मुख्य सामग्रीवर वगळा

चावंड किल्ला माहिती

 

      मराठे शाहीचा इतिहास आणि गडकिल्ले यांचे नाते म्हणजे आई मुला सारखे घट्ट,या किल्ल्यांनी किती मावळ्यांना लढाई आणि गणिमी कावा करायला शिकवले असेल याची गणतीच नसेल.काती लढाया पाहिल्या असतील,किती तोफांचे गोळे पाठीवर घेतले असतील फक्त त्यांनाच माहीत.  स्वराज्याचा पाया रचला तोही गडांच्या साक्षीने आणि यांची मुहूर्त मेड रोवली ती म्हणजे छञपती शिवाजी महाराजांनी.

परिचय:

       सह्याद्री पर्वत रांगेत अनेक किल्ले उभे आहेत. त्यातील नाणेघाट या व्यापारी मार्गावर घाटाचे पहारेकरी म्हणून जीवधन,हडसर, शिवनेरी, आणि चावंड किल्ले परिचयाचे आहेत.
      चावंड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून याची समुद्र सपाटी पासून उंची साधारण ३४०० फूट एवढी आहे. कुकड नदी च्या उगम स्थाना पाशी गड असल्याने याला 'कुकडनेर' असेही म्हणतात. 

चावंड किल्ला वरून दिसणारे दृष्य


      चावंड किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर पासून १५-१६ किलोमीटर अंतरावर आहे.या किल्लाच्या पायथ्याशी असलेल्या चावंड गावात पोहचायला ४०-४५ मिनिटे लागतात.येथे पोहोचवल्या नंतर आपल्याला मोबाईल ही फालतू गोष्ट आहे असे हमखास वाटते कारण या ठिकाणी कोनत्याही मोबाईल सिम कार्ड ला रेंज येत नाही.चावंड गावात किंवा गडाच्या पायथ्याशी वाहने जातात.



      चावंड गावातील आश्रमशाळे पासुन मळलेल्या पायवाटेने चालाय सुरुवात केल्यानंतर, समोर दिसणारा ९०अंश कोनातील कातळ कडा धडकी भरेल असा भासत असला तरी  Tracking करणे सोपे आहे. साधारण २० मिनीटांचा चाली नंतर गडाच्या पायरी मार्गावर येऊन पोहोचतो.

गड दर्शन:

       वनविभाग व शिवाजी ट्रेल या संस्थेने केलेल्या पायरी व रेलींग कामामुळे गड चढणे सोपे झाले आहे या साधारण ३५०-४०० पायऱ्या आहेत. तर काही पायरी खडकात कोरलेल्या आहेत,दिड फूट उंचीच्या एकूण १००-१२५ पायरी आहेत.पायरी मार्गे वर गेल्यानंतर गणेश पट्टी शिल्प असलेल्या दरवाजात येऊन पोहोचतो.दरवाजा उंच पूरा असून कोरीव दगडात यांचे बांधकाम झाले आहे. दरवाजाच्या वरती व बाजूला गणपतीच्या दोन मूर्ती कोरलेल्या आहेत.या दरवाजातून आत गेल्यानंतर जुनाई देवी चे दर्शन होते,याच ठिकाणी आजूबाजूला उध्वस्त वास्तू व त्यांचे अवशेष पहायला मिळतात.



       उजव्या बाजूस जानाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर पुष्करणी पहायला मिळते.तिच्या भिंतीवर बरेच नक्षीकाम केलेले आहे.तिच्या मधील पाणी खुप खराब असून पिण्या योग्य नाही.आशी मान्यता आहे की आकाशातून येणाऱ्या अति शुद्ध लहरी या पुष्करणी जवळ येकञ येतात . बाजूलाच एक महादेवाचे प्राचीन मंदिर आहे,या मंदिरात पिंड असून तिची साळूंखी अस्तीत्वात नाही.



       उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून वर गेले असता काही वास्तूंचे अवशेष व एका इमारतीचा चौथरा दिसतो. या ठिकाणी ३००-४०० वर्ष जुनी सौचालर पहावयास मिळतात.या वास्तू पाहून असा निष्कर्ष काढू शकतो की या ठिकाणी पुर्वी नागरी वस्ती असावी.या ठिकाणी दोन फूट व्यासाची दगडी ऊखळ आहे तसेच बाजूला दोन टाक्या आहेत.
       बाले किल्लातील चावंडा देवीचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते.या मंदिराचे बांधकाम किंवा जिर्णोद्धार नजीकच्या काळात केला गेला असावा. मंदिर छोटे असून कळस लक्ष वेधक आहे.
       पुढे चालत गेल्यावर मोडकळीस आलेले मंदिर व पाण्याचा हात टाक्या दिसतात.या सप्तमातृकांशी संमंधीत यांचा संबंध आहे.याच्या पुढे काही लेणी समूह व दारूगोळा साठवणूक करण्याचे कोठारे पहायला मिळतात.यातील एका कोठारात पाण्याचे दोन हौद निदर्शनास येतात. याच ठिकाणी विस्तीर्ण निर्जन सपाट प्रदेश आहे.आवर युद्ध अभ्यास केला जात असावा.घडाच्या बऱ्याच भागात तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात.



      गडाच्या तटाखाली भूयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे, हा मार्ग अतीशय लहान असून ३ फूट उंच व ३ फूट रुंद आहे.

चावंड किल्ल्याचा इतिहास:

      निजामशाही ची स्थापना करणाऱ्या मलिक अहमद ने सुरवातीला जे किल्ले घेतले त्यामध्ये या किल्ल्याचा समावेश होता.
      या किल्ल्याचा उपयोग कैदखाना म्हणून केला जात असावा कारण दुसरा बुरहान शहा याने निजामशहा यांचा नातू बहादुर शहा यास या किल्ल्यावर कैद केले होते.
      १६३६ मध्ये आदिलशाही व मोगलां पासून निजामशाही चा बचाव करण्यासाठी शहाजी राजांनी जो  तह केला त्यात चावंड किल्ला मोगलांकडे गेला.



      १६७२ मराठा सैन्याने स्वराज्यात आणला.त्यानंतर छञपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नावं प्रसन्नगड असे केले.
      १८१८ मध्ये या किल्ल्यावर आक्रमण करून किल्ल्यावरील वास्तू व पायऱ्या उध्वस्त केल्या.त्यानंतर चर्या कालखंडात हा किल्ला ब्रिटिश सरकारचा अधिपत्याखाली आला.



  चावंड किल्ल्यावर जायचे कसे:

       चावंड किल्ल्यावर जाण्यासाठी पुण्यावरून नारायण गाव किंवा जून्नर ला गेला असता तिथून पुढे नाणेघाट ला जानाऱ्या वाटेने गेला की १२ किमी अंतरावर चावंड गावात जाऊ शकता.
       नाशिक वरून येणारे पर्यटक इगतपुरी किंवा सिन्नर मार्गे येऊ शकतात.सिन्नर मार्गे जून्नर ला येऊन तिथून चावंड ला जाऊ शकता.नाशिक पासून चावंड किल्ल्याचे अंतर साधारण १४५ किमी आहे
       मुंबई वरून येणारे पर्यटक मुरबाड घाटघर मार्गे चावंड किल्ला ला भेट देऊ शकतात.मुंबई पासून १२० किमी अंतरावर चावंड किल्ला आहे.


काय काळजी घ्यावी:

       किल्ला ला भेट देणाऱ्या पर्यटकांनी सोबत पाणी बाळगावे कारण किल्ल्यावर तलाव भरपूर आहेत परंतु त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.
       किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांनी स्वताचा वाहनाने येणे ऊत्तम. आपल्या बरोबर माहितगार माणूस असेल असावा.

   जवळील पाहण्यासारखी ठिकाणे:

            नाणेघाट, निमगिरी,मानिकडोह,जिवधन, हडसर






      

      

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

कृपया नकारार्थी कमेंट टाळावे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण