मुख्य सामग्रीवर वगळा

मल्हारगड किल्ला माहीती

परिचय

    महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत त्यातील काही हजार वर्ष जुने आहेत काळाच्या ओघात अनेक किल्ल्याची पडझड  झाल्याने कोणता किल्ला सर्वात प्रथम बांधला हे जरी सांगता येत नसले तरी मल्हारगड हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात शेवटी बांधला गेल्याचा उल्लेख पेशव्यांच्या कागदपत्रत आढळतो.



 मल्हार गडाची निर्मिती पेशव्यांचे सरदार पानसे यांनी इसवी सन सतराशे सत्तावन ते सतराशे साठ या काळामध्ये केली या किल्ल्याची निर्मिती महाराष्ट्रातील अन्य किल्ल्यांच्या तुलनेत अलीकडील असल्याने याला तरुणगड असेही म्हणतात.

 पुणे जिल्ह्याच्या दक्षिण बाजूला सह्याद्री पर्वतरांगाच्या  दोन उपरांगा पूर्वेकडे जातात त्यातील भोलेश्वर डोंगररांगेत मल्हार गडाची बांधणी केली आहे यात रांगेत वज्रगड पुरंदर व सिंहगड येतात र दुसर्‍या रांगेत तोरणा व राजगड हे किल्ले येतात.



 हा किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश पुणे सासवड रोड वरील दिवे घाटावर नजर ठेवण्यासाठी किंवा टेहळणी करण्यासाठी तोफ गोळे बनवण्याचा कारखाना यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या गडाच्या पायथ्याशी असणारे सोनोरी या गावात सरदार पानसे यांचे वास्तव्य होते या ठिकाणी त्यांचा वाडाही आहे या सोनोरी गावावरून गडास सोनोरी गड असेही म्हणतात.

 किल्ल्यावर काय पहावे

  मल्हार गड  अन्य किल्ल्यांच्या तुलनेत कमी उंचीचा व आटोपशीर केला आहे या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची तीन हजार 166 फूट एवढी आहे किल्ला त्रिकोणी आकारात असून बालेकिल्ला चौकोनी आकाराचा आहे.

 किल्ल्याच्या चारी बाजूने 14 15 फूट उंचीची तटबंदी आहे परंतु तिची बऱ्याच प्रमाणात पडझड झाली आहे. किल्ल्याला पूर्व-पश्चिम समान अंतरावर दोन मुख्य दरवाजे आहेत यातील पूर्वेकडील दरवाजा महादरवाजा आहे तर पश्चिमेकडिल दरवाजा चोरदरवाजा आहे. महादरवाजा उंच व बांधीव आहे दरवाज्याच्या आत मध्ये पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत बाजूनेच आपण टेहळणी बुरुजावर जाऊ शकतो यातील महादरवाजातून आत गेल्यानंतर डाव्या बाजूला थोड्या अंतरावर वाड्याचे अवशेष व बांधीव दगडातील विहीर पाहायला मिळते बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पश्चिमेकडे गेल्यास एक पाण्याचे टाके व त्याच्या पुढे एक बांधीव विहीर पाहायला मिळते. दोन्ही विहिरीमध्ये पाणी नसते तर चौकोनी तळ्यामध्ये पावसात पाणी असते त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. थोडे पुढे गेल्यानंतर गडाचा दुसरा दरवाजा नजरेस पडतो  झेंडे वाडी गावातून येणारी वाट याच दरवाजातून गडावर येते. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. इथून खालच्या बाजूला छोटा नैसर्गिक बोगदा पाहायला मिळतो.



 गडाच्या तटबंदीच्या बाजूने फिरत असताना बालेकिल्ल्यातील दोन मंदिरे सतत लक्ष खेचत असतात. बालेकिल्ल्याचे बुरुज सहा-सात फूट उंच आहेत. बालेकिल्ल्यात महादेवाचे व खंडोबाचे मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरा मध्ये एक पिंड आहे. खंडोबाच्या मंदिरा बद्दल आख्यायिका अशी आहे की किल्ल्याचे बांधकाम करताना जमिनीतून रक्त येऊ लागले त्यामुळे पानसे यांनी जेजुरी जेजुरीच्या खंडेराया ला साकडे घातले की किल्ला पूर्ण होऊ दे त्यामध्ये तुझे मंदिर बांधीन. मंदिराच्या बाजूला राज्य सदरचा चौथरा पहायला मिळतो.

 मल्हार गडाचा इतिहास

     किल्ल्याच्या निर्मितीनंत१७७१ मध्ये थोरले माधवराव पेशवे गडावर येऊन गेल्याचे कागदपत्र मधून आढळते. तसेच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके व त्यांचे सहकारी याच किल्ल्यावरून इंग्रज सरकारविरुद्ध गनिमी काव्याने बंड करत होते. पुढे फितुरी होऊन इंग्रजांना याची माहिती होतं इंग्रजांनी या किल्ल्यावर आक्रमण केले त्यामध्ये फडके यांचे अनेक सहकारी धारातीर्थी पडले परंतु फडके या हल्ल्यातून सुखरूप बाहेर पडण्यास यशस्वी झाले.



 कसे कसे  

    या किल्ल्याला भेट देण्यासाठी मुख्य दोन रस्ते आहेत

१  पुणे सासवड मार्गावर दिवे घाट चढून वर गेल्यानंतर झेंडेवाडी गावचा फाटा लागतो या फाट्यावर दोन तीन किलोमीटर पुढे गेल्यावर झेंडेवाडी गाव लागते या गावातूनच डोंगरामधील खिंडीकडे जावे लागते या खिंडीमधून मल्हारगड समोर दिसतो.

सासवड मार्गे येणार असेल तर सासवड मार्गे सोनोरी गावात यावे लागते या गावातून गड नजरेस पडतो. सोनोरी सासवड मार्गावर एसटी बसची सोय आहे. दिवसातून तीन वेळा बस या गावात येते.


सरदार पानसे यांचा वाडा 

 या किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांनी सोनोली गावातील सरदार पानसे यांचा सहभाग असणारा भव्य चिरेबंदी वाडा नक्की पहावा टोलेजंग आहे या वाड्यात गजानन मंदिर व लक्ष्मीनारायण मंदिर आहे तसेच पानसे यांची समाधी व तुळशीवृंदावन आहे. गावात अतिशय देखणे मुरलीधर मंदिर ही पाहण्यासारखे आहे काळ्या पाषाणात कोरलेली अतिशय सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते पर्यटकांनी काय काळजी घ्यावी.



 पर्यटकांनी काय काळजी घ्यावी

 गडावर कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे सोबत पाणी द्यावे नाश्ता व जेवणाची व्यवस्था गडाखालील हॉटेलमध्ये होऊ शकते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार असाल तर एसटी बस चे वेळापत्रक पहावे. गड लहान असल्याने ट्रेकिंग च्या दृष्टीने सोपा आहे.किल्लावरील मंदीरात पाच सहा जणांची मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते.

  

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

कृपया नकारार्थी कमेंट टाळावे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण