख्या गोष्टींचा पर्यटक आनंद घेऊ शकतात. समुद्र किनाऱ्यावर सायंकाळच्या वेळी बियर चार आस्वाद घेऊ शकता.


दूध सागर धबधबा | Dudhsagar waterfall

      गोव्याची राजधानी पणजी पासून 75 किलोमीटर दूर असणारा भारतातील काही खास धबधब्यांपैकी एक आहे. याचे अनेक नयनरम्य दृश्य आपण अनेक चित्रपटामध्ये पाहिले असेलच! दूधा साखरे उंच कड्यावरून खाली वाहणारे पांढरे शुभ्र पाणी पाहताना अक्षरशः रोमहर्षक वाटते.  धबधब्यांची उंची 320 मीटर एवढी आहे. उंच कड्यावरून वाहणारे पांढरे शुभ्र पाणी, तुषार उडवत जमिनीवर येताना ओलेचिंब करून जाते. यांच्या सौंदर्याछ भर म्हणजे याच्या मधून जाणारी रेल्वे लाईन म्हणावे लागेल.पर्यटक या ठिकाणी ट्रेकिंग ही करू शकतात.


कलंगुट बिच

        चार किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला कलंगुट बिच गोव्यातील एक प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. दुरवर पसरलेला पांढऱ्याशुभ्र वाळूचा उथळ समुद्रात स्नानाचा आनंद घैण्यासाठी असंख्य पर्यटक येत असतात. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी पॅरासेलिंग वॉटर स्किइंग, डॉल्फिन राईड, चार पर्यटक आनंद घेऊ शकतात.


अंजुना बिच 

       पणजी पासून २१ किलोमीटर अंतरावर अंजना बीच आहे अंजना बीच उत्तर गोव्यामध्ये येतो.शांत समुद्र किनारा , वाळूचा स्वच्छ सुंदर किनारा सहकुटुंब आनंद लुटण्यासाठी गोव्यातील उत्तम ठिकाण आहे.या ठिकाणी सायंकाळच्या वेळी सुर्यास्ताचा मनमोहक नजारा तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पर्यटक खरेदीचा आनंद लुटू शकतात त्यामध्ये हस्तकलेच्या वस्तू, बॅग, मसाले, कपडे यांचा समावेश होतो.


पालोलेम बिच 

       गोव्यातील प्रसिद्ध बिच मध्ये पालोलेम बिच चा समावेश होतो. ताडाची झाडे, पुढे निळाशार समुद्र सफेद वाळू याला खास बनवतात. झावळयां पासून बनवलेल्या झोपड्यांमध्ये बसून दुरवर समुद्राकडे पाहात बसावे हातात एखादे पेय असावे असा अनुभव याच ठिकाणी भेटू शकतो.या ठिकाणी इतकी शांतता असते की दुरपर्यंत लाटांचा आवाज काढीत पडतो.


मंगेशी मंदिर

      मंगेशी मंदिर हे गोव्यातील प्रसिद्ध मंदिर आहे. लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांचा या मंदिराशी जवळचा संबंध आहे. हे मंदिर भगवान शंकराचे आहे मंदिराच्या परिसरात असलेला सात माळ्यांचा मनोरा देखिल अतिशय सुंदर आहे.


 सिंक्वेरियम बिच 

         उत्तर गोव्यातील बागा बिचच्या बाजूलाच सिंक्वेरियम बिच आहे. हा बिच मौज मस्ती साठी खुप प्रसिद्ध आहे कारण या ठिकाणी अनेक नाईट क्लब, बार असून संगित क्लब चार मज्जा घेण्यासाठी तुम्ही येथे जाऊ शकता. त्याच बरोबर वॉटर स्किइंग, फिशिंग स्कूबा डायविंग, पॅरासेलिंग, आदिंचा आनंद घेऊ शकता


बेसिलीक ऑफ बोम जीजस चर्च  

    पणजी पासून दहा किलोमीटर अंतरावर जुन्या गोव्यामध्ये बोंम जीजस बेसिलिक चर्चा आहे. या चर्चेचे बांधकाम १६०५ मध्ये करण्यात आले, यामध्ये फ्रान्सिस जेवियर यांच्या अस्ती असून त्यांचे समाधी स्थळ ही आहे. या चर्चा समावेश वर्ल्ड हेरिटेज साईड मध्ये होतो. साधारण साधारण 400 वर्षे जुनी बांधकाम व त्यातील नक्षीकाम आकर्षक आहे.


अगुआडा किल्ला

     अगुआडा किल्ला गोव्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याची निर्मिती सोळाव्या शतकात केली गेली होती. याचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण असल्याने, ऐतिहासिक वास्तूंची आवड असणारे पर्यटक याला नक्की भेट देऊ शकतात‌. या किल्ल्यावर दिल चाहता है पिक्चर चे शूटिंग झाले होते. किल्ला पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. याचबरोबर फोर्ट चापोरा, पोर्ट रशोल,कारजूएम फोर्ट पाहण्यासारखे आहेत.


गोव्याला भेट देण्याची उत्तम वेळ. Best Time To Visit in Goa in marathi


         गोव्याला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे हिवाळा व उन्हाळा. नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान तुम्ही गोव्याला भेट द्यावी. यावेळी सर्वाधिक पर्यटक गोव्याला भेट देण्यासाठी येतात. गोव्यात जलविषयक क्रियाकलाप करण्यासाठी हा सर्वोत्तम हंगाम आहे.


गोव्यातील नाईट लाईफ

       गोव्यातील नाईट लाईफ काही खास आहे. या ठिकाणी सुंदर नाईट क्लब, पब, कसीनो,आहेत त्याच बरोबर समुद्र किनाऱ्यावर सायंकाळच्या वेळी पार्टीज चे आयोजन केले जाते. रात्रीच्या वेळेस समुद्र किनाऱ्यावर बियर घेऊन तासनतास लाटांचा आवाज ऐकत निवांत क्षण घालवू शकता.


गोव्याला जायचे कसे 

       गोवा हे पर्यटनाच्या दृष्टीने भारतातील महत्वाचे राज्य आहे. पर्यटक या ठिकाणी येण्यासाठी आपल्या सोयीचा पर्याय निवडू शकतात. तरी आपण गोव्याला भेट कशी देऊ शकतो हे आपण खालील प्रमाणे पाहू


 हवाई मार्ग गोवा

  जर तुम्हाला विमानाने इथे पोहोचायचे असेल तर दाबोलीम विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. हे गोव्याची राजधानी पणजीमपासून 29 किमी अंतरावर आहे. येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे येतात. हा विमानतळ यूके आणि जर्मनीला गोव्याशी जोडतो.


रेल्वे मार्ग

  मडगाव आणि वास्को-द-गामा ही गोव्याची मुख्य रेल्वे स्थानके आहेत आणि इतर शहरांशी चांगली कनेक्टिव्हिटी आहे. भारतातील बहुतांश राज्यांतून येथे येऊ शकतात.


 रस्ते मार्ग

  गोवा इतर शहरांशी उत्कृष्ट रस्त्यांनी जोडलेले आहे. पणजी मधील कदंब हे मुख्य बसस्थानक असून या ठिकाणाहून दुसऱ्या शहरांशी बस वाहतूक होते. महाराष्ट्रातील मुख्य शहरातून गोव्यासाठी राज्य परीवहन बसेस ची सेवा उपलब्ध आहे.


गोव्यातील पर्यटन स्थळाबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली असून ही माहिती तूम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, गोव्यातील समुद्र किनारे, गोव्याला जायचे कसे हे आपण सदर लेखात पाहिले तरी तुमच्या आणखी काही सुचेना किंवा तक्रारी असतील तर या ही नक्की कळवा!

                        धन्यवाद 🙏

       

          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण