मुख्य सामग्रीवर वगळा

कास पठार माहिती | Kaas plateau information in Marathi

कास पठार माहिती | Kaas plateau information in Marathi  

       सातारा पर्यटन स्थळांनी समृद्ध असा जिल्हा असून या ठिकाणी अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत त्यापैकी एक कास चे पठार रंगबिरंगी फुलांचा गालिचा पसरलेला असताना जनू स्वर्ग भासतो. फुलांचा बहर येताच पर्यटकांचे पाय आपोआप कासच्या दिशेने वळतात. कास पठारावर दुर्मिळ अशा अनेक वनस्पती असून त्यातील बऱ्याचशा नष्ट होण्याच्या मार्गावरील आहेत तर काही फक्त या पठारावरच सापडतात त्यामुळे याला २०१२ युनेस्को जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करून नष्ट होणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन करणे व नवीन वनस्पतींचे संशोधन करण्याचे काम हाती घेण्यात आले. पावसाळा सुरू झाला की विविध रंगाची व आकारांची रंगीबेरंगी फुले फुलू लागतात व पठारावर १२-१३ चौरस किमीच्या परिसरात रंगबिरंगी फुलांचा गालिचा पाहायला मिळतो, त्यामध्ये कार्वी, मिकी माऊस ऑर्किड सारखी कुरणे पहायला मिळतात. रंगीबेरंगी फुलपाखरे तसेच कोयना अभयारण्याचा परिसर असल्याने या ठिकाणी गवा, हरिण, ससे, भेकर, बिबट सरपटणारे प्राणीही पहायला मिळतात. महाराष्ट्राच्या सात आश्चर्य मध्ये कास पुष्प पठाराचा समावेश आहे. कास पठाराची माहिती पाहत असताना येथील जैवविविधतेला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे.
कास पुष्प पठार फोटो
कास पुष्प पठार


कास पठार पुष्प हंगाम | Best time to visit Kaas plateau in Marathi

   कासच्या पठारावर पावसाळा सुरू झाला की असंख्य प्रकारच्या वनस्पती व फुले उमलू लागतात.जैवविविधतेने परिपुर्ण पठारावर अनेक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दूर्मीळ वनस्पती येतात.त्यामुळे कास चर्या पुष्प पठाराला अनन्य साधारण महत्व आहे. फुले बहरण्याचा काळ पावसाळ्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत असतो तरीपण सप्टेंबरच्या मध्यामध्ये सर्वोत्तम वेळ असून या काळामध्ये बहुतेक फुले उमललेली असतात. 
   

कास पठार ऑनलाईन तिकीट बुकिंग |

     कास हे प्रतिबंधित क्षेत्र असल्याने या ठिकाणी पर्यटकांना प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी फी प्रतिव्यक्ती १०० रू एवढी आहे. त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणीची प्रत प्रिंट आऊट काढून बरोबर घेऊन जाणे अनिवार्य आहे. दररोज भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा असून ती फक्त २००० व्यक्ती प्रतिदिन एवढी आहे.
कास पुष्प पठार फोटो


कास पठार कोठे आहे.

       कास चे पुष्प पठार सातारा जिल्ह्यात असून सातारा शहरा पासून पश्चिमेला २४ किमी अंतरावर आहे. सातारा शहरातून यवतेश्वर चा घाट चढून गेल्यावर सात ते आठ किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध कास पुष्प पठार आहे. महाबळेश्वर या प्रसिद्ध पर्यटन स्थळा पासून तापोळा रोड ने ३८ किलोमीटर अंतरावर आहे. कास चे पठार पुण्यापासून अंतर १३० किमी तर मुंबई पासून २७० किमी एवढे आहे. 
       

कास पठाराचे भौगोलिक स्थान व हवामान

        सह्याद्री पर्वतरांगेच्या घाटमाथ्यावर कास पुष्प पठार असून याची समुद्र सपाटी पासून ची उंची १२०० मीटर एवढी आहे. याला स्थानिक भाषेत सडा असे म्हणतात
 ज्वालामुखी द्वारे निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकापासून बनले असून त्यावरील २५-३० मिली मिटर च्या पातळ आम्लयुक्त मातीचा थर आहे.Kaas plateau चा प्रदेश कोयना अभयारण्यात येत असल्याने येथे वन्यजीवन चक्र सुरळीत आहे.

कास पठार सातारा

        कास बद्दल बोलायचे झाले तर याला पर्यटनाचे तिर्थक्षेत्र म्हणावे लागेल. पावसाळ्यात संपुर्ण परिसराचे सौंदर्य स्वित्झर्लंड ला ही फिके पाडेल असे असते. अशा या जैवविविधतेने नसलेल्या कास पठार पर्यटन शास्त्रज्ञ निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. मानवी हस्तक्षेपामुळे येथील पर्यावरणाला हानी पोहोचण्याचा धोका असल्याने पर्यटक संख्या नियंत्रित केले आहे व दररोज २००० एवढेच पर्यटक याला भेट देऊ शकताथ. हिरवीगार डोंगर, धबधबे, खोऱ्यातून वाहणारे ठग, दाट धुके, पावसाच्या सरी, सारं काही स्वर्गाहून सुंदर भासते. याच पठारावर पावसाळा सुरू झाला की ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान असंख्य प्रकारची रानफुले फुलू लागतात त्यामध्ये अनेक दुर्मिळ प्रजाती पहायला मिळतात. साधारण पणे १२ चौरस किलोमीटर चर्या परिघात ८५० पेक्षा कमी जास्त प्रमाणात वनस्पती वेली झुडपे आढळतात. त्यामध्ये २८० फुलांच्या प्रजाती आहेत. त्यातील नामशेष होण्याचा धोका असलेल्या दूर्मीळ ३९ प्रजाती कास पठारावर आढळतात.या फुलांवर भिरभिरणारी असंख्य रंगीबेरंगी फुलपाखरे पहायला मिळतात. ही फुले हंगामी स्वरुपाची असून नोव्हेंबर पर्यंत सर्व फुले मावळून जातात. उन्हाळ्यामध्ये हेच पठार रूक्ष वाटू लागते.

कास येथील पर्यटन स्थळे | What are the best places to visit in Kaas pathar

       कास पठारावर फुलोत्सवा बरोबरच बरीच अशी ठिकाणे आहेत जी पर्यटकांना आकर्षित करू शकतात ती आपन खालील प्रमाणे पाहू

  कास तलाव

        गर्द हिरव्या झाडीमध्ये डोंगराच्या कुशीत कास चा छोटा पन सुंदर तलाव आहे. हा तलाव कास तलाव या नावानेच ओळखला जातो. कास तलावाचे पाणी सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाते. तलावामध्ये पर्यटक नौकाविहार करू शकतात त्याच बरोबर या ठिकाणी गरमागरम चहा भजी वडापाव चा आस्वाद घेऊ शकतात

वजराई भांबवली धबधबा

       कास पठारा पासून तीन किलोमीटर अंतरावरील भारतातील सर्वात उंच धबधबा आहे त्याला वजराई भांबवली धबधबा असे म्हणतात. धबधबा अल्पपरिचित असल्याने या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ कमी असते. धबधबा तिनं टप्पात वाहत असून त्याचे दृष्य मनमोहक आहे. धबधब्याची भव्यता छातीत धडकी भरवेल अशीच आहे. वजराई धबधब्याच्या सड्यावर ही फुलांचे पठार असून येथे ही फुलांचे सुंदर गालिचे पहायला मिळतात. धबधब्या कडे जाणारी पाऊल वाट जंगलातून असून जंगलामध्ये जळवा अधीक असल्याने शरीर झाकेल अशी कपडे घालावेत.

एकीव धबधबा

      कास पठारा शेजारीच एकीव चा धबधबा आहे याला पाबळ असे म्हणतात दुंद मोळेश्वर रोडवरील हा धबधबा छोटा असून पाण्यात भिजण्याचा आनंद घैण्यासाठी योग्य आहे. कास पठारावरील पावसाच्या पाण्यामुळे हा धबधबा तयार झाला आहे. कास ला आलेले पर्यटक या धबधब्या मध्ये भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटू शकतात.

चाळकेवाडी पवनचक्की प्रकल्प

     कास पठारापासून जवळच चाळकेवाडी येथे सह्याद्री पवनचक्की प्रकल्प आहे. हा पवनचक्की प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा म्हणून परिचित आहे. या पठारावर दूरवर पर्यंत पवनचक्क्यांचे जाळे पाहायला मिळते. कोयना अभयारण्य, पठारावरील दाट धुके, जोरदार वारा पर्यटकांना आकर्षित करत असतो.  


कास पठाराला भेट देण्याची योग्य वेळ

        पावसाळा सुरू झाल्यानंतर वेगवेगळे फुले भहरू लागतात हा कालावधी ऑगस्ट ते ऑक्टोबर हा आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी साधारणपणे पठारा वरील सर्व फुले उमललेले असतात त्याचबरोबर वजराई धबधबा एकिव धबधबा ओसंडून वाहत असतो त्यामुळे सप्टेंबर हा महिना कास पुष्प पठाराला भेट देण्याची योग्य वेळ आहे.

काल बद्दल थोडक्यात माहिती

    कास येथे पर्यटकांच्या साठी इलेक्ट्रिक सायकलची सोय केली आहे इलेक्ट्रिक सायकलचे भाडे पन्नास रुपये प्रति व्यक्ती तेवढी आहे.
    कास येथे राहण्याची सोय नाही त्यासाठी सातारा येथे उत्तम हॉटेल्स उपलब्ध आहेत.
    नाईट सफारी साठी पिक अप याचे सोय त्याचे भाडे चार हजार एवढे आहे.

    
कास पुष्प पठाराला जायचे कसे

      कास पुष्प पठाराबद्दल आपण संपूर्ण माहिती वरील प्रमाणे पाहिली तरी आपण या पठारला भेट कशी देऊ शकतो हे आपण खालील प्रमाणे पाहू

रस्ते मार्ग 

     कसला भेट देण्यासाठी येणारे पर्यटकांना प्रथम सातारा येथे यावे लागते. सातारा महाराष्ट्रातील मुख्य शहर असून ते रस्ते मार्गे महाराष्ट्रातील इतर शहरांशी जोडलेले आहे. महाराष्ट्रातील अन्य शहरातून जसे की मुंबई पुणे कोल्हापूर येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सातारपर्यंत धावत असतात. खाजगी वाहनाने येणारे पर्यटन पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाने सातारा मार्गे कासला जाऊ शकतात. त्याचबरोबर महाबळेश्वर तापोळा बामणोली मार्गे ही कास ला जाऊ शकतात. सातार मधून खाजगी वाहनाने किंवा एसटी बसने कासला जाऊ शकतो. 
     वनविभाग व सातारा जिल्हा प्रशासनाने खास पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक बस ची सोय पर्यटकांसाठी केले आहे त्याचाही पर्यटक लाभ घेऊ शकतात.

रेल्वे मार्ग

      माहुली हे जवळचे रेल्वे स्थानक असून ते सातार पासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. माऊली पासून सातारला येण्यासाठी बस किंवा ऑटो रिक्षा उपलब्ध होतात.

हवाई मार्ग

     कासला हवाई मार्ग जाण्यासाठी जवळचा हवाई अड्डा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हा आहे जो कास पासून १३५ किलोमीटर अंतरावर आहे. तिथून पुढे पर्यटक खाजगी वाहनाने किंवा राज्य परिवहन महामंडळाचे बसेस सातारपर्यंत जाऊ शकतात.

   Kaas plateau information in Marathi हा लेख आपल्याला कसा वाटला हे जरूर कळवा. कास पुष्प पठाराची माहिती आपन पाहिलीत तर या बद्दल धन्यवाद
   आपन आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर काही सुचना असतील तरी जरुर कळवा धन्यवाद


कास पुष्प पठार फोटो

कास पुष्प पठार फोटो
सोनकी



कास पुष्प पठार फोटो
कारवी


कास पुष्प पठार फोटो
मिकी माऊस


कास पुष्प पठार फोटो
पंद


कास पुष्प पठार फोटो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण