मुख्य सामग्रीवर वगळा

थिबा पॅलेस रत्नागिरी | Thiba palace in Marathi

थिबा पॅलेस रत्नागिरी
थिबा पॅलेस रत्नागिरी


थिबा पॅलेस कुठे आहे:

      रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील थिबा पॅलेस ब्रह्मदेश आणि रत्नागिरीचे अनोखे नाते सांगतो. रत्नागिरी शहरातील  पर्यटन आकर्षण आणि महत्त्वाची वास्तू असलेला हा आलिशान राजवाडा म्हणजे थिबा राजासाठी जणू तुरुंगच भासत असावा. थिबा पॅलेस महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. 

थिबा मीन राजा कोण होता:

    थिबा मीन राजा  ब्रह्मदेश च्या राजगादी वर सन १८७८ मध्ये बसला, त्याच वेळी ब्रिटिशांनी ब्रह्मदेश चा काही भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. अशा परिस्थितीत थिबा राजाने ब्रिटिशांच्या राज्यविस्ताराला विरोध करून युद्ध पुकारले या युद्धामध्ये इंग्रजांच्या सैन्यापुढे थिबा राजाचा निभाव लागला नाही.  या पराभवानंतर थिबा राजाचे कुटुंबीय चहूबाजूला विखुरले गेले.

     इंग्रजांनी पूर्ण ब्रह्म देशावर ताबा मिळवल्या नंतर थिबा राजा पुन्हा उठाव करेल या भीतीने त्याला स्थानबद्ध करून ब्रह्म देशापासून सुमारे ३००० किलोमीटर दूर असलेल्या मद्रास व तेथून कोकणातील रत्नागिरी या ठिकाणी इ.स.१८८५ मध्ये आणून ठेवले. जेमतेम सात वर्ष ब्रह्मदेश वर थिबा मिन राजाला राज्यकर्ता आले. थिबा राजा बरोबर त्याची पत्नी व राजकन्या यांनाही आणले होते. 

    सुरूवातीची बरीच वर्ष त्याला इतरत्र ठेवल्यानंतर, १९१० मध्ये त्याच्यासाठी रत्नागिरीतील भाट्येच्या समुद्रकिनारी २७ एकर जमीनीवर तत्कालीन एक लाख सदतीस हजार रुपये खर्च करून तीन मजली प्रशस्त असा राजवाडा बांधला. या राजाला स्व खर्चासाठी इंग्रज सरकारकडून महिना एक लाख पेन्शन मिळत असे परंतु कालांतराने तिही कमी होत गेली. थिबा राजने स्वतः राजवाड्याच्या बांधकामावर लक्ष ठेवून ब्राह्मी शैलीमध्ये राजवाडा बांधून घेतला. यावेळी राजवाड्याचे नक्षीकाम व पॅलेसच्या इटालियन शैलीतील खिडक्या वर विशेष लक्ष दिले.

   थिबा राजा आपल्या परिवारासह इ.स.१९११ मध्ये या राजवाड्यात राहण्यासाठी आला. आपल्या स्वतःच्या जन्मभूमी पासून इतक्या दुर आलेला राजा पुन्हा आपल्या मातृभूमीत जाऊ शकला नाही व पंचवीस वर्षाच्या कैदे नंतर ५८ व्या वर्षी १९१९ मध्ये दुर्दैवी मरण पावला.
थिबा पॅलेस रत्नागिरी
थिबा पॅलेस रत्नागिरी



थिबा पॅलेस:

       लाल रंगातील हा प्रशस्त असा राजवाडा नजर खिळवून ठेवतो. राजवाड्यांचे बांधकाम ब्राह्मी शैलीमध्ये असून खिडक्यांचे काम इटालियन शैलीमध्ये पाहायला मिळते. हा राजवाडा तीन मजली असून याच्या गॅलरी मधून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. राजवाड्याच्या छतावर लावलेल्या लाकडी रिप वरील एक समान नक्षीकाम सुंदर दिसते. खिडक्यांना वापरलेल्या रंगीबिरंगी काचा आकर्षक आहेत.

       राजवाड्या मध्ये थिबा राजाच्या वापरातील अनेक वस्तू पाहायला मिळतात. तसेच तळमजल्यावर अनेक सुंदर मूर्ती ठेवण्यात आले आहेत दुसऱ्या माळ्यावरील चित्र गॅलरी हे खास आकर्षणाचे केंद्र बनते. तसेच अनेक पुरातत्त्व वस्तू या ठिकाणी पाहायला मिळतात. संगमरवरी बांधकामातील नृत्याग्रह खास आहे.

       राजवाडा जवळच जिजामाता उद्यान असून तेथून मावळतीच्या सूर्याचा दृश्य पायला मिळते. दूरवर क्षितिजापलीकडे जाणारा सूर्य पाण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. या उद्यानातून भाट्ये बीच राजिवडा बंदर भगवती किल्ला ठिकाणी पाहू शकतो.
       याठिकाणी समुद्राचे वाहणारे गार गार वारे अंगावर घेत तासन्तास बसून राहावेसे वाटते.
थिबा पॅलेस रत्नागिरी
थिबा पॅलेस रत्नागिरी


थिबा पॅलेस ला जायचे कसे:

  •       थिबा पॅलेस रत्नागिरी शहरात असून या ठिकाणी जाण्यासाठी बसस्थानका पासून रिक्षा भेटतात.
  •       खाजगी गाडीने येणाऱ्यांसाठी शहरातूनच शिवा प्रदेश ला जावे लागते.
  •       राजवाडा दर सोमवारी पर्यटकांसाठी बंद असतो.

इतका सुंदर राजवाडा पाहून जात असताना मनामध्ये मात्र दुःख होत असते व दुर्दैवी थिबा राजा सतत आठवत राहतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण