मुख्य सामग्रीवर वगळा

सातारा जिल्ह्यातील पावसाळ्यात फिरता येतील अशी पर्यटनस्थळे/ Tourist places in Satara that can be visited in the rainy season

          पावसाळ्यात वातावरण अतिशय प्रसन्न आणि अल्हाददायक असते.सभोवताली हिरवेगार डोंगर,नदी नाल्यातील खळखळाट, पाण्यामुळे तयार झालेले धबधबे, आपणाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात अशा वातावरणात कुटुंबासोबत किंवा मित्र मैत्रिणी सोबत फिरायला जाणे म्हणजे जणू काही पर्वणीच.

     सातारा जिल्हा नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. जसे की नवजा हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे तर मान खटाव हे तालुके अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणून परिचित आहेत. सातारा जिल्ह्या तसे पर्यटकांसाठी नंदनवन म्हणून परिचित आहे. पावसाळ्यातील पर्यटकांचे आकर्षण बनण्याचे कारण सातच्या पश्चिमेला असलेली सह्याद्री पर्वतरांग याठिकाणी उंच उंच डोंगर नद्यांची उगमस्थाने कड्यावरून वाहणारे उंचच्या उंच धबधबे पर्यटकांना विशेष आकर्षित करतात तर चला मग या पावसाळ्यात फिरता येतील अशा सातारा जिल्ह्यातील ठिकाणांची सैर करू आणि पाहू तुम्ही कोणत्या ठिकाणाला भेट देतात.


१ ठोसेघर धबधबा 

       ठोसेघर धबधबा हा सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे याठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची वर्दळ लक्षणीय असते. हे ठिकाण सातारा शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. लहान व मोठा असे दोन धबधबे आहेत त्यांना राम-लक्ष्मण धबधबा असे म्हणतात. उरमोडी नदीचा उगम याच ठिकाणी होतो छोट्या धबधब्याची उंची 40 मीटर असून मोठा धबधबा दोनशे दहा मीटर उंचआहे. धबधबा पाहण्यासाठी प्रशासनाने प्लॅटफॉर्मची व्यवस्था केली आहे तसेच सुरक्षितता कंपाऊंड बांधले आहे. येथे झालेले पूर्वीचे अपघात पाहता आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. येथे जेवण नाश्त्याची सोय आहे. येथील वातावरण मन प्रफुल्लीत करते. 


     ठोसेघर येथे आल्यानंतर तुम्ही सज्जनगड व चाळकेवाडी येथे जाऊ शकता.

२ वाजराई भांबवली धबधबा

      भारतातील काही उंच धबधब्यांमध्ये वजराई धबधब्याची गणती होते हा धबधबा सातारा पासुन सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे. कास पठारा पासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर आहे. कास बामनोली रोडवरील तांबे फाट्यापासून पाय वाटेने धबधब्याकडे चालत जावे लागते, हा प्रदेश कोयना अभयारण्याच्या बफर झोन मध्ये येत असल्याने जंगल व जंगली श्वापदे भरपूर प्रमाणात आहेत जंगल इतके घनदाट आहे की सूर्यप्रकाश जमिनीवर पडत नाही. याठिकाणी विविध प्रकारची झाडे व पशुपक्षी पाहायला मिळतात. 'जाळू' जास्त प्रमाणात असल्याने काळजी घ्यावी लागते. हा धबधबा अतिशय उंच असून तीन टप्प्यांमध्ये जमिनीवर पडतो.

      याठिकाणी येऊन तुम्ही कास पठार कास तलाव व बामनोली ला बोटिंगचा आनंद घेऊ शकता.     

३ एकिव धबधबा

       एक धबधबा कास रोड वरील पारंबो फाट्यापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा एकिव गावात असल्यामुळे याला एकिव असे म्हणतात. कास पठारावरील पडणारे पावसाचे पाणी या ठिकाणाहून वाहते धबधबा लहान असून कुटुंबातील व्यक्ती सोबत मनसोक्त भेटण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. धबधबा अतिशय सुरक्षित असून आपण आपल्या कुटुंबासोबत येथे नक्की भेट देऊ शकता कास पुष्प पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांनी हा धबधबा हमखास पहावा असा आहे.

४ धारेश्वर

     धारेश्वर हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पाटण पासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी डोंगरामध्ये खोदलेल्या लेण्या आहेत या लेण्यांमध्ये महादेवाचे व प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे तसेच एक मठ व भक्तांसाठी निर्माण केले खोल्या आहेत. हा डोंगर अर्धवर्तुळाकार असल्यामुळे अतिशय सुंदर दिसतो. येथे महादेवाची मोठी पिंड व नक्षीकाम केलेल्या शिळा आहेत येथे पावसाचे प्रमाण जास्त असल्याने डोंगरातून वाहणारे असंख्य धबधबे मन प्रसन्न करून टाकतात तुम्ही लेण्यांमध्ये बसून समोर पडणारे धबधब्याचे पाणी निहाळू शकता. येथील घनदाट जंगल तांबडी माती मनाला प्रफुल्लित करते

     येथे येणाऱ्यांनी रुद्रेश्वर मंदिर व लेण्या तसेच दातेगड ही पाहू शकता.

५ ओझर्डे धबधबा

      ओझर्डे धबधबा सातारा जिल्ह्यातील कोयनानगर कोयना धरण येथे आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने याला महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणतात. कोयना धरणाच्या बाजूने नवजा कडे जाताना अनेक लहान-मोठे धबधबे लागतात. ओझर्डे धबधबा 800 फुटावरून कोसळतो. हा धबधबा पाहण्यासाठी शुल्क आकारण्यात येतो. हा प्रदेश कोयना अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येत असल्याने येथे सुरक्षितेचे उपाय करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी येऊन आपण कोयना धरणाचा शिवसागर जलाशय पाहू शकता तसेच पंडित जवाहलाल नेहरू उद्यानही पाहू शकता.

      वर्षा सहलीला जाताना आपली व आपल्या परी जनांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते

      पावसाळ्यात रस्त्याचा रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने गाडी जपून चालवावी.

      छत्री व रेनकोट कायम बरोबर ठेवणे आवश्यक आहे.

      निसरड्या जागेवर  व वाहत्या पाण्यामध्ये जाणे टाळावे.

      तर मग केव्हा जाताय आपण वर्षा सहलीला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

कृपया नकारार्थी कमेंट टाळावे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण