मुख्य सामग्रीवर वगळा

ETF म्हणजे काय | ETF मध्ये गुंतवणूक कशी करावी

 ETF म्हणजे काय

ETF म्हणजे Exchange-Traded Fund (एक्सचेंज ट्रेडेड फंड). हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे. हा स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड केला जातो, अगदी स्टॉकप्रमाणे शेअर बाजाराच्या कामकाजाच्या वेळेत तुम्ही यांची खरेदी विक्री करु शकता.या साठी तुमच्याकडे डिमॅट अकाउंट व ट्रेडिंग अकाउंट आसने आवश्यक आहे. म्युच्युअल फंडाच्या तुलनेत इटिए्फ मध्ये खर्च अगदी कमी आहे, व यामध्ये एक्झीट लोड भरावा लागत नाही.ETF एक प्रकारचा फंड आहे जो वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतो, जसे की शेअर्स, बाँड्स, वस्तू (जसे सोनं किंवा तेल), किंवा विविध निर्देशांक (index).



ETF ची मुख्य वैशिष्ट्ये:


1. स्टॉकसारखा ट्रेड: ETF चा व्यापार शेअर मार्केटमध्ये दिवसभर होतो, आणि त्याची किंमत सतत बदलत असते. जो तुम्हाला बाजाराच्या चढ उताराचा फायदा मिळवून देऊ शकतो.


2. विविधता (Diversification): एका ETF मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स किंवा मालमत्ता असतात. ETF मधील गुंतवणूक वेगवेगळ्या इंडेक्स मध्ये केली जात असल्याने जोखीम कमी होते.


3. खर्च प्रभावीता: ETF चे व्यवस्थापन शुल्क कमी असते,त्याचा खर्च ०.०४ इतका असतो.त्याच बरोबर  यावर एक्झीट लोड नसतो. बहुतेक ETF "पासिव्हली मॅनेज्ड" असतात. म्हणजेच, ते एका विशिष्ट निर्देशांकाचे (index) अनुकरण करतात.


४. लिक्विडिटी: ETF मध्ये तुम्ही सहज खरेदी-विक्री करू शकता, कारण ते स्टॉक एक्सचेंजवर व्यापार करता येतात. म्हणजेच एक्सचेंज वर ट्रेड होत असल्याने तुम्ही दिवसात कधीही विकू किंवा खरेदी करू शकता


5. गुंतवणुकीचे प्रकार: शेअर-बाजाराव्यतिरिक्त वस्तूंमध्ये (जसे सोन्याचा ETF), आंतरराष्ट्रीय मार्केट, किंवा विशिष्ट क्षेत्रांमध्ये (जसे तंत्रज्ञान, आरोग्यसेवा) ETF द्वारे गुंतवणूक करता येते.

उदाहरण:

SBI ETF Nifty 50: हा Nifty 50 निर्देशांकाचे प्रदर्शन प्रतिबिंबित करणारा ETF आहे.

Gold ETF: सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या ETF ला Gold ETF म्हणतात.

ETF फायदेशीर आहे का? याचे उत्तर गुंतवणूकदाराच्या उद्दिष्टांवर, जोखीम क्षमता, व गुंतवणुकीच्या कालावधीवर अवलंबून असते. ETF फायदेशीर ठरू शकतो, कारण त्यात काही महत्त्वाचे फायदे आहेत. पण प्रत्येक गुंतवणूक प्रकारात जोखीम असते, त्यामुळे त्याचे फायदे व तोटे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

 हे ही वाचा : म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी 

ETF मध्ये  गुंतवणूक करत असताना त्यांचे फायदे व तोटे समजावून घेणे गरजेचे असते तर आपण यांचे फायदे व तोटे सविस्तर समजावून घेऊ

ETF गुंतवणूकीचे फायदे

1. विविधता (Diversification):

    एकाच ETF मध्ये विविध कंपन्यांचे शेअर्स किंवा मालमत्ता असतात, त्यामुळे तुमची जोखीम कमी होते.

जसे, Nifty 50 ETF मध्ये Nifty 50 निर्देशांकातील 50 कंपन्या समाविष्ट असतात. 

2. खर्च कमी (Low Expense Ratio):

म्युच्युअल फंडांच्या तुलनेत ETF चे व्यवस्थापन शुल्क कमी असते, कारण ते "पासिव्हली मॅनेज्ड" असतात. यामध्ये एक्झीट लोड ही नसतो. म्युच्युअल फंडाच्या तुलनेत ८० टक्के खर्च कमी असतो. जो दिर्घकाळात मोठा फायदा देऊन जातो.

3. सोयीस्कर ट्रेडिंग:

ETF चे खरेदी-विक्री शेअर मार्केटमध्ये दिवसातून कधीही करता येते.म्युच्युअल फंडां प्रमाणे ते एका दिवसाच्या शेवटी "NAV" वर अवलंबून नसते. 

4. पारदर्शकता:

ETF कशामध्ये गुंतवणूक करत आहे हे गुंतवणूकदारांना अगदी स्पष्टपणे समजते. 


5. लिक्विडिटी (Liquidity):

ETF शेअर मार्केटमध्ये सहज खरेदी-विक्री करता येतात, त्यामुळे तुम्हाला पैशांची गरज असताना सहज पैसे काढता येतात.

6. जोखीम कमी करणे:

निर्देशांकावर आधारित ETF (जसे Nifty 50 ETF) बाजाराच्या चढ-उतारांचे जोखीम कमी करतो, कारण ते विशिष्ट स्टॉकवर अवलंबून नसते.

ETF चे तोटे


1. मार्केट जोखीम (Market Risk):

ETF मार्केटवर अवलंबून असतात, त्यामुळे जर संपूर्ण बाजार घसरला, तर ETF ची किंमतही कमी होईल.

2. ट्रेडिंग शुल्क:

खरेदी-विक्री दरम्यान ब्रोकरेज व इतर खर्च लागतो, जो लहान गुंतवणूकदारांसाठी त्रासदायक असू शकतो.

३.सखोल अभ्यासाची गरज:

बाजाराचे चांगले ज्ञान आणि योग्य ETF निवडण्यासाठी अभ्यास करावा लागतो.

ETF फायदेशीर कधी ठरतो?

दीर्घकाळ गुंतवणूक ठेवल्यास कंपाऊंडिंगचा फायदा होतो.सुरक्षित आणि स्थिर परताव्याची अपेक्षा असेल तर:

Nifty 50 किंवा Sensex ETF मध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरते.

विविध उद्योगांवर आधारित ETF (जसे सेक्टर ETF) जोखीम कमी करतो.

सोन्याची गुंतवणूक:

Gold ETF हा शारीरिक सोन्याच्या खरेदीपेक्षा सोयीस्कर व सुरक्षित पर्याय आहे.


ETF फायदेशीर की नाही यासाठी टिप्स:

लक्ष्य स्पष्ट ठेवा: दीर्घकालीन वाढ किंवा अल्पकालीन नफा कशासाठी गुंतवणूक करायची हे ठरवा.


योग्य ETF निवडा: बाजार निर्देशांक, क्षेत्र, किंवा मालमत्तेवर आधारित ETF निवडा.

 गुंतवणुकी पूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

योग्य नियोजनाने आणि अभ्यासाने ETF फायदेशीर ठरू शकतो!


ETF मधून गुंतवणूकदारांना कमी जोखमीने व चांगल्या परताव्याची संधी मिळते. पण गुंतवणुकी पूर्वी आपल्या आर्थिक उद्दिष्टां नुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य सल्ला घ्यावा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल...

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच...

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंब...

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सि...

माथेरान माहिती | matheran hill station

 माथेरान हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळा पैकी एक असल्याने या ठिकाणाला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात मुंबई व पुण्यापासून समान अंतरावर असल्याने शनिवार रविवार तसेच सूट्टीच्या दिवशी पर्यटकांची वर्दळ जास्त जाणवते. उन्हाळ्यामध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर नंतर माथेरान हे हक्काचे ठिकाण आहे माथेरान कुठे आहे:    माथेरान महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येत असून मुंबईपासून ११० किलोमीटर तर पुण्यापासून १२० किलोमीटर अंतरावर आहे हे ठिकाण मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्ग लगत आहे. सह्याद्री पर्वतरांगेच्या उपरांगेतील डोंगरमाथ्यावर वसलेले असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची ८०३ मिटर म्हणजेच २६०० कुठे एवढी आहे. माथेरानच्या बाहेरच प्रशस्त असे वाहत तळ असून या ठिकाणी वाहन लावून प्रवेश करावा लागतो, माथेरान मध्ये सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी असून याठिकाणी वाहतुकीसाठी पायी, घोडा, व प्रवासी सायकल टांगा यांचा वापर  माथेरानमध्ये फिरण्यासाठी करावा लागते. याचे सर्व नियोजन माथेरान गिरिस्थान नगर परिषदे मार्फत केली जाते.     ब्रिटिश अधिकारी ह्य...