मुख्य सामग्रीवर वगळा

इर्शाळगड किल्ला | Irshalgad fort information in Marathi

       इर्शाळगड पावसाळा किंवा हिवाळ्यात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधीक असते कारण ही तसेच आहे निसर्गाची मनसोक्त उधळण हिरव्यागार डोंगर रांगा दाट धुके,पावसाच्या सरी आणी गडावरून दिसणारे नयनरम्य दृश्य असै वातावरण वर्षभराची धावपळ आजूबाजूचा  गोंगाटा या पासून मुक्ततः मिळते व नविन उर्जा प्राप्त होते.


    इर्शाळगड मुंबई पुणे लोहमार्गावर पनवेल पासून साधारण २०किमी अंतरावर असलेला किल्ला महाराष्ट्रातील सुरुवातीच्या काळात जे केले निर्माण झाले त्या काळातील किल्ला नक्की असावा. उंची ३७०० फूट असून गिरीदुर्ग प्रकारातील या किल्ल्यावर वेगळ्या ठिकाणी खडकात खोदून निर्माण केलेल्या चार पाण्याची टाकी आहेत तसेच गुहा पाहायला मिळतात परंतु गुहेपर्यंत जाणे जिकरीचे काम आहे याव्यतिरिक्त किल्ल्यावर पाण्यासारख्या वास्तू किंवा अवशेष आढळत नाहीत किल्ल्यावरील मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्याच्या वरील भागात असलेले निसर्गनिर्मित नेढ होय सर्वसाधारणपणे सात ते आठ फूट चंद्रकृती आकाराचे हे नेढ आहे. नेढ आर पार असून यामधून व्यक्ती पलीकडे सहज जाऊ शकते. याठिकाणी येण्यासाठी छोटासा उभा कडा चढून यावे लागते हा कडण्यासाठी दोन छोट्या शिड्या व दोरखंडाची व्यवस्था करण्यात आली आहे परंतु हा कळताना अपघाताची शक्यता आहे त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
irshalgad fort


     पनवेल लोणावळा मार्गावरील चौक गावातून मोरबे धरणाच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या मानवली चौकातून गडाकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने पुढे गेल्यास गडाच्या पायथ्याशी असणार्या गावामध्ये जेवण नाश्त्याची सोय होते याच ठिकाणी वाहन पार्क करावे लागते. समोर आपल्याला एक छोटी टेकडी व त्याच्या पलीकडे उंच असा दिसतो पायवाटेने गेल्यानंतर सुरुवातीला एक टेकडी लागते त्या टेकडीवर गेल्यानंतर बाजूला असणारा मोरबे धरणाचा जलाशय अतिशय सुंदर दिसतो आणि हे दृश्य सुरुवातीलाच आलेला थकवा दूर करण्यासाठी पुरेसे आहे. 
Irshalgad fort
इर्शाळगड


 पायवाटेने जात असताना कधी सपाटी तर कधी चढण असा रस्ता गडाच्या मध्यावर असणाऱ्या इर्शाळवाडी मध्ये येऊन पोहोचतो.३०ते४० कौलारू घरांची ही वाडी आहे. याठिकाणी घरगुती पद्धतीचे जेवण व नाश्त्याची सोय होते तसेच लिंबू सरबत ही मिळू शकते. पूर्व आणि पश्चिम दिशेने गडावर जाण्यासाठी वाट आहेत पूर्वेकडील वाट अतिशय अवघड असल्याने पश्चिमेकडील वाटेने त्यामानाने थोडे सोपे आहे. या वाडीतून गडा कडे जात असताना वाटेमध्ये इसाळ देवीचे छोटे मंदिर लागते.वाटेत छोटे छोटे पाण्याचे प्रवाह घनदाट झाडी लागते. इथून पुढे छोटी चढण चढून गेल्यानंतर गडाच्या वरील टप्प्यावर येऊन पोहोचतो या ठिकाणावरून गडाच्या सुळक्याची भव्यता नजरेस पडते या दिशेने पुढे गेल्यानंतर उत्तरेकडील वाटेने जाणारा मार्ग निवडावा लागतो हा रस्ता अतिशय अरुंद असून एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला उंच कडा आहे काही अंतर चालून गेल्यानंतर कडून जाण्यासाठी गडाच्या वरच्या भागात जाण्यासाठी शिडी व दोर थंडा ची व्यवस्था केलेली पाहायला मिळते या ठिकाणावरून वर जात असताना खडकात खोदलेले पाण्याची टाकी पाहायला मिळतात व एका देवीचे मंदिर पाहायला मिळते. वर चढून गेल्यानंतर नेढ्या पर्यंत जाऊन पोहोचतो. येथुन वर गेल्यानंतर  गडाच्या वरच्या भागात मध्ये येऊन पोहोचतो. याठिकाणी गडाचा मुख्य सुळका आहे. सुळक्या वर जाणे अतिशय अवघड असल्याने या ठिकाणी जायचा कुणीही प्रयत्न करू नये. सुळक्याच्या एकाबाजूला पाण्याचे टाके आहे र दुसर्‍या बाजूला पाच सहा माणसे बसतील एवढी सपाट जागा आहे या ठिकाणी बसून समोरचा परिसर व्यवस्थित पाहता येतो आकाश स्वच्छ व निरभ्र असेल तर गडावरुन राजमाची, ढाग, तुंग, माणिक गड, कर्नाळा, प्रबळगड, हे गड पाहू शकतो तसेच माथेरान व पनवेल हे ही पाहू शकतो.

इतिहास:

       इरशाळगड किल्ल्याचा इतिहासामध्ये फारसा उल्लेख आढळत नसला तरी. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सरदार बाबाजी महादेव यांना कल्याण ची मोहीम सोपवली होती त्यामुळे मी कल्याण भिवंडी पासून रायरी पर्यंतचा सारा मुलुख स्वराज्यात आला त्यामध्ये इरशाळगड साई समावेश असावा. सरनोबत नेताजी पालकर यांचा जन्म इरशाळगाच्या पायथ्याची असलेल्या चौक या गावात झाला. प्रथम आंग्ल मराठा युद्ध वेळी येथील गडांच्या मदतीने मराठा सैन्याने ब्रिटिशांच्या मुंबई कंपनीचा पराभव केला व त्यांना मुंबई पुरतेच मर्यादित ठेवले.
इर्शाळगड चा सुळका

कसे जावे:

        इरशाळगड ला जाण्यासाठी पनवेल वरून लोकल ट्रेन ने चौक गावामध्ये उतरून गडावर जाता येते तसेच एसटी बसेस ही थांबतात पनवेल पासून खाजगी वाहनांची सोय होऊ शकते
        पुण्यावरून येणाऱ्यांसाठी लोणावळा खोपोली खालापूर मार्गे चौक या गावातून किल्ल्यावर जाता येते लोणावळ्यावरून लोकल ट्रेन चौक रेल्वे स्टेशन ला उतरून इर्शाळशळ गडावर जाता येते.
कडा

काय काळजी घ्यावी:

         किल्ल्याची चढाई अतिशय कठीण व निसरडा असल्याने चांगल्या प्रतीचे ट्रेकिंगचे बूट व हातामध्ये सपोर्टसाठी काठी असणे आवश्यक आहे. व आपण आपली स्वतः विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
        आपल्याबरोबर मुबलक प्रमाणात पाणी असणे आवश्यक आहे किल्ला चढताना त्याच्या अत्यंत आवश्यकता जाणवते.
        किल्ल्याच्या पायथ्याशी जेवण व नाश्त्याची घरगुती पद्धतीची सोय होऊ शकते.
        किल्ल्याच्या सुळक्यावर चढण्याचा प्रयत्न करू नये याच ठिकाणी अपघाताची जास्त शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण