मुख्य सामग्रीवर वगळा

कलावंतीण दुर्ग | प्रबळगड संपूर्ण माहिती

 कलावंतीण दुर्ग माहिती:


   महाराष्ट्रातील गडकिल्ले खास वैशिष्ट्य पुर्ण आहेत भौगोलिक परिस्थिती व बांधनी मध्ये कमालीची विविधता जाणवते, त्यापैकी एक किल्ला म्हणजे प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग . हा किल्ला भारतातील सर्वात अवघड म्हणुन परिचीत आहे किल्ला जितका अवघड तितकाच सर करण्यासाठी रोमांचकारी आहे . गिर्यारोहण करणार्यांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू,आणि हक्काचे ठिकाण.गड चढताना बरेच जण मृत्युमुखी पडले असे गावकरी सांगतात. किल्लाची उंची साधारण २३०० फुट आहे. पुणे मुंबई जुना महामार्गावर पनवेल पासून १५कि.मी. अंतरावर आहे.


कलावंतीण  गडावर काय पहावे:

     ठाकूरवाडी गावातून पायवाटेने चालत जाताना समोरच  पावसाळ्यात गडावरुन पडणारे छोटे छोटे धबधबे आहाहा मन मोहून टाकतात.  वाटेत साथ संगत करण्यासाठी गर्द हिरवी झाडी, खळखळ वाहणारे पाणी बस आज मी स्वर्ग पाहीला अनुभव, साधारण दिड दोन तास चालल्या नंतर प्रबळगड माचीवर पोहचतो. माचीवर विश्रांती घेऊन  चालायला सुरुवात केली की पुढे छोटे गाव दिसते त्या गावातून पायवाटेने कलावंतीण सुळक्या चा दिशेने झाडीतून चालत गेल्यावर कलावंतीण व प्रबळगडा च्या मध्ये पोहोचतो. तिथेच बाजूला खडक कोरुन बनवलेली गुहा आहे. गुहा दोन बाय दोन फुट असुन लांबी पंचवीस फुट असून आत मध्ये छोटी खोली आहे.प्रबळगड आणि कलावंतीण सुळक्या चा कडा एकदम खडा व ताशिव आहे. कलावंतीण सुळक्या च्या पायऱ्यां खडकात खोदलेल्या आहेत. पायऱ्यांचा अती अवघड टप्पा चढून गेल्यावर तिथुनच पुढे दोन टप्पा मध्ये सुळक्याच्या टोकावर पोहोचता येते. गडावरुन उंच डोंगर खोल दरी घनदाट झाडी पाहताना मन मोहित होते. माथेरान चा सनसेट पॉईंट, इर्षालगड, कर्नाळा किल्ला, पेब, चंदेरी किल्ला तसेच पनवेल नवी मुंबई चा काही भाग पाहू शकतो.


 कलावंतीण गडाचा इतिहास:

        कलावंतीण दुर्ग कधी बांधला हे जरी सांगता येत नसले तरीही तिथे असलेल्या गुफा वरून तो बोध्द कालीन असावा. या किल्ल्याचे पुर्वि चे नाव मुरंजन गड होते.शिलाहार यादव शासन काळात या किल्ल्याचा उपयोग केला असावा, बहामनी व निजामशाही काळात त्या त्या शासकांचा अधिपत्याखाली हा किल्ला होता.शहाजी राजे जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी काही काळ या किल्ल्यावर वास्तव्यास होते. नंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला व किल्ला वर मोगली अंमल सुरू झाला. त्यानंतर १६५६ मध्ये छञपती शिवाजी महाराजांनी सरदार आबाजी महादेव यांना कल्याण भिवंडी ची मोहीम सोपविली तेव्हा कल्याण भिवंडी पासून रायरीपर्यंतचा सारा प्रदेश स्वराज्यात आला.तेव्हा मुरंजन गड ही स्वराज्यात आला,मुरंजन गडाचे नाव प्रबळगड असे करण्यात आले. पुढे पुरंदर तहा नुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्लां मध्ये प्रबळगड व कलावंतीण दुर्ग  हे ही किल्ले होते. त्यानंतर तह मोडून किल्ले परत घेत असताना केशरसिंग हाडा या किल्लेदाराचा पराभव करून मराठा सैन्याने प्रबळगड परत स्वराज्यात आणला.

 कलावंतीण दुर्ग पहायला जायचे कसे: 

     पुणे मुंबई जुण्या राष्ट्रीय महामार्गावर शेंडुन फाट्या पासून गडाकडे जाण्याचा मार्ग आहे. दुसरा पर्याय म्हणजे पनवेल ठाकुर वाडी बस सेवा सुरु आहे त्या बसने ठाकुर वाडीत यावे व तिथुन पायी गडावर जाऊ शकता. तसेच पनवेल मधुन सहा आसनी रिक्षा ने ठाकुर वाडीला येऊ शकता परंतु रिक्षावाले भाडे जास्त घेतात.  ‌


कलावंतीण गड ला जाताना काय काळजी घ्यावी:                         कलावंतीण दुर्ग हा सर करण्यासाठी खुप अवघड आहे.त्यामुळे अनुभवी व्यक्ती बरोबर जाणे उत्तम पावसाळ्यात या गडावर जाणे टाळावे. सप्टेंबर ते मे महीना या काळात जावे. पाणी भरपूर बरोबर असावे. वाट चुकण्याची भिती असल्यामुळे अंधार पडायच्या आत गड उतार व्हावे.

  जवळची प्रसिद्ध ठिकाणे:

   माथेरान, कर्नाळा किल्ला, पेब इर्षालगड, चंदेरी किल्ला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण