आज ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात आणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.या पावसाने ग्रामिन जनजीवन विस्कळित करून टाकले आहे.शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हाता तोंडाशी आलेला सोयाबिन, कापूस, तुर, यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचे झालेले नुकसान भरपाई त्वरीत सरकार ने द्यावी अशी मागणी आज शेतकरी करत आहेत.आज भात काढणी ची असतील किंवा सोयाबिन कापूस तुर यांचा काढणी ची कामे चालू आहेत त्यातच पाऊस आपली उपस्थिती रोज दाखवून देत असल्याने शेतकऱ्यांना पीक काढावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.